शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

CoronaVirus: 31 मेपर्यंत कठोर निर्बंध; वरिष्ठ पातळीवर निर्णय; आणखी काही जिल्ह्यांची लॉकडाऊनची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 06:10 IST

रुग्णसंख्या सकृतदर्शनी कमी दिसत असली, तरीही लॉकडाऊन काढला तर अन्य राज्ये व जिल्ह्यातील लोक मोठ्या प्रमाणात मुंबईत येतील आणि तेथून कोरोनाची साथ पुन्हा राज्यभर पसरेल, म्हणून ३१ मेपर्यंत परिस्थिती आहे तशीच ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

अतुल कुलकर्णी -

मुंबई : राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये सध्या संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असून आणखी काही जिल्हे १० ते १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात १५ मे नंतरही कठोर निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला आहे.सरकारला यंत्रणा मजबूत करण्यासाठी वेळ लागणार आहे. ऑक्सिजनची उपलब्धता तयार करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. १५ मे नंतर सर्व व्यवहार सुरू केले तर साथ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिस्थिती आहे तशीच कायम ठेवत जिल्हाधिकाऱ्यांना लॉकडाऊन जाहीर करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. (Strict restrictions until May 31; Decisions at the senior level; Preparations for lockdown of some more districts)जवळपास ११ जिल्ह्यांनी १० ते १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. दहापैकी नाशिक आणि बुलडाणा जिल्ह्यातील लॉकडाऊन २२ आणि २३ मेपर्यंत कायम आहे. ज्यांची मुदत १५ मे रोजी संपत आहे, असे जिल्हेदेखील पुन्हा मुदतवाढ करण्याच्या मानसिकतेत असल्याचे मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबईतील रुग्णसंख्या सकृतदर्शनी कमी दिसत असली, तरीही लॉकडाऊन काढला तर अन्य राज्ये व जिल्ह्यातील लोक मोठ्या प्रमाणात मुंबईत येतील आणि तेथून कोरोनाची साथ पुन्हा राज्यभर पसरेल, म्हणून ३१ मेपर्यंत परिस्थिती आहे तशीच ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या कालावधीत कोरोनाचा संसर्ग कितपत असेल ते पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल.रुग्णसंख्या होतेय कमी१ एप्रिल : ६३,२८२१७ एप्रिल : ६७,१२३२४ एप्रिल : ६७,१६०१ मे : ६३,२८२५ मे : ५७,६४०९ मे : ४८,४०११५ ते ३१ मे हा काळ महत्त्वाचा आणि कसोटीचा आहे. त्यामुळे ३१ मेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन वाढवावा लागेल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.आपल्याकडे रोज ६० ते ७० हजार रुग्ण निघत होते. त्यांची संख्या आता ४५ ते ५० हजारापर्यंत कमी झाली आहे. मात्र अजूनही परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आलेली नाही. अशावेळी लॉकडाऊन काढला किंवा निर्बंधांमध्ये शिथिलता आणली तर केलेली सगळी मेहनत वाया जाईल. त्यामुळे जैसे थे परिस्थिती ठेवण्याची मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांची इच्छा आहे. त्यादृष्टीने बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल.         - राजेश टोपे, सार्वजनिक आरोग्यमंत्री 

टास्क फोर्सच्या सूचना - सरकारने नेमलेल्या टास्क फोर्ससह वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘जैसे थे परिस्थिती’ कायम ठेवावी, अशी शिफारस केल्याची सूत्रांनी माहिती दिली. - रुग्ण कमी होत नसलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर लॉकडाऊन लावण्याचे सुचविले आहे. दूध आणि औषधाची दुकाने एवढेच चालू ठेवावे, बाकी सर्व व्यवहार बंद ठेवावेत, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. 

११ जिल्ह्यांत संपूर्ण लॉकडाऊनराज्यातील ११ जिल्ह्यात कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली असून, दूध आणि औषधाची दुकाने चालू ठेवावीत, बाकी सर्व व्यवहार बंद ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात १० दिवस कडक लॉकडाऊन असेल.

कोल्हापूर -दोन दिवसात कडक लॉकडाऊन केले जाईल, असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. अहमदनगरमधील कठोर निर्बंध १५ मेपर्यंत वाढविल्याचे महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी सांगितले.

अकाेला -सहा दिवसासाठी कठोर निर्बंध लागू केल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. कठोर निर्बंधाचा साेमवारी पहिला दिवस हाेता. निर्बंधाची कडक अंमलबजावणी झाल्यामुळे चौक आणि रस्ते निर्मनुष्य होते.

हे राहणार बंद : किराणा दुकाने, भाजीपाला व फळ बाजारातील मालाची खरेदी-विक्री, अंडी, मटण, चिकन व मासे विक्री 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लसState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरे