शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

"कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता रजा अकादमीविरोधात कठोर कारवाई करावी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 18:53 IST

आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

"मुंबई-त्रिपुरा येथे एका धार्मिक स्थळावर हल्ला करण्यात आल्याची अफवा पसरवून व त्यातून अल्पसंख्याक तरुणांची माथी भडकवून काल महाराष्ट्रात हिसंक दंगली घडविण्याचे काम रजा अकादमीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. पोलिसांवर हल्ले करून त्यांना गंभीर जखमी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. अशाप्रकारची देश व समाजविरोधी कृत्य करणाऱ्या व धर्मांध प्रवृतींना खतपाणी घालणाऱ्या रजा अकादमीच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी व या रजा अकादमीवर कायमची बंदी घालण्याची शिफारस राज्य सरकारच्यावतीने केंद्र सरकारकडे करावी," अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

"महाराष्ट्रात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहात असताना दरवर्षी अशा पद्धतीने धार्मिक दंगल घडविण्याचे काम रजा अकादमी कडून सातत्याने करण्यात येत आहे. ऑगस्ट २०१२ मध्ये सुद्धा याच रजा अकादमीने मुंबईत मोर्चा दरम्यान संपूर्ण देशाच्या अस्मितेचा विषय असलेल्या अमर जवान स्मारकाची तोडफोड केली होती, इतकेच नव्हे तर महिला पोलिसांचे कपडे फाडण्याचा अत्यंत संतापजनक प्रकार त्यांनी केला होता," असंही भातखळकर म्हणाले. "मागील वर्षी कोरोनाच्या काळात फ्रान्स मधील कथित अल्पसंख्याक विरोधी कायद्याच्या विरोधात मुंबईच्या अनेक भागात आंदोलन करत दंगल भडकविण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या आपल्या राज्यात अशा औरंगजेबी प्रवृत्तीना वेळीच ठेचणे गरजेचे आहे, त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता आपण रजा अकादमीच्या विरोधात कठोर कारवाई करावी," अशी मागणी सुद्धा आमदार भातखळकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असलेल्या शिवसेनेने  २०१२ मध्ये झालेल्या दंगलीच्या वेळी रजा अकादमीवर बंदी घालण्याची आग्रही मागणी केली होती, याची आठवण सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी करून दिली.

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरAmravatiअमरावतीUddhav Thackerayउद्धव ठाकरे