शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

"कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता रजा अकादमीविरोधात कठोर कारवाई करावी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 18:53 IST

आमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

"मुंबई-त्रिपुरा येथे एका धार्मिक स्थळावर हल्ला करण्यात आल्याची अफवा पसरवून व त्यातून अल्पसंख्याक तरुणांची माथी भडकवून काल महाराष्ट्रात हिसंक दंगली घडविण्याचे काम रजा अकादमीच्या माध्यमातून करण्यात आले आहे. पोलिसांवर हल्ले करून त्यांना गंभीर जखमी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. अशाप्रकारची देश व समाजविरोधी कृत्य करणाऱ्या व धर्मांध प्रवृतींना खतपाणी घालणाऱ्या रजा अकादमीच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी व या रजा अकादमीवर कायमची बंदी घालण्याची शिफारस राज्य सरकारच्यावतीने केंद्र सरकारकडे करावी," अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

"महाराष्ट्रात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहात असताना दरवर्षी अशा पद्धतीने धार्मिक दंगल घडविण्याचे काम रजा अकादमी कडून सातत्याने करण्यात येत आहे. ऑगस्ट २०१२ मध्ये सुद्धा याच रजा अकादमीने मुंबईत मोर्चा दरम्यान संपूर्ण देशाच्या अस्मितेचा विषय असलेल्या अमर जवान स्मारकाची तोडफोड केली होती, इतकेच नव्हे तर महिला पोलिसांचे कपडे फाडण्याचा अत्यंत संतापजनक प्रकार त्यांनी केला होता," असंही भातखळकर म्हणाले. "मागील वर्षी कोरोनाच्या काळात फ्रान्स मधील कथित अल्पसंख्याक विरोधी कायद्याच्या विरोधात मुंबईच्या अनेक भागात आंदोलन करत दंगल भडकविण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या आपल्या राज्यात अशा औरंगजेबी प्रवृत्तीना वेळीच ठेचणे गरजेचे आहे, त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता आपण रजा अकादमीच्या विरोधात कठोर कारवाई करावी," अशी मागणी सुद्धा आमदार भातखळकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असलेल्या शिवसेनेने  २०१२ मध्ये झालेल्या दंगलीच्या वेळी रजा अकादमीवर बंदी घालण्याची आग्रही मागणी केली होती, याची आठवण सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी करून दिली.

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरAmravatiअमरावतीUddhav Thackerayउद्धव ठाकरे