शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

कोळसा जाळल्याने वादळे येतच राहणार, Madhav Gadgil यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 08:19 IST

Madhav Gadgil News: कोळसा मोठ्या प्रमाणावर जाळला जातोय. परंतु, त्यातून पुरेशी वीजनिर्मिती होत नाही. जगात आपण सर्वाधिक कोळसा जाळतोय. यासाठी मोठे उद्योजक गुंतले आहेत.

पुणे : विकास करायचा म्हणून आज अनेक गोष्टींवर भर दिला जात आहे. कोळसा मोठ्या प्रमाणावर जाळला जातोय. परंतु, त्यातून पुरेशी वीजनिर्मिती होत नाही. जगात आपण सर्वाधिक कोळसा जाळतोय. यासाठी मोठे उद्योजक गुंतले आहेत. पण कोळसा जाळल्याने त्यातून एरोसोल (सूक्ष्म कण) वातावरणात जातात. त्याचा आरोग्यावर परिणाम होतो तसेच पर्यावरण बिघडून हवामान बदलते. कोकणात गेल्यावर्षी जो पाऊस झाला, त्याला हेच कारण असू शकते, असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले. इकॉलॉजिकल सोसायटी, पुणेतर्फे जून २०१९मध्ये कोकणात झालेल्या निसर्ग वादळाबाबतचा अभ्यास करून  ‘निसर्ग चक्रीवादळ २०१९ निसर्गाचे थैमान’ ही अहवाल तयार करण्यात आला असून त्याचे ऑनलाईन प्रकाशन गाडगीळ यांच्या हस्ते झाले. सोसायटीच्या डॉ. स्वाती गोळे, अजय फाटक, केतकी घाटे, मानसी करंदीकर आदी यावेळी उपस्थित होते. गुरूदास नूलकर, हर्षद तुळपुळे, अक्षय चव्हाण, समीर दुमाणे, कविता शिंदे यांनी हा अहवाल तयार केला आहे. गौरी बर्गी व नीलम कर्ले यांनी लिखाणात मदत केली आहे. गाडगीळ म्हणाले, ‘संपूर्ण देशातील सुमारे २० टक्के जमीन देवराईसाठी राखीव आहे. पूर्वी संपूर्ण भारत हिरवाईने आच्छादलेला होता.  पूर्वी ग्रामसभा ही हिरवाई जपत असत. पण १९७२मध्ये कायदा आला आणि वन विभागाच्या ताब्यात सर्व जमिनी गेल्या. त्यानंतर वन विभागाने पैसेवाल्यांसाठी काम करून ग्रामसभेला मात्र त्रास दिला. आज तर विकासाच्या नावाखाली काहीही केले जाते. यामुळे अडचणी येतच राहणार असे ते म्हणाले. 

...म्हणून समुद्रकिनारा उथळ झालाय nशास्त्रीय पुराव्याप्रमाणे समुद्राची पातळी जगभर, विशेषत: उष्ण कटिबंधात अपेक्षेहूनही भराभर वाढते आहे. त्यात भर घालायला इथे इमारतींच्या भाराने आणि भूजलाची पातळी खाली गेल्यामुळे जमीन खचते आहे. nशिवाय डोंगरांवरची झाडी तुटल्यामुळे आणि खाणींसाठी डोंगर खोदत असल्याने मोठ्या प्रमाणावर गाळ साचून नद्यांच्या, खाड्यांच्या मुखाशी व इतरत्रही समुद्रकिनारा उथळ झाला आहे, असे गाडगीळ म्हणाले.

टॅग्स :environmentपर्यावरणIndiaभारत