शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

आणीबाणीतील कैद्यांचे निवृत्तीवेतन थांबवा; नितीन राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 10:27 IST

फडणवीस सरकारने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सुमारे तीन हजारपेक्षा अधिक कैद्यांना निवृत्तीवेतन सुरू केली होते. त्यासाठी 50 कोटींची तरतूदही करण्यात आली होती. आता हे निवृत्तीवेतन बंद करण्यात येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई - भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी आणीबाणीतील कैद्यांना निवृत्तीवेतन योजना सुरू करण्यात आली होती. सरकारी निधीचा एका विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी उपयोग का, असा सवाल करत काँग्रेसनेते आणि मंत्री नितीन राऊत यांनी हे निवृत्तीवेतन थांबविण्याची मागणी मंत्रीमंडळाच्या बैठकीत केली आहे. 

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात देशात आणीबाणी लागू केल्यानंतर अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला होता. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. भाजप सत्तेवर आल्यानंतर या कैद्यांना भाजप सरकारकडून दरमहा पाच ते 10 हजार रुपये निवृत्तीवेतन सुरू करण्यात आले होते. फडणवीस सरकारच्या या निर्णयाचा पुनर्विचार करून हे थांबवा अशी मागणी करणारे पत्र नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.

फडणवीस सरकारने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सुमारे तीन हजारपेक्षा अधिक कैद्यांना निवृत्तीवेतन सुरू केली होते. त्यासाठी 50 कोटींची तरतूदही करण्यात आली होती. आता हे निवृत्तीवेतन बंद करण्यात येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.