शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आणीबाणीतील कैद्यांचे निवृत्तीवेतन थांबवा; नितीन राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 10:27 IST

फडणवीस सरकारने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सुमारे तीन हजारपेक्षा अधिक कैद्यांना निवृत्तीवेतन सुरू केली होते. त्यासाठी 50 कोटींची तरतूदही करण्यात आली होती. आता हे निवृत्तीवेतन बंद करण्यात येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई - भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी आणीबाणीतील कैद्यांना निवृत्तीवेतन योजना सुरू करण्यात आली होती. सरकारी निधीचा एका विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी उपयोग का, असा सवाल करत काँग्रेसनेते आणि मंत्री नितीन राऊत यांनी हे निवृत्तीवेतन थांबविण्याची मागणी मंत्रीमंडळाच्या बैठकीत केली आहे. 

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात देशात आणीबाणी लागू केल्यानंतर अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला होता. यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. भाजप सत्तेवर आल्यानंतर या कैद्यांना भाजप सरकारकडून दरमहा पाच ते 10 हजार रुपये निवृत्तीवेतन सुरू करण्यात आले होते. फडणवीस सरकारच्या या निर्णयाचा पुनर्विचार करून हे थांबवा अशी मागणी करणारे पत्र नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.

फडणवीस सरकारने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सुमारे तीन हजारपेक्षा अधिक कैद्यांना निवृत्तीवेतन सुरू केली होते. त्यासाठी 50 कोटींची तरतूदही करण्यात आली होती. आता हे निवृत्तीवेतन बंद करण्यात येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.