शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

..तोपर्यंत वंचितचा समावेश मविआत झालाय हे मानणार नाही; प्रकाश आंबेडकरांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 15:35 IST

जोपर्यंत राष्ट्रवादी- उद्धव ठाकरें शिवसेना यांचा निर्णय झाला आहे. परंतु काँग्रेसकडून अजून निर्णय झालेला दिसत नाही असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.

मुंबई -  Prakash Ambedkar on Mahavikas Aghadi ( Marathi News ) भाजपा सरकार देशासाठी घातक आहे. त्यामुळे आपला इगो किंवा भाजपा-आरएसएसचं सरकार न येणे यात आमचे प्राधान्य भाजपाचं सरकार न येणे यासाठी आहे. महाविकास आघाडीनं जे पत्र काढले त्यात नाना पटोलेंची सही आहे. नाना पटोलेंना किती अधिकार आहेत हे माहिती नाही. काँग्रेसच्या वरिष्ठांनी यावर स्पष्टीकरण द्यावे. आघाडीत बोलणी करण्याचे अधिकार अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरातांना दिलेत. त्यामुळे त्या दोघांपैकी कुणाची सही नाही. त्यामुळे अजूनतरी वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडीत झालाय हे मानायला मी तयार नाही असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासाठी त्या पत्राला किंमत आहे. अद्याप महाविकास आघाडीत कुठलाही जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. हवेत पतंग उडवल्यासारखी यांची चर्चा होते. पत्रावर नाना पटोलेंची सही ही त्यांची व्यक्तिगत मानतो, ती काँग्रेस पक्षाची नाही. काँग्रेस प्रभारींशी माझ्यासोबत झालेल्या चर्चेनुसार अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांना अधिकार दिलेत. मग नाना पटोलेंनी सही कुणाच्या सांगण्यावरून केली माहिती नाही. आरएसएस-भाजपाविरोधात जे आहेत त्यांची एक मोट बांधावी असा आमचा प्रयत्न आहे. काँग्रेस पक्षाने त्यांची भूमिका मांडावी अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली. 

तसेच जोपर्यंत राष्ट्रवादी- उद्धव ठाकरें शिवसेना यांचा निर्णय झाला आहे. परंतु काँग्रेसकडून अजून निर्णय झालेला दिसत नाही. त्यामुळे प्रभारी, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचीही सही त्या पत्रावर दिसत नाही. अद्याप जागावाटपाचा काही फॉर्म्युला ठरलेला नाही. २ फेब्रुवारीच्या बैठकीला मी, रेखा ठाकूर, धैर्यवान पुंडकर उपस्थित राहू. आम्ही १२-१२ जागांचा फॉर्म्युला मांडला आहे. पण बैठकीत महाविकास आघाडीकडून जागावाटपावर काय होते हे बघू असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. 

दरम्यान, मराठा समाजाचे आंदोलन, २००६ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने खासगी बाजार समिती कायदा बनवला होता यासारख्या २५ मुद्द्यांवर महाविकास आघाडीने त्यांची भूमिका स्पष्ट करावी. त्यानंतर किमान समान कार्यक्रम ठरवला जाईल. जर या गोष्टींवर योग्य तोडगा निघाला तर पुढे जाऊ शकतो. नाहीतर इंडिया विस्कटली आहे तसं महाविकास आघाडीही तुटू नये ही चिंता आम्ही जाहीर केलीय. २ तारखेच्या बैठकीत आम्ही जे मुद्दे उपस्थित केलेत, त्याचसोबत जागावाटपाबाबत गेल्या अडीच वर्षापासून तुम्ही एकत्रित आहात त्यामुळे तुमचा फॉर्म्युला मांडा. त्यावर आम्ही चर्चा करू असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी