शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

..तोपर्यंत वंचितचा समावेश मविआत झालाय हे मानणार नाही; प्रकाश आंबेडकरांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 15:35 IST

जोपर्यंत राष्ट्रवादी- उद्धव ठाकरें शिवसेना यांचा निर्णय झाला आहे. परंतु काँग्रेसकडून अजून निर्णय झालेला दिसत नाही असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.

मुंबई -  Prakash Ambedkar on Mahavikas Aghadi ( Marathi News ) भाजपा सरकार देशासाठी घातक आहे. त्यामुळे आपला इगो किंवा भाजपा-आरएसएसचं सरकार न येणे यात आमचे प्राधान्य भाजपाचं सरकार न येणे यासाठी आहे. महाविकास आघाडीनं जे पत्र काढले त्यात नाना पटोलेंची सही आहे. नाना पटोलेंना किती अधिकार आहेत हे माहिती नाही. काँग्रेसच्या वरिष्ठांनी यावर स्पष्टीकरण द्यावे. आघाडीत बोलणी करण्याचे अधिकार अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरातांना दिलेत. त्यामुळे त्या दोघांपैकी कुणाची सही नाही. त्यामुळे अजूनतरी वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडीत झालाय हे मानायला मी तयार नाही असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासाठी त्या पत्राला किंमत आहे. अद्याप महाविकास आघाडीत कुठलाही जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. हवेत पतंग उडवल्यासारखी यांची चर्चा होते. पत्रावर नाना पटोलेंची सही ही त्यांची व्यक्तिगत मानतो, ती काँग्रेस पक्षाची नाही. काँग्रेस प्रभारींशी माझ्यासोबत झालेल्या चर्चेनुसार अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांना अधिकार दिलेत. मग नाना पटोलेंनी सही कुणाच्या सांगण्यावरून केली माहिती नाही. आरएसएस-भाजपाविरोधात जे आहेत त्यांची एक मोट बांधावी असा आमचा प्रयत्न आहे. काँग्रेस पक्षाने त्यांची भूमिका मांडावी अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली. 

तसेच जोपर्यंत राष्ट्रवादी- उद्धव ठाकरें शिवसेना यांचा निर्णय झाला आहे. परंतु काँग्रेसकडून अजून निर्णय झालेला दिसत नाही. त्यामुळे प्रभारी, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचीही सही त्या पत्रावर दिसत नाही. अद्याप जागावाटपाचा काही फॉर्म्युला ठरलेला नाही. २ फेब्रुवारीच्या बैठकीला मी, रेखा ठाकूर, धैर्यवान पुंडकर उपस्थित राहू. आम्ही १२-१२ जागांचा फॉर्म्युला मांडला आहे. पण बैठकीत महाविकास आघाडीकडून जागावाटपावर काय होते हे बघू असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. 

दरम्यान, मराठा समाजाचे आंदोलन, २००६ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने खासगी बाजार समिती कायदा बनवला होता यासारख्या २५ मुद्द्यांवर महाविकास आघाडीने त्यांची भूमिका स्पष्ट करावी. त्यानंतर किमान समान कार्यक्रम ठरवला जाईल. जर या गोष्टींवर योग्य तोडगा निघाला तर पुढे जाऊ शकतो. नाहीतर इंडिया विस्कटली आहे तसं महाविकास आघाडीही तुटू नये ही चिंता आम्ही जाहीर केलीय. २ तारखेच्या बैठकीत आम्ही जे मुद्दे उपस्थित केलेत, त्याचसोबत जागावाटपाबाबत गेल्या अडीच वर्षापासून तुम्ही एकत्रित आहात त्यामुळे तुमचा फॉर्म्युला मांडा. त्यावर आम्ही चर्चा करू असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी