शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

..तोपर्यंत वंचितचा समावेश मविआत झालाय हे मानणार नाही; प्रकाश आंबेडकरांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 15:35 IST

जोपर्यंत राष्ट्रवादी- उद्धव ठाकरें शिवसेना यांचा निर्णय झाला आहे. परंतु काँग्रेसकडून अजून निर्णय झालेला दिसत नाही असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.

मुंबई -  Prakash Ambedkar on Mahavikas Aghadi ( Marathi News ) भाजपा सरकार देशासाठी घातक आहे. त्यामुळे आपला इगो किंवा भाजपा-आरएसएसचं सरकार न येणे यात आमचे प्राधान्य भाजपाचं सरकार न येणे यासाठी आहे. महाविकास आघाडीनं जे पत्र काढले त्यात नाना पटोलेंची सही आहे. नाना पटोलेंना किती अधिकार आहेत हे माहिती नाही. काँग्रेसच्या वरिष्ठांनी यावर स्पष्टीकरण द्यावे. आघाडीत बोलणी करण्याचे अधिकार अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरातांना दिलेत. त्यामुळे त्या दोघांपैकी कुणाची सही नाही. त्यामुळे अजूनतरी वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडीत झालाय हे मानायला मी तयार नाही असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासाठी त्या पत्राला किंमत आहे. अद्याप महाविकास आघाडीत कुठलाही जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. हवेत पतंग उडवल्यासारखी यांची चर्चा होते. पत्रावर नाना पटोलेंची सही ही त्यांची व्यक्तिगत मानतो, ती काँग्रेस पक्षाची नाही. काँग्रेस प्रभारींशी माझ्यासोबत झालेल्या चर्चेनुसार अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांना अधिकार दिलेत. मग नाना पटोलेंनी सही कुणाच्या सांगण्यावरून केली माहिती नाही. आरएसएस-भाजपाविरोधात जे आहेत त्यांची एक मोट बांधावी असा आमचा प्रयत्न आहे. काँग्रेस पक्षाने त्यांची भूमिका मांडावी अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी केली. 

तसेच जोपर्यंत राष्ट्रवादी- उद्धव ठाकरें शिवसेना यांचा निर्णय झाला आहे. परंतु काँग्रेसकडून अजून निर्णय झालेला दिसत नाही. त्यामुळे प्रभारी, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचीही सही त्या पत्रावर दिसत नाही. अद्याप जागावाटपाचा काही फॉर्म्युला ठरलेला नाही. २ फेब्रुवारीच्या बैठकीला मी, रेखा ठाकूर, धैर्यवान पुंडकर उपस्थित राहू. आम्ही १२-१२ जागांचा फॉर्म्युला मांडला आहे. पण बैठकीत महाविकास आघाडीकडून जागावाटपावर काय होते हे बघू असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. 

दरम्यान, मराठा समाजाचे आंदोलन, २००६ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने खासगी बाजार समिती कायदा बनवला होता यासारख्या २५ मुद्द्यांवर महाविकास आघाडीने त्यांची भूमिका स्पष्ट करावी. त्यानंतर किमान समान कार्यक्रम ठरवला जाईल. जर या गोष्टींवर योग्य तोडगा निघाला तर पुढे जाऊ शकतो. नाहीतर इंडिया विस्कटली आहे तसं महाविकास आघाडीही तुटू नये ही चिंता आम्ही जाहीर केलीय. २ तारखेच्या बैठकीत आम्ही जे मुद्दे उपस्थित केलेत, त्याचसोबत जागावाटपाबाबत गेल्या अडीच वर्षापासून तुम्ही एकत्रित आहात त्यामुळे तुमचा फॉर्म्युला मांडा. त्यावर आम्ही चर्चा करू असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी