शहरं
Join us  
Trending Stories
1
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
2
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
3
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
4
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
5
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
6
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
7
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
8
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
9
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
10
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
11
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
12
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
13
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...
14
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
15
Tariff War: "भारत, चीनला धमक्या देऊन काही होणार नाही"; रशियाने अमेरिकेला तिखट शब्दात सुनावले
16
२२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार LPG सिलेंडर? GST कपातीनंतर ग्राहकांना मिळणार दिलासा, समोर येतेय अशी माहिती
17
काजोलने पुन्हा मोडली 'नो-किसिंग पॉलिसी', 'द ट्रायल २'मध्ये ऑनस्क्रीन पतीला केलं किस, व्हिडीओ व्हायरल
18
बदल्याची आग! "मला ४ लाख दे नाहीतर..."; वडिलांनी लेकाला केलं किडनॅप, पत्नीला दिली धमकी
19
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
20
वैभव सूर्यवंशी आकाशातून थेट खेळपट्टीवर उतरला.. ऑस्ट्रेलियाला पोहोचताच समोर आला भन्नाट VIDEO

'' अजूनही जबाबदारी संपलेली नाही ''....डॉ. बाबा आढाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 07:00 IST

 ‘आजही कष्टकरी समाज आपल्याकडे आशेनं बघतो,  ‘बाबा, आम्हाला सन्मान हवायं असं म्हणतो.  तेव्हा अजूनही जबाबदारी संपलेली नाही असं वाटतं’,  ही भावना आहे, बाबांची! 

ठळक मुद्देबाबांनी वयाची 90 वर्षे पूर्ण केल्याबददल ‘लोकमत’शी संवाद...

कष्टक-यांचे ‘कैवारी’, असंघटित कामगारांचे ’पालनकर्ते’, संयुक्त महाराष्ट्र,  गोवा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात झोकून देणारा ‘स्वातंत्र्यसैनिक’ अशा अनेक बिरूदांनी समाजात वलय प्राप्त केललं व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ कामगार नेते  ‘ डॉ. बाबा आढाव’. शनिवारी ( 1 जून) रोजी बाबांनी वयाची 90 वर्षे पूर्ण केल्याबददल ‘लोकमत’शी संवाद... 

नम्रता फडणीस* तुम्ही स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्या काळाचे साक्षीदार ठरला आहात? ही स्थित्यंतरे अनुभवताना काय निरीक्षण नोंदवता?-  देशाची स्वातंत्र्य चळवळ, मराठवाडा मुक्ती आंदोलन, गोवा स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ यांचा मी साक्षीदार ठरलो. या काळात मी समाजवादाशी जोडला गेलो. माझ्यावर समाजवादाचे संस्कार राष्ट्रसेवा दल आणि कॉग्रेसमुळे झाले.महात्मा गांधींना प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यावेळी मी केवळ 17 वर्षांचा होतो. त्यांची हत्या झाल्यानंतर गोड खाल्ले नव्हते. इतका माझ्यावर गांधीचा  प्रभाव होता. गोडसे यांनी गांधीवर गोळी झाडली. कारण त्याला गांधीजींचा राष्ट्रवाद मान्य नव्हता. त्याला हिंदू राष्ट्र हवे होते. आज गोडसेचा उदो उदो केला जातो.त्याला हुतात्मा ठरवले जात आहे. एकप्रकारे गांधीजींनी जी राष्ट्रवादाची पायाभरणी केली ती पुसून टाकण्याचा प्रकार सुरू झाला आहे. * आज कोणत्या प्रकारचा राष्ट्रवाद आणला जातोय,असं तुम्हाला वाटतं?- आर्थिक विषमता पराकोटीची होते.तेव्हा फँसिस्ट विचार आणले जातात.ब्रिटीशच केवळ  ‘डिव्हाईड इन रूल’ करत होते असे नव्हे तर आपणही सत्ता टिकविण्यासाठी करतो. तिचं स्थिती आज आहे. गांधी नेहमी म्हणायचे की येणारे स्वातंत्र्य हे शेतकरी आणि कामगारांचे आहे. मात्र सध्या वारे विरूद्ध दिशेने वाहात आहेत. साध्वी प्रज्ञा सिंह बहुमताने निवडून येते हा चिंतनाचा विषय आहे. * भारताला आंदोलन आणि चळवळींचा एक इतिहास आहे. मात्र आज त्या चळवळी मागे पडल्या आहेत, यामागे कोणती कारणे आहेत?-आमची पिढी स्वातंत्र्यपूर्व काळातील असल्यामुळे आमच्यावर चळवळीचे संस्कार  होते. आंदोलनातून जे संस्कार व्हायचे ती आंदोलनच आज राहिलेली नाहीत. भारतात चळवळी देखील फारशा उरलेल्या नाहीत हे वास्तव आहे. त्याचेही विश्लेषण झालं पाहिजे.  स्वातंत्र्यानंतर जो एक मध्यमवर्ग तयार झाला तो आपल्या कोशातच राहिला. साहित्यामध्येही कुठेच त्याची प्रतिबिंब उमटली नाहीत. त्यामुळं आजच्या पिढीवर कोणाचे संस्कार होणार असा मला प्रश्नच पडतो. * आजच्या पिढीपुढं कोणती आव्हानं आहेत असं वाटतं?-इतिहासात रमणं सोपं असतं, छत्रपती शिवाजी महाराज किंवा छ्त्रपती संभाजी महाराजांचा पुरूषार्थ पाहून अभिमानाने उर भरून येणंही सोपं असतं. परंतु दु:ख याचं वाटत की इतिहास कितीतरी  पुढं गेला तरी आम्ही भूतकाळातच रमत आहोत.  सावित्रीबाई फुले यांनी हातात लेखणी दिली नसती, आंबेडकरांमुळे मतदानाचा अधिकार मिळाला नसता तर चित्र बदलले असते का? याचाही विचार तरूणपिढीने करणं गरजेचं आहे. * कष्टकरी, असंघटितांच्या आयुष्यात  ‘अच्छे दिन’ आलेत असं वाटतं का? - देशात 125 कोटी पैकी जवळपास 50 कोटी असंघटित कामगार आहेत. सामाजिक विषमता मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. आजही कामगार बारा-बारा तास काम करीत आहेत. मात्र त्यांना काही मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. कष्टकरी स्त्रियांचे चित्र बदलले नाही. देशामध्ये कामगारांच्या श्रमातूनच अर्थसंचय निर्माण होतोय, मात्र  हे आम्ही अजूनही मान्य  करत नाही. सामाजिक सुरक्षा कायदा १० वर्षांपूर्वी अस्तित्वात आला. तरीही अद्याप आपल्या देशातील असंघटित कामगार क्षेत्राला पुरेशी सुरक्षा आपण देऊ शकलो नाही, हे दुर्देवी वास्तव आहे. * समाजवादी  किंवा कॉंग्रेस पक्ष असो. या पक्षांकडे नवी फळी तयार होऊ शकली नाही. पक्षांकडे नवा चेहराच नाही, ही पक्षांच्या अधोगतीची कारणे आहेत असे वाटते का? - हे मान्यच आहे. ज्या राष्ट्रसेवा दलात वाढलो त्याची अवस्था आज काय झाली आहे. पण त्या चुका कुणी केल्या.  त्यावेळी राजकीय महत्वाकांक्षा असलेल्या पुढा-यांनी पक्षाचा बळी दिला. हे आज सांगितलं पाहिजे की 1966 साली मधु दंडवते यांची पत्नी निवडणुकीला उभी राहिली आणि तेव्हा समाजवाद्यांनी शिवसेनेबरोबर समझोता केला. इतकचं नव्हे तर आणीबाणी नंतर पक्ष विसर्जित करण्याची घाई कुणी केली? ही अपयश पाहिली असल्यामुळं आज स्तब्ध आहे. याची उत्तर माझ्याकडं नाहीत. पण तरीही आशा वाटते. जनता नावाची गोष्ट आम्हाला तारेल. ---------------------------------------------------------- 

टॅग्स :PuneपुणेBaba Adhavबाबा आढावGovernmentसरकार