शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

राज्यात अस्थमाच्या बालकांत तीन हजारांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 07:18 IST

बदलती जीवनशैली, प्रदूषणाचा वाढता विळखा, बेसुमार वृक्षतोड, ऋतुमानातील चढउतार यामुळे अस्थमाचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे.

- स्नेहा मोरेमुंबई : बदलती जीवनशैली, प्रदूषणाचा वाढता विळखा, बेसुमार वृक्षतोड, ऋतुमानातील चढउतार यामुळे अस्थमाचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. अस्थमा केवळ मोठ्यांमध्ये दिसत नसून शून्य ते पाच वर्षांपर्यंतच्या बालकांमध्येही अस्थमा झालेल्या बालकांचे प्रमाण वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जागतिक अस्थमा निवारण दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अस्थमा झालेल्या बालकांची स्थिती पाहता गेल्या वर्षभरात या रुग्णांची संख्या तीन हजारांनी वाढली आहे.केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, २०१७- १८ साली राज्यात अस्थमा झालेल्या बालकांची संख्या ४ हजार १८५ एवढी होती. तर २०१८-१९ साली ती ७ हजार ४१७ एवढी झाली आहे. देशात सहापैकी एका बालकास अस्थमा असल्याचे आढळते. या वाढत्या प्रमाणाची स्थिती चिंताजनक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत २०१८-१९ साली २ हजार ३६८ बाल अस्थमा रुग्णांची नोंद झाली आहे, तर पुण्यात १ हजार ३१७ रुग्ण आढळले आहेत.लहान मुलाची श्वासनलिका लहान असते. लहान मुलांमध्ये श्वसनाशी संबंधित विविध प्रकारच्या संसर्गामुळे गुणसूत्रातील दोष म्हणजेच आनुवंशिक कारणामुळे तसेच वातावरणातील घटक म्हणजे विषाणू यामुळे अस्थमा बळावण्याची दाट शक्यता असते. २०२० पर्यंत भारतात अस्थमाचे सर्वाधिक रुग्ण असण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.दरवर्षी जगात १ लाख ८० हजार अस्थमाग्रस्त मुले मृत्युमुखी पडतात. देशात सध्या दीड ते दोन कोटी लोक अस्थमाचे रुग्ण आहेत. यात ५ ते १२ वर्षांच्या मुलांमध्ये अस्थमाचे प्रमाण १० ते १५ टक्के एवढे आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, लहान मुलांमध्ये अस्थमा म्हणजे दम्याचे प्रमाण सन २००८ मध्ये ५.५ टक्के इतके होते. हे प्रमाण २०१० मध्ये १० टक्क्यांपर्यंत पोहोचले. तर २०१८ मध्ये हे प्रमाण १५ टक्क्यांहून अधिक असल्याचे विविध अभ्यासातून निदर्शनास आले आहे.असे केले जाते निदानमुलाकडून श्वास बाहेर टाकताना छातीतून सततचा शिट्टीसारखा आवाज येत असल्यास त्याला अस्थमा म्हणजेच दमा असण्याची शक्यता सर्वाधिक असते. दमा असल्याचे निदान करण्याकरिता तपासण्या करण्याची तशी गरज नसते; परंतु काही वेळा गरज पडल्यास पल्मनरी फंक्शन टेस्ट, एक्स-रे, अ‍ॅलर्जीकरिता तपासणी, रक्ताची तपासणी करून निदान केले जाते.योग्य उपचारांनी नियंत्रण मिळविणे शक्यसर्वसामान्य लोकांच्या तुलनेत अस्थमाग्रस्त लोकांची श्वसननलिका अधिक संवेदनशील, प्रभावित होणारी आणि नाजूक असते. यामुळे धूर आणि धूळ यांच्या संपर्कात येताच ती आकुंचन पावते आणि श्वसन नलिकेला सूज येते. कफ बाहेर पडतो. परिणामी, रुग्णाला धाप लागते. वारंवार खोकला येतो, छातीतून घरघर आवाज येतो. ही लक्षणे औषधे घेतल्यावर तात्पुरती बरी होतात आणि काही दिवसांनी परत होतात; पण प्रत्येकाच्याच बाबतीत तो अस्थमा आहे असे नाही, यातील काही बालके ही वाढत्या वयानुसार बरी होतात. योग्य उपचार घेतल्यास हा आजार ९० टक्के नियंत्रणात आणता येतो. - डॉ. मधुकर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय

टॅग्स :Healthआरोग्य