शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

राज्य मानवी हक्क आयोगच हक्काच्या प्रतीक्षेत!; सरकारचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 02:46 IST

राज्यातील कोणत्याही नागरिकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या व संविधानिक दर्जा असलेला महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगातील अनेक महत्त्वाची पदे सध्या रिक्त आहेत.

- खलील गिरकरमुंबई : राज्यातील कोणत्याही नागरिकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्यास, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या व संविधानिक दर्जा असलेला महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगातील अनेक महत्त्वाची पदे सध्या रिक्त आहेत. २०१७ पासून अन्वेषण विभागाला वालीच नाही. सर्व पदांवर अधिकारी, कर्मचारी कार्यरत असणे हा आयोगाचा हक्क असला, तरी सद्यस्थितीत नागरिकांच्या हक्कासाठी पुढाकार घेणा-या या आयोगाचा हक्कच डावलण्यात आल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता आयोगालाच न्यायासाठी सरकारकडे दाद मागण्याची वेळ आली आहे.राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाखल होणा-या तक्रारींबाबत चौकशी करून, आयोगाला अहवाल सादर करण्याची जबाबदारी अन्वेषण विभागाकडे आहे. त्यामुळे या विभागाच्या प्रमुखपदी पोलीस महानिरीक्षक (आयजी) दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्यात येतो. किशोर जाधव या पदावर कार्यरत होते. मात्र, डिसेंबर २०१७ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर, आजतागायत हे पद रिक्त आहे. आयजीच्या खालोखाल पोलीस अधीक्षक दर्जाचा अधिकारी देण्यात आलेला आहे. या पदावर असलेले किशोर बैजल यांची नुकतीच बदली करण्यात आली आहे. त्यामुळे हे पद सध्या रिक्त आहे. त्या खालोखाल दोन पोलीस निरीक्षक असतात. मात्र, त्यांचीदेखील बदली मे व जून महिन्यात झाल्यापासून ही पदे रिक्त आहेत.सध्या केवळ चार पोलीस हवालदार आयोगाच्या अन्वेषण विभागात कार्यरत आहेत. त्यामुळे आयोगाकडे दाखल होणाºया तक्रारींची पडताळणी करण्याच्या कामावर विपरित परिणाम होत आहे.आयोगाच्या सदस्यपदी निवृत्त अधिकारी व न्यायाधीशांची निवड पाच वर्षांसाठी केली जाते. सध्या आयोगाच्या सचिवपदाचा कार्यभार अन्शू सिन्हा या सनदी अधिका-यांकडे आहे. आयोगाच्या अध्यक्षपदी असलेले न्या. एस.आर. बन्नुरमठ (नि.) यांचा जानेवारीत अध्यक्ष पदाचा कार्यभार समाप्त झाला, तेव्हापासून आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे. सध्या आयोगाच्या सदस्यपदी भगवंत मोरे हे निवृत्त आयपीएस अधिकारी कार्यरत आहेत. मोरे यांचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये समाप्त होईल. त्यानंतर, केवळ एम. ए. सईद या एकमेव सदस्यांवर आयोगाच्या कामकाजाचा भार पडण्याची शक्यता आहे.कारभारावर परिणाम होण्याची भीतीआयोगाचे प्रमुख असलेले अध्यक्षपद व महत्त्वपूर्ण अशा अन्वेषण विभागाचे प्रमुखपद रिक्त असल्याने, त्याचा परिणाम आयोगाच्या कारभारावर होत आहे. यामुळे अन्यायाविरोधात दाद मागून न्यायासाठी आयोगाकडे धाव घेणाºया सर्वसामान्यांना न्याय मिळण्यास विलंब होण्याची भीती आहे.