शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारने कोरोना प्रादुर्भावात ऊसतोडणी कामगारांच्या आरोग्याची जबाबदारी घ्यावी : पंकजा मुंडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2020 19:34 IST

सप्टेंबरच्या अखेरीस नगर, बीड व मराठवाड्यातून लाखो ऊसतोडणी कामगार कारखान्यांचा उसतोडण्यासाठी म्हणून बाहेर पडतील

ठळक मुद्देआरोग्य; मजुरीतील वाढ: संघटना; साखर आयुक्त सक्रिय

पुणे : ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सप्टेंबरच्या अखेरीस नगर, बीड व पुढे मराठवाड्यातून लाखो ऊसतोडणी कामगार कारखान्यांचा उसतोडण्यासाठी म्हणून बाहेर पडतील. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऊसतोडणीसाठी लाखोच्या संख्येत स्थलांतर करणाऱ्या उसतोडणी कामगारांचे आरोग्यासह विविध प्रश्न हंगाम सुरु होण्याआधीच ऐरणीवर आले आहेत. मात्र, ऊसतोड कामगारांच्या आरोग्याची जबाबदारी राज्य सरकारनेही घ्यावी असे स्पष्ट मत माजी मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी 'लोकमत' शी बोलताना व्यक्त केले. 

मुंडे म्हणाल्या, कामगारांच्या संघटना, कोरोना विषाणूचा विळखा पडू नये तसेच त्यांच्यापासूनही कोणाला बाधा होऊ नये यासाठी साखर आयुक्त कार्यालयाने त्यांचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी साखर कारखान्यांवर सोपवली आहे. कामगार थेट शेतात काम करणार असले तरी कारखान्याने त्यांच्यासाठी सॅनिटायझर, मास्क व अन्य आरोग्य सुविधा पुरवाव्यात असे कारखान्यांना कळवण्यात आले आहे. त्याचबरोबर कामगारांनी शक्यतो लहान मुले व वृद्धांना बरोबर नेऊ नये असे आवाहनही केले आहे.

साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या सुचनांचे स्वागत आहे, पण ही जबाबदारी सरकारचीही आहे. उसतोडणीसाठीचे हे स्थलांतर मोठे असते. त्यांची अपरिहार्यता लक्षात घेऊन सरकारनेही त्यांना आरोग्याच्या वेगवेगळ्या सुविधा द्याव्यात अशी आमची मागणी आहे. हे सगळे कामगार असंघटित आहेत. त्यांना कंपनी कायदा लागू होत नाही. त्यामुळे कारखाने कसलीही सुविधा देत नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची काळजी घेणे सरकारचे काम आहे मजुरांच्या आरोग्यविषयी असेही माजी मंत्री मुंडे म्हणाल्या.

साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, वृद्धांना बरोबर न्यायला मनाई करणे शक्य होते, मात्र तसे न करता फक्त आवाहन करण्यात आले आहे. अनेक कुटुंबांना वृद्ध व्यक्तींना मागे एकटे ठेवणे शक्य नसते. त्यामुळे चर्चेअंती मनाई करायची नाही असे ठरवण्यात आले, मात्र त्यांना कामावर न नेता मुक्कामाच्या ठिकाणी ठेवावे, त्यांच्यासाठी कारखान्यांनी वेगळी व्यवस्था करावी असे सांगण्यात आले आहे. मुलांसाठी साखर शाळा, अगदी लहान मुलांसाठी पाळणाघरे या नेहमीच्या सुविधा याही वेळी कारखान्यांनी करायच्या आहेत.

............................

मजूरीतील दरवाढ हा लवादाचा विषय आहे. साखर संघाची याविषयाबाबत लवकरच बैठक होत आहे. त्यांनी ठरवलेल्या दराबाबत यासंबधीच्या लवादात चर्चा होईल. त्यात कामगारांची प्रतिनिधी म्हणून मी, साखर कारखानदारांचे प्रतिनिधी म्हणून मंत्री जयत पाटील व अन्य काही वरिष्ठ अधिकारी आहेत. तिथे चर्चा होऊन दर ठरेल. आत्ता तरी कामगारांच्या वतीने आम्ही काही प्रस्ताव वगैरे दिलेला नाही, मात्र कोरोना मुळे या कामगारांची झालेली परवड लक्षात घेता दरवाढ दिली पाहिजे. ती किती याबाबत लवादात निर्णय होईल.पंकजा मुंडे, माजी मंत्री 

टॅग्स :PuneपुणेPankaja Mundeपंकजा मुंडेSugar factoryसाखर कारखानेState Governmentराज्य सरकारFamilyपरिवारcorona virusकोरोना वायरस बातम्या