शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

गेले दोन महिने राज्यातील सर्वसामान्य माणूस देवाच्या भरवशावर : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 19:46 IST

सत्तार यांच्याप्रमाणे अनेकजण अस्वस्थ आहेत...

ठळक मुद्देबारामती आणि इंदापुर दौऱ्यांनंतर पत्रकारांशी प्रदेशाध्यक्ष पाटील चंद्रकांत पाटील यांचा संवाद लोकांची सेवा लांब, मलईदार खात्यांसाठी रस्सीखेच सुरु सत्तार यांच्या राजीनाम्याच्या भुमिकेमुळे अनेकांना धीर

बारामती : गेले दोन महिने राज्यातील सर्वसामान्य माणूस देवाच्या भरवशावर जगत आहे. इथे सरकार नावाची कोणती गोष्टच नाही. राज्यातील शेतकरी वाऱ्यावर आहे, ही बाब दुर्देवी आहे. देवाच्या भरवशावर हे सरकार चालले आहे. मंत्र्यांची खातीच न ठरल्याने एखाद्या विभागाकडे सर्वसामान्यांचे काम असल्यास परमेश्वराकडुनच करुन घ्यावे लागणार आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.

बारामती आणि इंदापुर दौऱ्यांनंतर बारामती येथे पत्रकारांशी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला.  त्यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले,राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष भाजपबद्दलचा राग व्देष आणि तिरस्कार यातुन एक होत आहेत. अनेक ठिकाणी आम्हाला हरविण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागत आहे, याचा आम्हाला आनंद आहे.त्यांनी हिंमत असेल तर सुटे सुटे लढावे,असे आव्हान त्यांनी  विरोधकांना दिले. महाराष्ट्रात बट्याबोळ सुरु आहे. प्रचंड भांडणे सुरु आहेत. लोकांची सेवा लांब, मलईदार खात्यांसाठी खेचाखेची सुरु आहे. आज मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेला राजीनामा ही सुरवात आहे.सत्तार यांच्याप्रमाणे अनेकजण अस्वस्थ आहेत.सत्तार यांच्या राजीनाम्याच्या भुमिकेमुळे अनेकांना धीर आला.तिन्ही पक्षात' ग्रुप फॉर्मेशन' होईल. मुुख्यमंत्र्यांकडे कोणतेच खाते नाही, अशी राज्यात स्थिती आहे. उध्दव ठाकरे यांची कर्जमाफी फसलेली असुन शेतकऱ्यांची सर्वात वाईट अवस्था झाली आहे. केवळ सत्तेसाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. निवडुन आल्यानंतर ते एकत्र आले आहेत.भविष्यात जेव्हा ते एकत्रित  निवडणुकांना सामोरे जातील तेव्हा मतदार कोणाला बहुमत देतो हे दिसेलच. निवडणुक पुर्व आघाडी करुन सेना काँग्रेस व राष्ट्रवादी लढल्यास भाजपचा विजय निश्चित होईल,असे पाटील म्हणाले. भविष्यात शिवसेना व भाजप एकत्र येण्याची शक्यता कितपत आहे.या प्रश्नावर पाटील म्हणाले,राजकारणातच नाहि तर माणसाच्या जीवनात कधी काय होईल याची गॅरंटी नसते. आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करीत नाहि. पण भविष्यात या सरकारमध्ये शिवसेनेला असह्य झाल्यास भाजप हाच त्यांना एकमेव पर्याय असेल, अशा शब्दात पाटील यांनी शिवसेनेला अजुन हि भाजपचे दरवाजे खुले असल्याचे संकेत दिले. एवढ्या मोठ्या शिवसेनेला  कार्यकर्त्यांना द्यायला मंत्रीपदे दहा व राष्ट्रवादीला सोळा मंत्रीपदे मिळाली आहेत. राज्याचे ७५ टकके बजेट वापरले जाणारी सर्व खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे  आहेत. तकलादु खाती सेनेसह काँग्रेसकडे दिली आहेत.हे सरकार फार काळ चालणार नाहि.सावरकरांबाबत आक्षेपार्ह  लिखाणाच्या मुद्दयावरुन सावरकरांच्या कुटुंबियांनी काल दिवसभर मुख्यमंत्र्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण मुख्यमंत्री त्यांना दिवसभर उपलब्ध झालेच नाहि. कारण मुख्यमंत्र्यांकडे सांगण्यासारखे काही राहिलेलेच नाहि.सत्तेसाठी शिवसेनेने तत्वांना तिलांजली दिल्याची टीका पाटील यांनी केली.——————————————....कारखान्यावर देखील पुन्हा महाविकास आघाडी भाजप सर्वच निवडणुका ताकदीने लढते. माळेगांव कारखान्यामध्ये आमची सत्ता आहे.छत्रपती मध्ये काही मतांचा फरक आहे.सोमेश्वरला मात्र, जास्त मतांचा फरक होता. या सर्व कारखान्याच्या निवडणुकीत भाजप पुर्ण ताकतीने उतरणार आहे.कारखान्यावर देखील पुन्हा महाविकास आघाडी होणार. हि महाविकासआघाडी भाजपला पराभुत करण्याचा प्रयत्न करणार. एखाद्या वेळी महाविकासआघाडी यशस्वी होवु शकते. कारण ती बांधील असते. भाजपला मात्र, आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुकीत मतदार महाविकासआघाडी कि भाजपला मतदान करतात,हे पहायचे असल्याचे पाटील म्हणाले. ——————————————..........

टॅग्स :Baramatiबारामतीchandrakant patilचंद्रकांत पाटीलcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना