शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

गेले दोन महिने राज्यातील सर्वसामान्य माणूस देवाच्या भरवशावर : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 19:46 IST

सत्तार यांच्याप्रमाणे अनेकजण अस्वस्थ आहेत...

ठळक मुद्देबारामती आणि इंदापुर दौऱ्यांनंतर पत्रकारांशी प्रदेशाध्यक्ष पाटील चंद्रकांत पाटील यांचा संवाद लोकांची सेवा लांब, मलईदार खात्यांसाठी रस्सीखेच सुरु सत्तार यांच्या राजीनाम्याच्या भुमिकेमुळे अनेकांना धीर

बारामती : गेले दोन महिने राज्यातील सर्वसामान्य माणूस देवाच्या भरवशावर जगत आहे. इथे सरकार नावाची कोणती गोष्टच नाही. राज्यातील शेतकरी वाऱ्यावर आहे, ही बाब दुर्देवी आहे. देवाच्या भरवशावर हे सरकार चालले आहे. मंत्र्यांची खातीच न ठरल्याने एखाद्या विभागाकडे सर्वसामान्यांचे काम असल्यास परमेश्वराकडुनच करुन घ्यावे लागणार आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.

बारामती आणि इंदापुर दौऱ्यांनंतर बारामती येथे पत्रकारांशी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला.  त्यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले,राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष भाजपबद्दलचा राग व्देष आणि तिरस्कार यातुन एक होत आहेत. अनेक ठिकाणी आम्हाला हरविण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागत आहे, याचा आम्हाला आनंद आहे.त्यांनी हिंमत असेल तर सुटे सुटे लढावे,असे आव्हान त्यांनी  विरोधकांना दिले. महाराष्ट्रात बट्याबोळ सुरु आहे. प्रचंड भांडणे सुरु आहेत. लोकांची सेवा लांब, मलईदार खात्यांसाठी खेचाखेची सुरु आहे. आज मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेला राजीनामा ही सुरवात आहे.सत्तार यांच्याप्रमाणे अनेकजण अस्वस्थ आहेत.सत्तार यांच्या राजीनाम्याच्या भुमिकेमुळे अनेकांना धीर आला.तिन्ही पक्षात' ग्रुप फॉर्मेशन' होईल. मुुख्यमंत्र्यांकडे कोणतेच खाते नाही, अशी राज्यात स्थिती आहे. उध्दव ठाकरे यांची कर्जमाफी फसलेली असुन शेतकऱ्यांची सर्वात वाईट अवस्था झाली आहे. केवळ सत्तेसाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. निवडुन आल्यानंतर ते एकत्र आले आहेत.भविष्यात जेव्हा ते एकत्रित  निवडणुकांना सामोरे जातील तेव्हा मतदार कोणाला बहुमत देतो हे दिसेलच. निवडणुक पुर्व आघाडी करुन सेना काँग्रेस व राष्ट्रवादी लढल्यास भाजपचा विजय निश्चित होईल,असे पाटील म्हणाले. भविष्यात शिवसेना व भाजप एकत्र येण्याची शक्यता कितपत आहे.या प्रश्नावर पाटील म्हणाले,राजकारणातच नाहि तर माणसाच्या जीवनात कधी काय होईल याची गॅरंटी नसते. आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करीत नाहि. पण भविष्यात या सरकारमध्ये शिवसेनेला असह्य झाल्यास भाजप हाच त्यांना एकमेव पर्याय असेल, अशा शब्दात पाटील यांनी शिवसेनेला अजुन हि भाजपचे दरवाजे खुले असल्याचे संकेत दिले. एवढ्या मोठ्या शिवसेनेला  कार्यकर्त्यांना द्यायला मंत्रीपदे दहा व राष्ट्रवादीला सोळा मंत्रीपदे मिळाली आहेत. राज्याचे ७५ टकके बजेट वापरले जाणारी सर्व खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे  आहेत. तकलादु खाती सेनेसह काँग्रेसकडे दिली आहेत.हे सरकार फार काळ चालणार नाहि.सावरकरांबाबत आक्षेपार्ह  लिखाणाच्या मुद्दयावरुन सावरकरांच्या कुटुंबियांनी काल दिवसभर मुख्यमंत्र्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण मुख्यमंत्री त्यांना दिवसभर उपलब्ध झालेच नाहि. कारण मुख्यमंत्र्यांकडे सांगण्यासारखे काही राहिलेलेच नाहि.सत्तेसाठी शिवसेनेने तत्वांना तिलांजली दिल्याची टीका पाटील यांनी केली.——————————————....कारखान्यावर देखील पुन्हा महाविकास आघाडी भाजप सर्वच निवडणुका ताकदीने लढते. माळेगांव कारखान्यामध्ये आमची सत्ता आहे.छत्रपती मध्ये काही मतांचा फरक आहे.सोमेश्वरला मात्र, जास्त मतांचा फरक होता. या सर्व कारखान्याच्या निवडणुकीत भाजप पुर्ण ताकतीने उतरणार आहे.कारखान्यावर देखील पुन्हा महाविकास आघाडी होणार. हि महाविकासआघाडी भाजपला पराभुत करण्याचा प्रयत्न करणार. एखाद्या वेळी महाविकासआघाडी यशस्वी होवु शकते. कारण ती बांधील असते. भाजपला मात्र, आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुकीत मतदार महाविकासआघाडी कि भाजपला मतदान करतात,हे पहायचे असल्याचे पाटील म्हणाले. ——————————————..........

टॅग्स :Baramatiबारामतीchandrakant patilचंद्रकांत पाटीलcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना