शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी राज्य मंडळाची चाचपणी; अंतिम निर्णयासाठी 'वेट अँड वॉच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 12:46 IST

विभागांकडून आलेल्या सूचना तसेच कोरोनाची स्थिती विचारात घेऊन परीक्षेच्या तारखांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

ठळक मुद्देपदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या भूमिकेवर राज्य शासन अद्यापही ठाम

पुणे : राज्यात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा तसेच एमएचटी-सीईटीबाबत गोंधळाची स्थिती असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेची चाचपणी सुरू केली आहे. ही परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्याची तयारी सुरू केली असून, याबाबतच्या सूचना सर्व विभागीय मंडळांकडून मागविण्यात आल्या आहेत. विभागांकडून आलेल्या सूचना तसेच कोरोनाची स्थिती विचारात घेऊन परीक्षेच्या तारखांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.कोरोनाच्या वाढत्या प्रादुभावार्मुळे राज्य शासनाने पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा घेण्याबाबत कठोर भूमिका घेतल्याने हा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. तसेच एमएचटी-सीईटीवरही अद्याप निर्णय झालेला नाही. सीईटी सेलच्या आयुक्तांकडून सर्वेक्षण सुरू असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. शाळा सुरू करण्याबाबतही तळ्यात-मळ्यात असल्याने विद्यार्थी-पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच राज्य शिक्षण मंडळाने दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक तयार केले आहे.लेखी, प्रात्यक्षिक तसेच तोंडी परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्याचे नियोजन आहे. हे वेळापत्रक सर्व विभागीय मंडळांना पाठविण्यात आले आहे. त्यावर सूचना व दुरूस्त्या मागविण्यात आल्या आहेत. दरवर्षी जुलै महिन्यात या परीक्षा होतात. पण यंदा कोरोनामुळे निकाल विलंबाने लागल्याने पुरवणी परीक्षा होणार की नाही, याबाबतचा प्रश्न होता. पण राज्य मंडळाकडून संभाव्य वेळापत्रक तयार केल्याने आता या परीक्षेची चर्चा सुरू झाली आहे. दरवर्षी संभाव्य तारखा निश्चित करून विभागीय मंडळांकडून सूचना मागविल्या जातात. या वषीर्ही त्याच प्रक्रियेनुसार कामकाज सुरू आहे. पण यंदा कोरोनामुळे परिस्थिती वेगळी आहे. 

राज्य शासन कोंडीतपदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या भूमिकेवर राज्य शासन अद्यापही ठाम आहे. तर दुसरीकडे सीईटी तसेच पुरवणी परीक्षांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. या परीक्षा घ्यायचे झाल्यास पदवीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय वादात सापडू शकतो. पुरवणी परीक्षा न घेतल्यास एटीकेटी प्राप्त विद्यार्थ्यांपैकी अनेकांचे वर्ष वाया जाऊ शकते. तर सीईटी न झाल्यास व्यावसायिक अभ्यासक्रमांना बारावीच्या गुणांवर प्रवेश द्यावा लागेल. पण अनेक विद्यार्थी बारावीच्या परीक्षेऐवजी सीईटीचाच कसून अभ्यास करतात. अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या स्पर्धेत फटका बसू शकतो.

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीexamपरीक्षाState Governmentराज्य सरकार