शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

श्रीकांत शिंदेंना मिळणार नवी जबाबदारी?; आदित्य ठाकरेंना धक्का देण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 11:31 IST

राज्यातील फेरबदलानंतर शिवसेनेच्या १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारलं. आमदार, खासदार यांनी मूळ शिवसेनेची साथ सोडल्यानं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अवस्था कमकुवत झाली.

मुंबई - राज्यातील राजकारणात मोठा भूकंप घडवणारे एकनाथ शिंदे यांनी सत्तांतरानंतर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे यांच्या बंडाला शिवसेनेच्या ४० आमदारांनी आणि १२ खासदारांनी साथ दिली. शिंदेंच्या पवित्र्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात गेले. त्यानंतर बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होणं पसंत केले. 

सध्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेनेवरून रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही गटाकडून शिवसेनेवर दावा करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांनी सत्तेसोबतच पक्षावर वर्चस्व मिळवण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारणी बनवली. त्याचसोबत प्रवक्ते आणि इतर पदाधिकारी यांची नेमणूक सुरू ठेवली आहे. त्यात आता मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना युवासेना प्रमुख करावं अशी मागणी करण्यात आली आहे. 

राज्यातील फेरबदलानंतर शिवसेनेच्या १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारलं. आमदार, खासदार यांनी मूळ शिवसेनेची साथ सोडल्यानं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अवस्था कमकुवत झाली. शिंदेंच्या बंडाला उत्तर म्हणून राज्यभरात आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा काढत दौरे सुरू केले. त्यात एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदार प्रामुख्याने आदित्यच्या टार्गेटवर असतात. आदित्यनंतर आता उद्धव ठाकरेही गणेशोत्सवानंतर महाप्रबोधन यात्रा काढत महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. मात्र त्यापूर्वी शिवसेनेसोबत आता युवासेनेवरही शिंदे गटाकडून हक्क सांगण्याचा प्रयत्न झाला आहे. 

शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत युवासेनेचे प्रमुख म्हणून श्रीकांत शिंदे यांची नेमणूक करावी अशी मागणी केली आहे. जाधव यांनी शिंदे यांची नंदनवन बंगल्यात भेट घेतली. या बैठकीनंतर जाधव म्हणाले की, शिवसेनेची संघटना आम्ही बांधली. युवासेनेच्या बाबत लोकांना आवडणारा, युवकांमध्ये रमणारा चेहरा म्हणून श्रीकांत शिंदे यांची युवासेना प्रमुखपदी निवड करावी असं त्यांनी सांगितले. त्यामुळे आता शिवसेनेसोबत युवासेनेवर शिंदे गटाने लक्ष केले आहे. सध्या खरी शिवसेना कुणाची हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला त्यांचे म्हणणं मांडण्याची मुदत दिली आहे. परंतु दुसरीकडे कोर्टाने निवडणूक आयोगाला निकाल येईपर्यंत निर्णय घेऊ नका अशी सूचना केली आहे.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे