शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

श्रीकांत चार लाखांनी गेला होता, एक पेटी आली अन्...; एकनाथ शिंदेंनी सांगितला मतमोजणीवेळचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 21:28 IST

Eknath Shinde Speech: शिंदे संपणार असे काही जण म्हणत होते, मतदारांनी त्यांचे दात घशात घातले. शिंदे संपला नाही, जिंकला तुमच्यासाठी, असेही शिंदे म्हणाले.

आजच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या विजयाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. श्रीकांतला २०१४ ला कोणी ओळखत नव्हते याची आठवण सांगत या निवडणुकीला श्रीकांत शिंदे चार लाख मतांनी मागे होता, त्याला एकाच पॉकेटमध्ये दीड लाखाने लीड कमी करता आले असा किस्सा सांगितला. 

आणखी तीन चार जागा नक्की जिंकलो असतो...; महायुतीवर एकनाथ शिंदेंची खंत, म्हणाले...

शिंदे संपणार असे काही जण म्हणत होते, मतदारांनी त्यांचे दात घशात घातले. शिंदे संपला नाही, जिंकला तुमच्यासाठी, असेही शिंदे म्हणाले. ठाणे हा आनंद दिघे, एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे. कल्याणमध्ये तर मी एकदाच गेलो. त्यांना म्हणालो तुम्ही बाकीचा मतदारसंघ फिरा, मला एकदा येऊद्या. श्रीकांतला उमेदवार म्हणून २०१४ ला कोणी ओळखत नव्हते. त्याने त्याची ओळख निर्माण केली. चार लाखांनी गेला होता. एक पेटी आली आणि त्यांचा लीड दीड लाखाने घसकन खाली झाला, असे शिंदे म्हणाले. 

ज्या बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काँग्रेसने काढून घेतला होता, त्या काँग्रेसला मी मतदान करणार असे सांगणारे बाळासाहेबांचे वारसदार कसे होऊ शकतात. त्यांच्या आत्म्याला काय वेदना होत असतील. मुंबईतील चार जागांवर काय झाले, यामिनी जाधव यांच्या मतदारसंघात काय झाले, आपल्याला मतदान सिंगल डिजिटमध्ये त्यांना हजारात मतदान झाले, असे सांगताना शिंदे यांनी काही ठिकाणची आकडेवारी सांगितली. राहुल शेवाळे देखील असेच आहे, असे सांगत ठाकरे गटाला कोणाचे मतदान झाले ते समजून घ्या, असे शिंदे कार्यकर्त्यांना म्हणाले. 

९९ टक्के मते तुम्हाला, मग कुठले मोबाईल लावून, ओटीपी टाकून ईव्हीएम हॅक केले होते, तुम्ही जिंकला तर ते चांगले, हरला तर वाईट. वायकर यांचा विजय त्यांच्या फार जिव्हारी लागला आहे. यांना काय नाव दिले पाहिजे, रडे गट दिले पाहिजे, असे शिंदे म्हणाले. सारखाच रडीचा डाव. जिंकलो, जिंकलो असा ढोल पिटताय कोणाच्या जिवावर, असा सवाल शिंदे यांनी केला. शिवसेनेचा मतदार तुमच्यासोबत राहिलाय का याचा विचार करा, मुंबईत त्यांच्यापेक्षा अडीज लाख मते आपल्याला जास्त मिळाली आहेत. उबाठाच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे हिरवे झेंडे फडकत होते. भगव्यावर हिरवे झेंडे फडकत होते. मतांसाठी किती लाचार व्हाल लाज नाही वाटली का असा सवाल करत याचे उट्टे तुम्ही विधानसभेला काढणार की नाही, असा सवाल शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे