शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सट्टाबाजारात राज्यात युतीच फेव्हरेट, तर आघाडीच्या जागा तिपटीने वाढण्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 04:39 IST

सट्टाबाजारात युतीच फेव्हरेट आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला जवळपास तिपटीने जास्त जागा मिळण्याची शक्यता असली, तरी सर्वाधिक जागेवर युतीचे उमेदवार विजयी होतील

जमीर काझी मुंबई : राज्यातील लोकसभेसाठीचे मतदान पार पडल्यानंतर, आता सर्वांचे लक्ष २३ मे रोजीच्या निवडणूक निकालाकडे लागले आहे. दोन्ही प्रमुख आघाड्यांकडून सर्वाधिक जागा जिंकण्याचा दावा करण्यात येत असला, तरी सट्टाबाजारात युतीच फेव्हरेट आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला जवळपास तिपटीने जास्त जागा मिळण्याची शक्यता असली, तरी सर्वाधिक जागेवर युतीचे उमेदवार विजयी होतील, असा अंदाज बुकिंकडून वर्तविला जात आहे.

सट्टेबाजारात सध्या युतीच्या उमेदवाराला एका रुपयाला ९० पैसे, तर कॉँग्रेस आघाडीसाठी १.१५ पैसे भाव आहे. महिनाभरापूर्वी त्यासाठी अनुक्रमे ६५ पैसे व १.४० पैसे भाव सुरू होता, असे बुकींनी सांगितले. राज्यात ४८ जागांपैकी २८ ते ३० जागा युती तर १८ ते २० जागा कॉँग्रेस आघाडीला मिळतील, असा त्यांचा अंदाज आहे. मतदानाच्या वाढीव टक्केवारीचा लाभ कोणत्या पक्षाला होईल, याबाबत विभागवार अंदाज वर्तविला जात आहे.

राज्यात लोकसभेच्या ४८ जागांसाठी चार टप्प्यांत मतदान सुरळीत पार पडले आहे. रखरखत्या उन्हात घामाच्या धारा वाहत असताना, प्रमुख पक्षाचे नेते व उमेदवारांनी रॅली व सभा घेत राज्यातील सर्व मतदारसंघांत जोरदार प्रचार केला आहे. त्यामुळे तापमानात वाढ आणि उन्हाळी सुट्ट्यांचा कालावधी असला, तरी मतांच्या टक्केवारीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सट्टेबाजारातही प्रचार व टप्पेनिहाय कालावधीत निवडणूक निकालावरील दरात सातत्याने चढउतार होत राहिला. यात मनसेचे राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभांचा मोठा प्रभाव आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सेना-भाजपचे मनोमिलन झाले, तर विरोधकांमध्ये आघाडीला सोडून बहुजन वंचित आघाडी, सपा-बसपा अशी विभागणी झाली. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला युतीसाठी निवडणूक एकतर्फी असल्याचा कयास सट्टेबाजारात होता.

मात्र, कॉँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी नेटाने केलेला प्रचार व राज ठाकरेंच्या सभांमुळे निवडणुकीत चुरस वाढली. विशेषत: ‘लाव रे तो व्हिडीओ’च्या शैलीचे गारूड राज्यभरात मतदारांवर झाल्याचे सट्टेबाजाराचे मत आहे. त्याबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंचा मतावर मोठा परिणाम होण्याचा बुकींचा अंदाज आहे. सोमवारी महाराष्ट्रात अखेरच्या टप्प्यासाठी झालेल्या मतदानानंतर सट्टेबाजांनी युतीलाच अधिक पसंती दिली आहे. युतीला एक रुपयामागे ९० पैसे, तर कॉँग्रेस आघाडीसाठी १.१५ इतका दर सध्या सुरू आहे.

वाढलेल्या मतदानाचा फायदा घेणारा उमेदवार विजयीमुंबईतील सहाही जागा सेना-भाजपच्या ताब्यात असून, पुन्हा एकतर्फी निकाल लागेल, असा सुरुवातीला अंदाज होता. मात्र, आता दक्षिण मुंबई, उत्तर मध्य आणि उत्तर पश्चिम या ठिकाणी कॉँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या विजयाची शक्यता वर्तविली जात असून, उत्तर मुंबई व उत्तर पूर्वमध्येही युतीच्या उमेदवारांना विजयासाठी संघर्ष करावा लागेल, असा बुकिंचा अंदाज आहे. वाढलेल्या २, ३ टक्के मतदानाचा फायदा घेणारा उमेदवार विजयी होईल, असे सांगण्यात येत आहे.

सातारा, बारामती, हातकणंगले एकतर्फीराज्यातील ४८ मतदारसंघांपैकी केवळ सातारा, बारामती व हातकणंगले मतदारसंघाचा निकाला एकतर्फी व मोठ्या मत फरकाने लागेल, असा सट्टेबाजांचा अंदाज आहे. या तीनही जागांवर युतीच्या विरोधातील उमेदवार सहजपणे जिंकतील, असा दावा करण्यात येत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस