शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

"वरुण, रोहित पवारांनी टीका केली तर चालेल पण तुम्ही..."; दावोसवरुन CM फडणवीसांनी काढला चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 16:22 IST

दावोस दौऱ्यातल्या गुंतवणूकीवरुन बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना टोला लगावला

CM Devendra Fadnavis: दावोसमध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये अनेक कंपन्यांनी महाराष्ट्रात केलेल्या गुंतवणूकीवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शंका उपस्थित केली होती.  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दावोसमधल्या गुंतवणूकीवरुन सरकारवर टीका केली होती. या गुंतवणूकी फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात याव्यात, लोकांना रोजगार मिळावा एवढीच अपेक्षा असल्याचे म्हटलं. यावरुनच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे. जयंत पाटील चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहतात आणि चुकीच्या गोष्टी सांगतात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार रोहित पवार आणि वरुन सरदेसाई यांनाही टोला लगावला.

विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दलच्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होता. यावेळी राज्यात आलेल्या परकीय गुंतवणूकीबाबतही मुख्यमंत्री फडणवीसांनी भाष्य केलं. दावोस दौऱ्यावरुन बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांचा उल्लेख केला. तसेच रोहित पवार आणि वरुन सरदेसाई यांचा तरुण असा उल्लेख करत चिमटा काढला.

"जयंतराव तुमचा प्रॉब्लेम आहे की तुम्ही चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी राहता आणि चुकीच्या गोष्टी सांगता. योग्य गोष्टी योग्य लोकांसोबत सांगितल्या तर त्या कार्यान्वित होतात. तुम्ही अजित पवारांचे आणि माझंही ऐकत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे. जयंत पाटील याच्यासारख्या नेत्याने राज्यात येणाऱ्या गुंतवणुकीवर शंका उपस्थित करु नये. रोहित पवार यांनी केली तरी चालू शकते कारण ते तुलनेने तरुण आहेत. पण ते काय अनभिज्ञ आहेत असं नाही. त्यामुळे तरुण माणसाने केली, वरुन सरदेसाईंनी शंका उपस्थित केली तर चालू शकतं," असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. 

दरम्यान, चालू आर्थिक वर्षात पहिल्या ९ महिन्यात १ लाख ३९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. दावोस दौऱ्यात १५ लाख  ७० हजार कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आली. यात उद्योग विभागानं ११ लाख ७१ हजार कोटी, एमएमआरडीएचे ३ लाख ४४ कोटी, सिडकोचे ५५ हजार दोनशे कोटी रुपयांचे करार झाले. ही गुंतवणूक गुजरातपेक्षा तीनपट जास्त असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2025Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJayant Patilजयंत पाटीलRohit Pawarरोहित पवारVarun Sardesaiवरुण सरदेसाई