शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
5
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
8
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
9
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
10
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
11
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
12
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
13
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
14
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
15
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
16
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
17
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
18
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
19
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
20
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले

ताजा विषय : मुख्यमंत्र्यांचे एका दगडात अनेक पक्षी

By नारायण जाधव | Updated: September 26, 2022 06:05 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ सप्टेंबरला पणन संचालकांच्या त्या आदेशाला स्थगिती देऊन राष्ट्रवादीला धोबीपछाड दिले आहे.

नारायण जाधवउप-वृत्तसंपादक

राज्यातील ३५० हून अधिक बाजार समित्यांची शिखर समिती म्हणून परिचित असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या ७ संचालकांचे संचालकपद महाविकास आघाडी सरकारच्या काळात पणन संचालकांनी मे २०२२ मध्ये रद्द करून त्यांना अपात्र ठरवले होते. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १५ सप्टेंबरला पणन संचालकांच्या त्या आदेशाला स्थगिती देऊन राष्ट्रवादीला धोबीपछाड दिले आहे. यातून भाजप आणि शिंदे सेनेने आपला मोर्चा बाजार समित्यांकडे वळविल्याचे दिसत  आहे. न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत, संबंधित आदेशाला स्थगिती दिली. त्यामुळे ७ सदस्यांचे पद कायम राहिले. यामध्ये माधवराव जाधव (बुलडाणा), धनंजय वाडकर (भोर, पुणे), बाळासाहेब सोळसकर (कोरेगाव, सातारा), वैजनाथ शिंदे (लातूर), प्रभू पाटील (उल्हासनगर, ठाणे), जयदत्त होळकर (लासलगाव, नाशिक), अद्वय हिरे (नाशिक) यांचा समावेश आहे.

मुंबई एपीएमसीत शेतकरी प्रतिनिधी म्हणून ते निवडून आले होते. मात्र, स्थानिक बाजार समितीत सदस्य नसल्याने ११ जणांचे मुंबईतील संचालकपद रद्द केले. पद रद्द होणार म्हणून त्यांनी तत्कालीन महाविकास सरकारकडे मुदतवाढ मागितली. मात्र, त्यांचा प्रस्ताव फेटाळून केवळ ज्या बाजार समित्यांची एक वर्षाची मुदतवाढ संपलेली नाही, अशाच बाजार समित्यांच्या चार सदस्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. यामुळे सभापती अशोक डक, राजेंद्र पाटील, दुधीर कोठारी, प्रवीण देशमुख यांचे पद कायम राहिले. 

पणनचा आदेश ठाणे खाडीत बुडविलामुंबई बाजार समितीत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व अधिक असून, मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने बाजार समितीत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सात संचालकांना तात्पुरते जीवदान देऊन शिंदे यांनी एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. कारण राज्यातील राष्ट्रवादीचा जीव सहकार क्षेत्रात आहे. मग ते सहकारी साखर कारखाने असोत वा सहकारी बँका अन् बाजार समित्या. याच बाजार समित्यांत सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सात संचालकांना पणन संचालकांनी कायदेशीररीत्या अपात्र ठरविले होते. परंतु, मुख्यमंत्र्यांनी पणन संचालकांच्या कायदेशीर आदेशाला ठाणे खाडीत बुडवून  सात संचालकांना अभय दिले. कारण या सातपैकी बहुतेक जण राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांचे पाठीराखे आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री असतानाच त्यांना अपात्र  ठरविले होते.  तरीही पवार यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. परंतु, महाविकास आघाडीचे सरकार जाऊन  शिंदे  सरकार येताच मुख्यमंत्र्यांनी त्यांना अभय देण्यामागे काय कारणे असावीत, असे करून शिंदे यांनी एकाचवेळी किती पक्षी मारले, यासंदर्भात चर्चाचर्वण सुरू झाले आहे. 

कोणाची सहानुभूती मिळणार?एक तर शिंदे यांनी पवार समर्थकांना अभय देऊन  त्यांची सहानुभूती मिळवली, शिवाय राज्यातील सर्वात श्रीमंत बाजार समितीच्या दैनंदिन कामकाजात काय  गडबड-घोटाळे चालले आहेत, याची माहिती देणारे हक्काचे खबरी तयार होतील. तसेच अजित पवारांविषयी देवेंद्र फडणवीस आणि दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांना एक वेगळी आस्था आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर ती आणखी  वाढली. आता मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर पवार यांच्याविषयी शंका घेणाऱ्यांना आणखी एक मुद्दा चर्चेला दिला आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेस