शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

काही लोक चुका करतही असतील पण त्याची किंमत सगळ्यांनीच मोजायची का? अजित पवारांची आगपाखड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 14:35 IST

ज्या व्यक्तींनी धनंजय मुंडें यांच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यांच्याविरुद्ध ना ना तऱ्हेचे वक्तव्य केले, आता त्याला जबाबदार कोण?

पुणे : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह राजकीय पक्षात मोठी खळबळ उडाली होती. मात्र या प्रकरणात शुक्रवारी मोठी घडामोड घडली असून आरोप करणाऱ्या महिलेने कौटुंबिक कारण देत मुंडे यांच्याविरुद्ध पोलिसांकडे दाखल केलेली तक्रार मागे घेतली आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांपासून ते अनेक नेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत राष्ट्रवादीवर निशाणा साधणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. आता त्यात उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील मुंडे प्रकरणावरून विरोधकांना चांगेलच धारेवर धरले आहे. तसेच 'सिरम'मध्ये सकाळपासून तपासणी सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली ते शोधलं जाईल. काहीच लपवले जाणार नाही असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. 

पुण्यात अजित पवार याच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, ज्या व्यक्तींनी धनंजय मुंडें यांच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यांच्याविरुद्ध ना ना तऱ्हेचे वक्तव्य केले, आता त्याला जबाबदार कोण? धनंजय मुंडे यांना आम्ही पाठीशी घालतोय असे आरोप झाले. पण त्यावेळी आम्ही या प्रकरणाचा संपूर्ण तपास होऊ द्या, सत्य बाहेर येऊ द्या म्हणत होतो. पण धनंजय मुंडे आणि आमच्या पक्षाची बदनामी झाली. मात्र अशा आरोपांमुळे बहुजन समाजातून पुढे आलेला एक सहकारी बदनाम होतो. त्याचं कुटुंब डिस्टर्ब होतं, त्याला वाली कोण? मान्य आहे की काही लोक चुका करत असतील पण त्याची किंमत सगळ्यांनीच मोजायची का? एखादी राजकीय व्यक्ती प्रचंड काम करत एखाद्या पदापर्यंत पोहचते. त्यासाठी अफाट कष्ट घ्यावे लागतात. पण असं काही जेव्हा घडतं तेव्हा त्याला एक क्षणात पायउतार व्हावे लागते. याचा सगळ्यांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे असेही पवार यावेळी म्हणाले. 

काहीजण वारे बदलते तसे बदलतात...  पुण्यातील 19 नगरसेवक संपर्कात आहेत. काही जण वारे बदलते तसे बदलतात किंवा त्यांची काही विकास काम करून घ्यायची असतील पण बेरजेचे राजकारण करायचं असतं, इलेक्टिव्ह मेरिट बघायचा असतो.

आम्हाला जेव्हा परवानगी मिळेल तेव्हा आम्ही लस घेऊ

सध्या लसीकरणाबाबत अनेक अडचणी आहेत. ग्रामीण भागात प्रमाण जास्त आहे. 60/65 टक्के लसीकरण झालं. मात्र शहरात 25 / 30 टक्के च लोकांनी लस घेतली. लोक ऐनवेळी निर्णय बदलतात. कोविन ॲपची समस्या आहे, अशी कारणे आहे. खासगी डॉक्टर्स ना पण लस द्यावी अशी मागणी आहे. त्याबाबत निर्णय घेऊ असेही ते यावेळी म्हणाले. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडेPoliticsराजकारणRapeबलात्कारWomenमहिला