शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

'भाजपाचे काही आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात, योग्यवेळी हातोडा मारू', नाना पटोलेंचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 10:05 IST

Nana Patole News: फोडाफोडी करून इतर पक्षांमधील नेत्यांना आपल्या पक्षात घेणाऱ्या भाजपामध्येच पुढच्या काही दिवसांत फूट पडणार असल्याचे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. भाजपाचे काही आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात असून, योग्य वेळी आम्ही हातोडा मारू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये उभी फूट पाडल्यानंतर भाजपाने नुकताच काँग्रेसला धक्का दिला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना आपल्या गोटात ओढत भाजपाने त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण भाजपासोबत जाणे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, फोडाफोडी करून इतर पक्षांमधील नेत्यांना आपल्या पक्षात घेणाऱ्या भाजपामध्येच पुढच्या काही दिवसांत फूट पडणार असल्याचे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. भाजपाचे काही आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात असून, योग्य वेळी आम्ही हातोडा मारू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

लोणावळा येथे झालेल्या काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिरानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भाजपाचे काही विद्यमान आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत. जेव्हा आम्ही हातोडा मारू तेव्हा तुम्हाला ते दिसेलच. मात्र आमच्यासाठी ही महत्त्वाची बाब नाही आहे. आमच्यासाठी सध्या ज्या प्रकारे महाराष्ट्र पेटवण्याचं पाप भारत जलाओ पार्टीने केलं आहे. या भारत जलाओ पार्टीला महाराष्ट्र पेटवण्याचा काय अधिकार आहे. त्यामुळे भाजपाचे जे विद्यमान आमदार, खासदार आमच्यासोबत येण्यास इच्छुक असतील त्यांच्याबाबत वेळेनुसार निर्णय घेऊ, असे नाना पटोले यांनी सांगितले. 

दरम्यान, या चिंतन शिबिरामध्ये संबोधित करताना नाना पटोले म्हणाले होते की, लोणावळ्यात दोन दिवसाच्या शिबिरातून चांगले बौद्धीक व वैचारिक मंथन झालेले आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान बाळगून काम करा. काँग्रेस पक्ष संपूर्ण राज्यात एकजूट असला पाहिजे. सर्व सेल, फ्रंटल संघटना सर्वांनी सोबत असले पाहिजे. पक्षाच्या अजेंड्यावरच सर्वांनी काम केले पाहिजे व काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या अजेंड्यानुसारच काम करा आणि लोकसभेची लढाई जिंकायची आहे हा संकल्प घेऊनच जा. आता आपल्याकडे वेळ नाही, युद्ध पातळीवर काम करायचे आहे. भाजपा कसे खोटे बोलत आहे, जनतेची फसवणूक करत आहे हे लोकांमध्ये जाऊन सांगा, कुठेही कमी पडू नका. आघाडीला विजयी करुन भाजपाचा पराभव करावा लागणार आहे. वातावरण काँग्रेस व मविआच्या बाजूने आहे. नरेंद्र मोदींच्या सत्तेचे दरवाजे महाराष्ट्र बंद करु शकतो, हे लक्षात घ्या, असा दावाही नाना पटोले यांनी केला.  

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपा