शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

'भाजपाचे काही आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात, योग्यवेळी हातोडा मारू', नाना पटोलेंचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 10:05 IST

Nana Patole News: फोडाफोडी करून इतर पक्षांमधील नेत्यांना आपल्या पक्षात घेणाऱ्या भाजपामध्येच पुढच्या काही दिवसांत फूट पडणार असल्याचे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. भाजपाचे काही आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात असून, योग्य वेळी आम्ही हातोडा मारू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये उभी फूट पाडल्यानंतर भाजपाने नुकताच काँग्रेसला धक्का दिला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना आपल्या गोटात ओढत भाजपाने त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण भाजपासोबत जाणे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, फोडाफोडी करून इतर पक्षांमधील नेत्यांना आपल्या पक्षात घेणाऱ्या भाजपामध्येच पुढच्या काही दिवसांत फूट पडणार असल्याचे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. भाजपाचे काही आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात असून, योग्य वेळी आम्ही हातोडा मारू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

लोणावळा येथे झालेल्या काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिरानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भाजपाचे काही विद्यमान आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत. जेव्हा आम्ही हातोडा मारू तेव्हा तुम्हाला ते दिसेलच. मात्र आमच्यासाठी ही महत्त्वाची बाब नाही आहे. आमच्यासाठी सध्या ज्या प्रकारे महाराष्ट्र पेटवण्याचं पाप भारत जलाओ पार्टीने केलं आहे. या भारत जलाओ पार्टीला महाराष्ट्र पेटवण्याचा काय अधिकार आहे. त्यामुळे भाजपाचे जे विद्यमान आमदार, खासदार आमच्यासोबत येण्यास इच्छुक असतील त्यांच्याबाबत वेळेनुसार निर्णय घेऊ, असे नाना पटोले यांनी सांगितले. 

दरम्यान, या चिंतन शिबिरामध्ये संबोधित करताना नाना पटोले म्हणाले होते की, लोणावळ्यात दोन दिवसाच्या शिबिरातून चांगले बौद्धीक व वैचारिक मंथन झालेले आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान बाळगून काम करा. काँग्रेस पक्ष संपूर्ण राज्यात एकजूट असला पाहिजे. सर्व सेल, फ्रंटल संघटना सर्वांनी सोबत असले पाहिजे. पक्षाच्या अजेंड्यावरच सर्वांनी काम केले पाहिजे व काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या अजेंड्यानुसारच काम करा आणि लोकसभेची लढाई जिंकायची आहे हा संकल्प घेऊनच जा. आता आपल्याकडे वेळ नाही, युद्ध पातळीवर काम करायचे आहे. भाजपा कसे खोटे बोलत आहे, जनतेची फसवणूक करत आहे हे लोकांमध्ये जाऊन सांगा, कुठेही कमी पडू नका. आघाडीला विजयी करुन भाजपाचा पराभव करावा लागणार आहे. वातावरण काँग्रेस व मविआच्या बाजूने आहे. नरेंद्र मोदींच्या सत्तेचे दरवाजे महाराष्ट्र बंद करु शकतो, हे लक्षात घ्या, असा दावाही नाना पटोले यांनी केला.  

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपा