शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
3
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
4
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
5
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
8
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
9
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
10
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
11
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
12
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
13
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
14
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
15
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

वादाच्या ‘शोले’नंतर सलोख्याचे वृक्षारोपण

By admin | Published: July 02, 2016 4:44 AM

वादाचे ‘शोले’ भडकलेले असताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सलोख्याचे वृक्षारोपण केले.

मुंबई : राज्यातील सत्तारूढ भाजपा-शिवसेनेत गेले काही दिवस वादाचे ‘शोले’ भडकलेले असताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सलोख्याचे वृक्षारोपण केले. ‘उद्धव यांनी लावलेल्या झाडाला मी माती आणि पाणी घातलं, यातून योग्य तो संदेश जाईल,’ असे सूचक विधान करून मुख्यमंत्र्यांनी दोन्ही पक्षांतील कटुता कमी करण्याचा प्रयत्न केला.राज्यात एकाच दिवशी २ कोटी झाडे लावण्याच्या उपक्रमानिमित्त माहीमच्या निसर्ग उद्यानातील समारंभात दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव या वेळी मुख्य अतिथी होते. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते. गेले काही दिवस सेना-भाजपातील नेते मंडळी एकमेकांना निजामाचा बाप, असरानी, गब्बर अशी एकाहून एक सरस विशेषणे लावत शरसंधानाची एकही संधी सोडत नसताना या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेले फडणवीस आणि उद्धव यांनी व्यासपीठावर एकमेकांशी बराच वेळ कानगोष्टी केल्या. ‘जिथे गरज असेल तिथे मी खांद्याला खांदा लावून उभा राहीन. अपशकुन करणार नाही. ज्याची सुरुवात चांगली होते, त्याला यशही मिळतेच, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात वनविभागाने राबविलेल्या या उपक्रमाचे ठाकरे यांनी कौतुक केले. तर आम्ही लावलेल्या रोपाचा वटवृक्ष होईल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षाशी आलेली कटुता कमी करण्याचा प्रयत्नच यानिमित्ताने केला. (विशेष प्रतिनिधी)>ट्री क्रे डिट द्यामराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी तेथे प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावे, अशी सूचना राज्यपालांनी केली. वन विभागाने ‘ट्री क्रे डिट-ग्रीन सर्टिफिकेट’सारखी योजना राबवावी. ज्या व्यक्ती किंवा कॉर्पोरेट हाउसेस वृक्ष लावू इच्छितात पण त्यांच्याकडे वेळ नाही अशांसाठी वन विभागाने मोबाइल अ‍ॅप विकसित करावे व त्याद्वारे पैसे भरून त्यांच्या वतीने वृक्षलागवडीची यंत्रणा निर्माण करावी.यासाठी राज्यातील पडीक जमिनी बेरोजगार युवकांच्या ताब्यात द्याव्यात, असे मुख्यमंत्री म्हणाले. विक्रमी वृक्षारोपणवनमहोत्सवानिमित्त केलेला २ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्णत्वास गेला असून,राज्यभरातील ६५,६७४ ठिकाणी १ जुलैच्या सायंकाळपर्यंत २ कोटी २२ लाख ८२ हजार १३० वृक्षांची लागवड झाली, अशी माहिती वनमंत्री मुनगंटीवार यांनी दिली.पंतप्रधान मोदींचे टिष्ट्वटमहाराष्ट्र सरकारने अतिशय चांगला पुढाकार घेत विक्रमी वृक्षारोपण केले. लोकांनी उत्स्फूर्त योगदान दिले. याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो, असे टिष्ट्वट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाबद्दल आभार व्यक्त करीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वृक्षारोपण ही लोकचळवळ झाल्याची भावना टिष्ट्वटरवर व्यक्त केली.