शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

कडक salute; शेतकरी कर्जमाफीसाठी फौजदाराने दिला एक महिन्याचा पगार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 09:34 IST

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असल्याचे दिसत आहे.

माढा : शेतकरी पुत्र असल्याची भावना लक्षात घेऊन सहायक फौजदार असलेल्या माढा येथील रमेश मांदे यांनी एक पाऊल उचलत आपला स्वत:चा एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देऊ केला आहे. कोरड्या तसेच ओल्या दुष्काळामुळे संंकटात असलेल्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी धनादेश स्वीकारुन शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केले आहे.

त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्याकरिता महाराष्ट्र शासनाचे सर्व कर्मचारी व महाराष्ट्र शासनात काम करणारे केंद्र शासनाचे कर्मचारी व राज्याचे सर्व मंत्री, आमदार यांच्या पगारातील १५ दिवसांचा पगार कपात करून तो निधी शेतकरी कर्जमाफीसाठी वापरण्याची विनंती देखील केली आहे. 

पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची भावना शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील असल्याचे स्पष्ट करताना पगाराचा ४४ हजार १०० रुपयांचा धनादेशदेखील कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री यांच्या नावावर पाठवला आहे. ही घटना संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सुखावणारी आहेत.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांनी कर्जमाफी मिळावी, यासाठी एक महिन्याचा पगार मी शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारला देत आहे. यासाठीचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द करण्यात येणार आहे. - सहायक पोलीस फौजदार रमेश मांदे 

टॅग्स :PoliceपोलिसFarmerशेतकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरे