शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 14:44 IST

आता अशोक चव्हाण हे आपल्याकडे आले आहेत. ते आपल्याकडे आले. कारण त्यांना काँग्रेसचे विचार पटले नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

 राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्ष संपूर्ण शक्तीनिशी प्राचार करताना दिसत आहेत. दरम्यान, राज्यसभेतील खासदार अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडून भाजपमधील प्रेवेशासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. "काँग्रेसने बाबासाहेबांना दोन वेळा निवडणुकीत हारलवले. आता अशोक चव्हाण हे आपल्याकडे आले आहेत. ते आपल्याकडे आले. कारण त्यांना काँग्रेसचे विचार पटले नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ते नांदेडमध्ये महायुतीच्या प्रचारसभेत बोलत होते. 

शिंदे म्हणाले, "काँग्रेसने बाबासाहेबांना दोन वेळा निवडणुकीत हारलवले. आता अशोक चव्हाण हे आपल्याकडे आले आहेत. ते आपल्याकडे आणल्याने या जिल्ह्याची आणि महायुतीची ताकद वाढली आहे. ते आपल्याकडे आले. कारण त्यांना काँग्रेसचे विचार पटले नाही. काँग्रेसने बाबासाहेबांना खूप त्रास दिला. बाबासाहेब म्हणाले होते, 'काँग्रेस हे जळक घर आहे, यापासून दूर रहा'. हे बरोबर अशोक चव्हाण यांनी ते ऐकले." यावेळी, "जोवर सूर्य आणि चंद्र असेल, तोवर बाबासाहेबांचे संविधान कायम राहील," असेही शिंदे म्हणाले. 

कुणीही आले तरी लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही -शिंदे पुढे म्हणाले, "इथे तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत, लाडके भाऊ आलेले आहेत, सगळे लाडके आहेत. माझं एक काम कराल? लाडक्या बहिणींनी जाऊन आपल्या विभागामध्ये ज्या आणखी दुसऱ्या आपल्या बहिणी आहेत, त्यांना सांगाल, आम्ही आता आमचा लाडक्या भाऊ एकनाथ शिंदेला भेटून आलो आहोत. त्यांनी आम्हाला सांगितले आहे, कुणीही आले तरीसुद्धा लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही."

निवडून आले, म्हणाले पैसे नाही -"आता ज्यांनी विरोध केला तेच लोक तुमच्याकडे येतील. आम्ही ३००० रुपये देतो, अरे देणार कुठून? सरकार मध्ये तुम्ही आहात का? कर्नाटकात, तेलंगणामध्ये, राजस्थानमध्ये, हिमाचलमध्ये घोषणा केल्या, आम्ही हे देतो, ते देतो, ते देतो, निवडून आले, म्हणाले पैसे नाही.  केंद्राकडे मागायला लागले, मोदीजींकडे. अरे तुम्हाला काही वाटायला हवे, खोटे बोलायला. खोटे बोल पण रेटून बोल. हे फसवणारे, खोटारडे, हे खोटे नॅरेटिव्ह पसरवणारे लोकसभेत त्यांनी फसवले. संविधान बदलणार, आरक्षण जाणार, सगळ्या लोकांना घाबरवलं, मुसलमानांना घाबरवलं, ख्रिश्चनांना घाबरवलं, शिखांना घाबरवलं आणि फेक नॅरेटिव्ह पसरवला," असेही शिंदे यावेळी म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेAshok Chavanअशोक चव्हाणMahayutiमहायुती