शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

सोलापूर जिल्ह्यातील सहा कारखान्यांनी चुकती केली एफआरपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 15:33 IST

साखर उद्योग; २५ साखर कारखान्यांकडे आणखीन ५६९ कोटी थकबाकी

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतलामागील १५ दिवसात पाच कारखान्यांनी २६९ कोटी ४८ लाख रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा केले२५ कारखान्यांकडे तब्बल ५६८ कोटी ५९ लाख ७४ हजार रुपये थकबाकी

सोलापूर : यावर्षीचा साखर हंगाम घेतलेल्या सहा साखर कारखान्यांनी मे अखेरपर्यंत एफ.आर. पी.ची संपूर्ण रक्कम चुकती केली आहे. असे असले तरी उर्वरित २५ कारखान्यांकडे तब्बल ५६८ कोटी ५९ लाख ७४ हजार रुपये थकबाकी असल्याचे सोलापूर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले. मागील १५ दिवसात पाच कारखान्यांनी २६९ कोटी ४८ लाख रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा केले आहेत.

यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. यापैकी गोकुळ माऊली वगळता अन्य ३० कारखान्याने १५ मे पर्यंत ८३८ कोटी ७ लाख ११ हजार रुपये इतकी थकबाकी होती. ३१ मे पर्यंत यापैकी ५ कारखान्यांनी २६९ कोटी ४७ लाख ३७ हजार रुपये इतकी रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा केली आहे. यामध्ये सहकार शिरोमणी वसंतराव काळे,पांडुरंग श्रीपूर, संत दामाजी मंगळवेढा, विठ्ठल कॉर्पोरेशन व इंद्रेश्वर कारखान्याचा समावेश आहे. उर्वरित २५ कारखान्यांकडे ५६८ कोटी ५९ लाख ७४ हजार रुपये थकबाकी आहे.  हंगाम संपल्याने कारखाने बंद होऊन तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी शेतकºयांच्या उसाचे पैसे दिले जात नाहीत; मात्र या आठवड्यात बºयाच कारखान्यांनी शेतकºयांचे पैसे चुकते करण्याची तयारी केली आहे.जिल्ह्यातील १५ कारखान्यांना सॉप्टलोन मंजूूर झाल्याने एफआरपीची रक्कम देता येणार आहे. 

कारखान्यांकडे असलेली देय रक्कम- आदिनाथ, करमाळा- दोन कोटी ३३ लाख, भीमा, टाकळी सिकंदर- १३ कोटी ३४ लाख, सिद्धेश्वर कुमठे- ४७ कोटी ९८ लाख,सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील- १२ कोटी ३३ लाख, श्री विठ्ठल गुरसाळे -६७ कोटी २२ लाख,विठ्ठलराव शिंदे- ७४ कोटी ४० लाख,श्री मकाई करमाळा- २१ कोटी ७४ लाख, संत कूर्मदास- ६ कोटी ४० लाख, लोकनेते बाबुरावअण्णा पाटील- ३२ कोटी २० लाख,  सासवड माळी शुगर-२२ कोटी ५३ लाख, लोकमंगल अ‍ॅग्रो बीबीदारफळ - ६ कोटी १९ लाख, लोकमंगल इथेनॉल भंडारकवठे १६ कोटी ५६ लाख,     सिद्धनाथ शुगर तिºहे- ३३ कोटी ५८ लाख, जकराया शुगर वटवटे-१३ कोटी ५४ लाख,  भैरवनाथ विहाळ- ५ कोटी ६६ लाख, फॅबटेक- ५ कोटी २९ लाख, भैरवनाथ लवंगी- ९ कोटी ५७ लाख, युटोपियन कचरेवाडी- २७ कोटी १९ लाख, गोकुळ-२७ कोटी ५८ लाख,मातोश्री लक्ष्मी शुगर- २८ कोटी ८४ लाख, भैरवनाथ आलेगाव-३० कोटी ६९ लाख, बबनराव शिंदे, तुर्कपिंपरी- ८ कोटी ११ लाख, सीताराम महाराज खर्डी- १० कोटी ५७ लाख,जयहिंद शुगर- १६ कोटी ९० लाख, विठ्ठल रिफायनरी, पांडे- २८ कोटी ७० लाख. 

शासनाकडून बफर स्टॉक, गोडावून भाडे आदीचे येणे आहे ती रक्कम मिळाली तरी शेतकºयांचे संपूर्ण पैसे देता येतील. सॉप्टलोन  मिळाले नसल्याची अडचण आली. तरीही आठवडाभरात शेतकºयांचे पैसे देण्याची व्यवस्था केली जात आहे. आतापर्यंत ९३ टक्के पैसे दिले आहेत.- बब्रुवाहन माने-देशमुखचेअरमन, जयहिंद शुगर, आचेगाव

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेgovernment schemeसरकारी योजनाBanking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरीagricultureशेती