शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातील सहा कारखान्यांनी चुकती केली एफआरपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 15:33 IST

साखर उद्योग; २५ साखर कारखान्यांकडे आणखीन ५६९ कोटी थकबाकी

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतलामागील १५ दिवसात पाच कारखान्यांनी २६९ कोटी ४८ लाख रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा केले२५ कारखान्यांकडे तब्बल ५६८ कोटी ५९ लाख ७४ हजार रुपये थकबाकी

सोलापूर : यावर्षीचा साखर हंगाम घेतलेल्या सहा साखर कारखान्यांनी मे अखेरपर्यंत एफ.आर. पी.ची संपूर्ण रक्कम चुकती केली आहे. असे असले तरी उर्वरित २५ कारखान्यांकडे तब्बल ५६८ कोटी ५९ लाख ७४ हजार रुपये थकबाकी असल्याचे सोलापूर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले. मागील १५ दिवसात पाच कारखान्यांनी २६९ कोटी ४८ लाख रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा केले आहेत.

यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील ३१ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. यापैकी गोकुळ माऊली वगळता अन्य ३० कारखान्याने १५ मे पर्यंत ८३८ कोटी ७ लाख ११ हजार रुपये इतकी थकबाकी होती. ३१ मे पर्यंत यापैकी ५ कारखान्यांनी २६९ कोटी ४७ लाख ३७ हजार रुपये इतकी रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा केली आहे. यामध्ये सहकार शिरोमणी वसंतराव काळे,पांडुरंग श्रीपूर, संत दामाजी मंगळवेढा, विठ्ठल कॉर्पोरेशन व इंद्रेश्वर कारखान्याचा समावेश आहे. उर्वरित २५ कारखान्यांकडे ५६८ कोटी ५९ लाख ७४ हजार रुपये थकबाकी आहे.  हंगाम संपल्याने कारखाने बंद होऊन तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला असला तरी शेतकºयांच्या उसाचे पैसे दिले जात नाहीत; मात्र या आठवड्यात बºयाच कारखान्यांनी शेतकºयांचे पैसे चुकते करण्याची तयारी केली आहे.जिल्ह्यातील १५ कारखान्यांना सॉप्टलोन मंजूूर झाल्याने एफआरपीची रक्कम देता येणार आहे. 

कारखान्यांकडे असलेली देय रक्कम- आदिनाथ, करमाळा- दोन कोटी ३३ लाख, भीमा, टाकळी सिकंदर- १३ कोटी ३४ लाख, सिद्धेश्वर कुमठे- ४७ कोटी ९८ लाख,सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील- १२ कोटी ३३ लाख, श्री विठ्ठल गुरसाळे -६७ कोटी २२ लाख,विठ्ठलराव शिंदे- ७४ कोटी ४० लाख,श्री मकाई करमाळा- २१ कोटी ७४ लाख, संत कूर्मदास- ६ कोटी ४० लाख, लोकनेते बाबुरावअण्णा पाटील- ३२ कोटी २० लाख,  सासवड माळी शुगर-२२ कोटी ५३ लाख, लोकमंगल अ‍ॅग्रो बीबीदारफळ - ६ कोटी १९ लाख, लोकमंगल इथेनॉल भंडारकवठे १६ कोटी ५६ लाख,     सिद्धनाथ शुगर तिºहे- ३३ कोटी ५८ लाख, जकराया शुगर वटवटे-१३ कोटी ५४ लाख,  भैरवनाथ विहाळ- ५ कोटी ६६ लाख, फॅबटेक- ५ कोटी २९ लाख, भैरवनाथ लवंगी- ९ कोटी ५७ लाख, युटोपियन कचरेवाडी- २७ कोटी १९ लाख, गोकुळ-२७ कोटी ५८ लाख,मातोश्री लक्ष्मी शुगर- २८ कोटी ८४ लाख, भैरवनाथ आलेगाव-३० कोटी ६९ लाख, बबनराव शिंदे, तुर्कपिंपरी- ८ कोटी ११ लाख, सीताराम महाराज खर्डी- १० कोटी ५७ लाख,जयहिंद शुगर- १६ कोटी ९० लाख, विठ्ठल रिफायनरी, पांडे- २८ कोटी ७० लाख. 

शासनाकडून बफर स्टॉक, गोडावून भाडे आदीचे येणे आहे ती रक्कम मिळाली तरी शेतकºयांचे संपूर्ण पैसे देता येतील. सॉप्टलोन  मिळाले नसल्याची अडचण आली. तरीही आठवडाभरात शेतकºयांचे पैसे देण्याची व्यवस्था केली जात आहे. आतापर्यंत ९३ टक्के पैसे दिले आहेत.- बब्रुवाहन माने-देशमुखचेअरमन, जयहिंद शुगर, आचेगाव

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेgovernment schemeसरकारी योजनाBanking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरीagricultureशेती