शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सत्तासंघर्षाच्या निर्णयानंतर आदित्य ठाकरेंच्या ट्वीटवर सिमी गरेवाल यांची कमेंट, म्हणाल्या, "लोकशाही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 13:00 IST

काल सत्तासंघर्षाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या होत्या.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर काल सर्वोच्च न्यायालयाने दिला. सध्याचं महाराष्ट्रातील सरकार स्थिर असल्याचा निकाल जाहीर झाला. मात्र तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले. तसंच उद्धव ठाकरेंनी गडबडीत राजीनामा द्यायची गरज नव्हती. त्यांनी राजीनामा दिला नसता तर आज हे सरकार बेकायदेशीर ठरवलं असतं. या निर्णयानंतर सर्वच क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटू लागल्या. आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray)  ट्वीटवर अभिनेत्री सिमी गरेवालच्या (Simi Garewal) कमेंटने मात्र लक्ष वेधून घेतलं.

सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत लिहिले,"असंविधानिक, बेकायदा आणि अनैतिक. आजच्या निकालानंतर मिंधे भाजप सरकारकडे बघण्याचा हा एकच मार्ग आहे."

त्यांच्या या ट्वीटवर सिमी गरेवाल यांनी लिहिले,"काळजीचे कारण नाही. आता पुढे सगळं आमच्यावर महाराष्ट्राच्या जनतेवर अवलंबून आहे. हीच जनता मतदान करेल आणि अवैधरित्या प्रस्थापित झालेले सरकार पाडून लोकशाही पुन्हा अस्तित्वात आणेल."

सिमी गरेवाल यांच्या या कमेंटनंतर आदित्य ठाकरेंनीही त्यांचे आभार मानलेत. काल निर्णय जाहीर झाल्यानंतर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या होत्या. तसंच न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले मात्र तरी सध्याचं सरकार कायदेशीर आहे असाच शेवटी निर्णय दिला.  

टॅग्स :Simi Garewalसिमी गरेवालAditya Thackreyआदित्य ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारSupreme Courtसर्वोच्च न्यायालयdemocracyलोकशाही