शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत, काँग्रेसचे एवढे आमदार फुटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 11:49 IST

Maharashtra Political Update: गेल्या काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप होऊन उलथापालथ होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेसमध्येही राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप होऊन उलथापालथ होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेसमध्येही राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात असून, काँग्रेसचे १५ आमदार फुटून महायुतीसोबत जातील, असा दावा केला जात आहे. येत्या महिनाभरात या घडामोडी होतील, असा दावा केला जात आहे. 

सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार सध्या भारत जोडो न्याय यात्रेवर असलेले राहुल गांधी हे सध्या भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून देशभरात सरकार विरोधात वातावरणनिर्मिती केली जात आहे. ही यात्रा २० मार्च २०२४ रोजी मुंबईत समाप्त होणार आहे. ही भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात येत असतानाच काँग्रेसला धक्का देण्याचा महायुतीचा प्रयत्न असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीदरम्यानच हा भूकंप घडवून आणला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे. सध्याच्या गणितानुसार राज्यसभेच्या सहा पैकी ५ जागा महायुतीच्या आणि १ जागा महाविकास आघाडीची निवडून येऊ शकते. मात्र या निवडणुकीदरम्यान, काँग्रेसचे फुटीर आमदार महायुतीसोबत आल्यास  सगळी समीकरणं बिघडू शकतात. त्यामुळे या निवडणुकीवेळीच हे पक्षांतर होण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असलेले हे आमदार नेमके कोण आहेत, याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.  

टॅग्स :congressकाँग्रेसMLAआमदारBJPभाजपा