शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक वास्तव; वऱ्हाडात दहा महिन्यांत ९२८ शेतकरी आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 17:51 IST

अपुरा पाऊस व बोंडअळीच्या प्रकोपामुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. यामधून शेतक-यांना सावरण्यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली. मात्र, अटी शर्तींच्या निकषात शेतक-यांचा सात-बारा कोरा झालाच नाही.

अमरावती : अपुरा पाऊस व बोंडअळीच्या प्रकोपामुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. यामधून शेतक-यांना सावरण्यासाठी शासनाने कर्जमाफीची योजना राबविली. मात्र, अटी शर्तींच्या निकषात शेतक-यांचा सात-बारा कोरा झालाच नाही. शेतक-यांच्या संघर्षावर नैराष्य भारी पडत आहे. अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात यंदा आॅक्टोबर महिन्यापर्यंत ९२८ शेतकºयांनी मृत्युचा फास जवळ केला. दर दिवशी तीन शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. दुष्काळ, नापिकी यामुळे वाढलेले सावकारांचे व बँकांचे कर्ज, मुला-मुलींचे विवाह, शिक्षण आदी विवंचनेमुळे जगावं कसं? या विवंचनेत शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थी असणाºया शेतकºयाला मिळत नाही. योजना राबविणारी यंत्रणाच पारदर्शीपणे अंमलबजावणी करीत नसल्याने खरा शेतकरी वंचित राहत आहे व दरवर्षी कर्जाचा डोंगर वाढताच आहे. शासनस्तरावर १ जानेवारी २००१ पासून शेतकरी आत्महत्यांची नोंद स्वतंत्रपणे ठेवण्यात येते. त्यानुसार अमरावती विभागासह वर्धा जिल्ह्यात आॅक्टोबर २०१८ पर्यंत १५ हजार ६२९ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे. यामध्ये सात हजार ८ प्रकरणे पात्र, आठ हजार ४०६ अपात्र, तर २१५ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. दरवर्षी शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढताच असल्याचे चित्र दुर्देवी आहे. २००१ मध्ये ५२ प्रकरणे होती. २०१६ मध्ये १२३५, तर गतवर्षी ११७६ शेतकरी आत्महत्यांची नोंद झालेली आहे. यंदा जानेवारी महिन्यात  ९८, फेब्रुवारी ८४, मार्च ९६, एप्रिल ७८, मे ८४, जून ८६, जुलै ८९, आॅगस्ट १०६, सप्टेंबर १०४ व आॅक्टोबर महिन्यात १०३ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. 

१७ वर्षांत १५,६२९ शेतकरी आत्महत्यागेल्या १७ वर्षांत विभागासह वर्धा जिल्ह्यात १५,६२९ शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये अमरावती विभागात १३ हजार ९९८ शेतकºयांनी मृत्यूचा फास जवळ केला. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ३,५२५, अकोला २,१९९, यवतमाळ ४,१५९, बुलडाणा २,६४०, वाशिम १,४७५ व वर्धा जिल्ह्यात १,६३१ शेतक-यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत.

शेतकरी स्वावलंबी मिशन कुचकामीराज्यात शेतकरी आत्महत्याप्रवण असणा-या १४ जिल्ह्यांसाठी आघाडी सरकारने वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची स्थापना केली. राज्य शासनाने या मिशनला गती यावी, यासाठी २४ आॅगस्ट २०१५ रोजी पुनर्रचना केली. सध्या यवतमाळचे किशोर तिवारी या मिशनचे अध्यक्ष आहेत. मात्र, शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यास या मिशनला पूर्णपणे अपयश आले आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीFarmerशेतकरी