शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

वर्षा बंगला, काळी जादू अन् टोपलीभर लिंबू..; महाराष्ट्रात अंधश्रद्धेचं 'राजकारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 15:28 IST

वर्षा बंगल्यात काय घडलंय किंवा याआधी घडवलंय हा महाराष्ट्रातील जनतेसाठी चिंतेचा आणि संशोधनाचा विषय आहे असंही संजय राऊतांनी सांगितले. 

मुंबई - महाराष्ट्रात सध्या अंधश्रद्धेच्या राजकारणाने जोर धरला आहे. संजय राऊतानी केलेले विधान आणि त्यावर रामदास कदमांनी केलेला पलटवार यावरून चर्चेला उधाण आले आहे. राज्यात नवं सरकार येऊन २ महिने झाले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला गेलेत असा सवाल करत संजय राऊतांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्यावर रामदास कदमांनी उत्तर दिले. 

रामदास कदम म्हणाले की, ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद सोडून वर्षा बंगला सोडला तेव्हा तिथे टोपलीभर लिंबू सापडले असं एकनाथ शिदेंनी म्हटलं होते. काळी जादू काय ते राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारायला पाहिजे, काळी जादू काय त्यांना अधिक माहिती, कारण त्याचा अनुभव संजय राऊतांना जास्त असेल म्हणून त्यांच्या डोक्यात काळी जादूचं आलं असावं असा पलटवार रामदास कदमांनी केला.

रामदास कदमांच्या या उत्तरावर राऊतांनीही टोला लगावला. रामदास कदम हे काय स्वामी नाहीत त्यांचं ऐकायला, मुळात काळ्या जादूविषयी कुणी बोलायचे...ही अंधश्रद्धा आहे. जर असं कुणी बोलत असेल तर त्यांच्याविरोधात अंधश्रद्धा निर्मुलन समितीने बोलायला हवं. देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत. याचे उत्तर रामदास कदमांनी द्यावे किंवा एकनाथ शिंदे, भाजपा प्रवक्त्याने द्यावी असं संजय राऊतांनी म्हटलं. 

'वर्षा' बंगल्यात काय घडवलंय?

त्याशिवाय देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं कुटुंब वर्षा बंगल्यावर राहायला जायला का घाबरतायेत हा साधा प्रश्न आहे. तिथे मिरच्या, लिंबू आहेत असं मी काही म्हटलं नाही. वर्षा बंगला हा मुख्यमंत्र्‍यांचे अधिकृत निवासस्थान आहे. फडणवीस अद्याप बंगल्यात गेले नाही. रात्री तिथे झोपायला जात नाही. तुम्ही कसला भीताय?. तिथे काय घडलंय किंवा याआधी घडवलंय हा महाराष्ट्रातील जनतेसाठी चिंतेचा आणि संशोधनाचा विषय आहे असंही संजय राऊतांनी सांगितले. 

दरम्यान, मुख्यमंत्रीपद आणि वर्षा बंगला  ही पत आहे. मुख्यमंत्री म्हणून वर्षा बंगल्यावर जावं असं प्रत्येकाचं स्वप्न असते. परंतु पहिल्यांदाच असं पाहायला मिळतंय. देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यात पाय ठेवत नाहीत. अमृता वहिनींना तिथे जावं वाटत नाही. हे काय चाललंय, अनामिक भीतीमुळे मुख्यमंत्र्‍यांचे निवासस्थान बदलायचं चाललंय, हा बंगला पाडून नवीन बांधण्याचा ठरवला आहे. खोदकाम करून पुन्हा नवीन बांधला जाणार आहे अशी माहिती माझ्याकडे आहे असा दावाही संजय राऊतांनी केला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतRamdas Kadamरामदास कदमBJPभाजपा