शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

वर्षा बंगला, काळी जादू अन् टोपलीभर लिंबू..; महाराष्ट्रात अंधश्रद्धेचं 'राजकारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 15:28 IST

वर्षा बंगल्यात काय घडलंय किंवा याआधी घडवलंय हा महाराष्ट्रातील जनतेसाठी चिंतेचा आणि संशोधनाचा विषय आहे असंही संजय राऊतांनी सांगितले. 

मुंबई - महाराष्ट्रात सध्या अंधश्रद्धेच्या राजकारणाने जोर धरला आहे. संजय राऊतानी केलेले विधान आणि त्यावर रामदास कदमांनी केलेला पलटवार यावरून चर्चेला उधाण आले आहे. राज्यात नवं सरकार येऊन २ महिने झाले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला गेलेत असा सवाल करत संजय राऊतांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्यावर रामदास कदमांनी उत्तर दिले. 

रामदास कदम म्हणाले की, ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद सोडून वर्षा बंगला सोडला तेव्हा तिथे टोपलीभर लिंबू सापडले असं एकनाथ शिदेंनी म्हटलं होते. काळी जादू काय ते राऊतांनी उद्धव ठाकरेंना विचारायला पाहिजे, काळी जादू काय त्यांना अधिक माहिती, कारण त्याचा अनुभव संजय राऊतांना जास्त असेल म्हणून त्यांच्या डोक्यात काळी जादूचं आलं असावं असा पलटवार रामदास कदमांनी केला.

रामदास कदमांच्या या उत्तरावर राऊतांनीही टोला लगावला. रामदास कदम हे काय स्वामी नाहीत त्यांचं ऐकायला, मुळात काळ्या जादूविषयी कुणी बोलायचे...ही अंधश्रद्धा आहे. जर असं कुणी बोलत असेल तर त्यांच्याविरोधात अंधश्रद्धा निर्मुलन समितीने बोलायला हवं. देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाहीत. याचे उत्तर रामदास कदमांनी द्यावे किंवा एकनाथ शिंदे, भाजपा प्रवक्त्याने द्यावी असं संजय राऊतांनी म्हटलं. 

'वर्षा' बंगल्यात काय घडवलंय?

त्याशिवाय देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं कुटुंब वर्षा बंगल्यावर राहायला जायला का घाबरतायेत हा साधा प्रश्न आहे. तिथे मिरच्या, लिंबू आहेत असं मी काही म्हटलं नाही. वर्षा बंगला हा मुख्यमंत्र्‍यांचे अधिकृत निवासस्थान आहे. फडणवीस अद्याप बंगल्यात गेले नाही. रात्री तिथे झोपायला जात नाही. तुम्ही कसला भीताय?. तिथे काय घडलंय किंवा याआधी घडवलंय हा महाराष्ट्रातील जनतेसाठी चिंतेचा आणि संशोधनाचा विषय आहे असंही संजय राऊतांनी सांगितले. 

दरम्यान, मुख्यमंत्रीपद आणि वर्षा बंगला  ही पत आहे. मुख्यमंत्री म्हणून वर्षा बंगल्यावर जावं असं प्रत्येकाचं स्वप्न असते. परंतु पहिल्यांदाच असं पाहायला मिळतंय. देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यात पाय ठेवत नाहीत. अमृता वहिनींना तिथे जावं वाटत नाही. हे काय चाललंय, अनामिक भीतीमुळे मुख्यमंत्र्‍यांचे निवासस्थान बदलायचं चाललंय, हा बंगला पाडून नवीन बांधण्याचा ठरवला आहे. खोदकाम करून पुन्हा नवीन बांधला जाणार आहे अशी माहिती माझ्याकडे आहे असा दावाही संजय राऊतांनी केला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊतRamdas Kadamरामदास कदमBJPभाजपा