शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
6
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
7
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
8
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
9
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
10
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
11
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
12
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
13
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
14
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
15
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
16
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
17
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
18
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

पोलीस अधिकाऱ्याने लाठ्या घ्या रे म्हणताच; शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा काढता पाय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 4:33 PM

स्थानिक शिवसैनिकांनी पुराच्या ठिकाणी दिलेल्या भेटीदरम्यान पोलिसांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला.

मुंबई - नाशिक जिल्ह्यात पडत असलेल्या संततधार पावसाने गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे महापुराची परिस्थिती निर्माण होऊन औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील १७ गावांचा संपर्क तुटू शकतो. प्रशासनातर्फे सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहे. सोमवारी स्थानिक शिवसैनिकांनी पुराच्या ठिकाणी दिलेल्या भेटीदरम्यान पोलिसांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांशी अरेरावा भाषा करत असल्याने, एका अधिकाऱ्यांने लाठ्या घ्या रे हातात म्हणताच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर वायरल झाला आहे.

आठ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदी ओसंडून वाहत होती. त्यामुळे सर्व धरणांतील पाणी हे गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील गोदावरीच्या काठावरील गावे खाली करण्यात आली आहे. मात्र स्थानिकांच्या गर्दीने मदतकार्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

सोमवारी दुपारच्या सुमारास वैजापूर येथील शिवसेनच्या काही पदाधिकाऱ्यांनी पूर आलेल्या वांजरगाव येथे भेट दिली. यावेळी प्रशासन काहीच करत नसल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला. सेनेच्या नेत्यांची अरेरावी वाढतच चालल्याने वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी, लाठ्या घ्या रे हातात असे आदेश कर्मचाऱ्याना देताच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला.

एवढच नाही तर पोलिसांनी या नेत्यांना अक्षरशा हाकलून लावले. या घटनेचा व्हिडिओ सुद्धा सोशल मिडीयावर वायरल झाला आहे. ज्यात शिवसेनेचे नेते संजय पाटिल पोलिसांशी वाद घालत आहे. मात्र पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेनच्या या नेत्यांनी मात्र काढता पाय घेतला. परिसरात या घटनेची जोरदार चर्चा पहायला मिळत आहे.