शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

भाजपाच्या या रणनीतीमुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढणार, राज्यात नेमकं चाललंय तरी काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 14:32 IST

Shivsena Disqualification Case Verdict: आमदार अपात्रता प्रकरणामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. आता नार्वेकर यांच्या निकालामुळे राज्यातील राजकीय परिस्थितीत काही बदल होणार आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आमदार अपात्रता प्रकरणामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंचीशिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाकडून या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निकालामधून कुठलाही पक्ष हा खासगी मालमत्ता होऊ शकत नाही, हे अधोरेखित झाले आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता नार्वेकर यांच्या निकालामुळे राज्यातील राजकीय परिस्थितीत काही बदल होणार आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

२०१४ नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथी घडल्या  आहेत. त्यामुळे नार्वेकर यांनी दिलेल्या निकालामुळे आणखी काही आमुलाग्र परिवर्तन होईल, असं नाही. खरंतर शिवसेना ज्या कारणामुळे तुटली आहे. त्याचं कारण मागच्या दशकभरातील भाजपाच्या विस्तारवादी धोरणात आहे. मुंबई-ठाणे आणि कोकणपट्ट्याबाबेर शिवसेनेपासून भ्रमनिरास झालेल्या मतदारांना आपल्याकडे खेचले आहे. मुंबई-पुणे -नाशिक आदी शहरी भागांसह विदर्भ मराठवाड्यामधील शिवसेनेच्या मतदारालाही आपल्याकडे वळवण्यात भाजपा यशस्वी झाला  आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. त्यावेळी भाजपाने १२२ जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेला ६३ जागांवर समाधान मानावे लागले होते.  

दरम्यान, भाजपाचं हे विस्तारवादी धोरण सध्या भाजपासोबत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेसाठीही डोकेदुखी ठरू शकतं. आधीच अजित पवारांना महायुतीत घेऊन भाजपाने एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. आता भाजपा आणि शिंदे गटामधील युतीची कालमर्यादा ही अजित पवार गटाला सोबत घेऊन महाराष्ट्रात सरकार चालवण्याबाबत भाजपाच्या विश्वासावर अवलंबून आहे.

तसेच छोट्या पक्षांसोबत भाजपाची ज्याप्रकारे तडजोडी करते ते पाहता सध्यासाठी भाजपाचं एनडीए मॉडेल हे १९९९ ते २०१४ या काळात महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने राबवलेल्या व्यवस्थेचा नवा अवतार आहेत. त्यामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पश्चिम महाराष्ट्रातील ५८ जागांबाबत देवाणघेवाण होऊ शकते. या पश्चिम महाष्ट्रातील ग्रामीण भागात अजित पवार यांची ताकद आहे. तर शहरी भागात भाजपाचा वरचष्मा आहे. अशा परिस्थितीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं समिकरण जुळून येऊ शकतं.  मात्र भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये असं फार काही नाही आहे. ही बाब शिवसेना शिंदे गटासाठी अडचणीची ठरू शकते. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेRahul Narvekarराहुल नार्वेकरBJPभाजपा