शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

भाजपाच्या या रणनीतीमुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढणार, राज्यात नेमकं चाललंय तरी काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 14:32 IST

Shivsena Disqualification Case Verdict: आमदार अपात्रता प्रकरणामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. आता नार्वेकर यांच्या निकालामुळे राज्यातील राजकीय परिस्थितीत काही बदल होणार आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आमदार अपात्रता प्रकरणामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंचीशिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाकडून या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निकालामधून कुठलाही पक्ष हा खासगी मालमत्ता होऊ शकत नाही, हे अधोरेखित झाले आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता नार्वेकर यांच्या निकालामुळे राज्यातील राजकीय परिस्थितीत काही बदल होणार आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

२०१४ नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथी घडल्या  आहेत. त्यामुळे नार्वेकर यांनी दिलेल्या निकालामुळे आणखी काही आमुलाग्र परिवर्तन होईल, असं नाही. खरंतर शिवसेना ज्या कारणामुळे तुटली आहे. त्याचं कारण मागच्या दशकभरातील भाजपाच्या विस्तारवादी धोरणात आहे. मुंबई-ठाणे आणि कोकणपट्ट्याबाबेर शिवसेनेपासून भ्रमनिरास झालेल्या मतदारांना आपल्याकडे खेचले आहे. मुंबई-पुणे -नाशिक आदी शहरी भागांसह विदर्भ मराठवाड्यामधील शिवसेनेच्या मतदारालाही आपल्याकडे वळवण्यात भाजपा यशस्वी झाला  आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. त्यावेळी भाजपाने १२२ जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेला ६३ जागांवर समाधान मानावे लागले होते.  

दरम्यान, भाजपाचं हे विस्तारवादी धोरण सध्या भाजपासोबत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेसाठीही डोकेदुखी ठरू शकतं. आधीच अजित पवारांना महायुतीत घेऊन भाजपाने एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. आता भाजपा आणि शिंदे गटामधील युतीची कालमर्यादा ही अजित पवार गटाला सोबत घेऊन महाराष्ट्रात सरकार चालवण्याबाबत भाजपाच्या विश्वासावर अवलंबून आहे.

तसेच छोट्या पक्षांसोबत भाजपाची ज्याप्रकारे तडजोडी करते ते पाहता सध्यासाठी भाजपाचं एनडीए मॉडेल हे १९९९ ते २०१४ या काळात महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने राबवलेल्या व्यवस्थेचा नवा अवतार आहेत. त्यामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पश्चिम महाराष्ट्रातील ५८ जागांबाबत देवाणघेवाण होऊ शकते. या पश्चिम महाष्ट्रातील ग्रामीण भागात अजित पवार यांची ताकद आहे. तर शहरी भागात भाजपाचा वरचष्मा आहे. अशा परिस्थितीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं समिकरण जुळून येऊ शकतं.  मात्र भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये असं फार काही नाही आहे. ही बाब शिवसेना शिंदे गटासाठी अडचणीची ठरू शकते. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेRahul Narvekarराहुल नार्वेकरBJPभाजपा