शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

भाजपाच्या या रणनीतीमुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढणार, राज्यात नेमकं चाललंय तरी काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 14:32 IST

Shivsena Disqualification Case Verdict: आमदार अपात्रता प्रकरणामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. आता नार्वेकर यांच्या निकालामुळे राज्यातील राजकीय परिस्थितीत काही बदल होणार आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आमदार अपात्रता प्रकरणामध्ये महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. नार्वेकर यांनी एकनाथ शिंदेंचीशिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाकडून या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निकालामधून कुठलाही पक्ष हा खासगी मालमत्ता होऊ शकत नाही, हे अधोरेखित झाले आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता नार्वेकर यांच्या निकालामुळे राज्यातील राजकीय परिस्थितीत काही बदल होणार आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

२०१४ नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथी घडल्या  आहेत. त्यामुळे नार्वेकर यांनी दिलेल्या निकालामुळे आणखी काही आमुलाग्र परिवर्तन होईल, असं नाही. खरंतर शिवसेना ज्या कारणामुळे तुटली आहे. त्याचं कारण मागच्या दशकभरातील भाजपाच्या विस्तारवादी धोरणात आहे. मुंबई-ठाणे आणि कोकणपट्ट्याबाबेर शिवसेनेपासून भ्रमनिरास झालेल्या मतदारांना आपल्याकडे खेचले आहे. मुंबई-पुणे -नाशिक आदी शहरी भागांसह विदर्भ मराठवाड्यामधील शिवसेनेच्या मतदारालाही आपल्याकडे वळवण्यात भाजपा यशस्वी झाला  आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. त्यावेळी भाजपाने १२२ जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेला ६३ जागांवर समाधान मानावे लागले होते.  

दरम्यान, भाजपाचं हे विस्तारवादी धोरण सध्या भाजपासोबत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेसाठीही डोकेदुखी ठरू शकतं. आधीच अजित पवारांना महायुतीत घेऊन भाजपाने एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. आता भाजपा आणि शिंदे गटामधील युतीची कालमर्यादा ही अजित पवार गटाला सोबत घेऊन महाराष्ट्रात सरकार चालवण्याबाबत भाजपाच्या विश्वासावर अवलंबून आहे.

तसेच छोट्या पक्षांसोबत भाजपाची ज्याप्रकारे तडजोडी करते ते पाहता सध्यासाठी भाजपाचं एनडीए मॉडेल हे १९९९ ते २०१४ या काळात महाराष्ट्रामध्ये काँग्रेसने राबवलेल्या व्यवस्थेचा नवा अवतार आहेत. त्यामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पश्चिम महाराष्ट्रातील ५८ जागांबाबत देवाणघेवाण होऊ शकते. या पश्चिम महाष्ट्रातील ग्रामीण भागात अजित पवार यांची ताकद आहे. तर शहरी भागात भाजपाचा वरचष्मा आहे. अशा परिस्थितीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं समिकरण जुळून येऊ शकतं.  मात्र भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये असं फार काही नाही आहे. ही बाब शिवसेना शिंदे गटासाठी अडचणीची ठरू शकते. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेRahul Narvekarराहुल नार्वेकरBJPभाजपा