शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

Deepak Kesarkar : "कोण थुंकलं? तुमच्या ताटात काय जेवायला घातलं का मला?"; दीपक केसरकरांचं आव्हाडांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 10:12 IST

Shivsena Deepak Kesarkar Slams NCP Jitendra Awhad : दीपक केसरकरांनी आता जितेंद्र आव्हाडांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबई - शिवसेना आजवर ज्या ज्या वेळी फुटली त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचाच हात होता, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर (Shivsena Deepak Kesarkar) यांनी केला आहे. केसरकरांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP Jitendra Awhad) यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. अहो केसरकर किती बोलता शरद पवारांविरुद्ध... एकेकाळी शरद पवारांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच २०१४ला मीच साहेबांचा निरोप घेऊन आलो होतो. जिथे आहात तिथे सुखी राहा, असं म्हणत खाजवून खरूज काढू नका, असा सल्लाही जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता. 

दीपक केसरकरांनी आता जितेंद्र आव्हाडांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "आम्हीही राबराब राबतो. आमचंही मतदार संघात गुडविल असतं. मला जी सीट तुम्ही दिली होती, त्या जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार हा दोन वेळा पडला होता असं असताना ताटामध्ये कोण थुंकलं? तुमच्या ताटात काय जेवायला घातलं का मला?" असा संतप्त सवाल दीपक केसरकरांनी केला आहे. तसेच "आव्हाड वाईट शब्दांत बोलले, सीट देऊन कोणी माझ्यावर उपकार केले नाहीत. दोन वेळा राष्ट्रवादीचा उमेदवार पडला होता. ती सीट मला दिली. मी 25 हजार मतांनी निवडून आलो होतो."

"लोकांमध्ये आमचंही गुडविल असतं. आमच्या वाडवडिलांनी दानधर्म केलेला असतो. आम्ही राबराब राबतो आणि तुम्ही काहीही म्हणायचं? ताटामध्ये कोण थुंकला? तुमच्या ताटामध्ये काय जेवायला घातलं का मला?" असं दीपक केसरकरांनी म्हटलं आहे. TV9 मराठीला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. आपला पक्ष मोठा व्हावा तो सत्तेवर यावा ही पवाराचा इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण बाळासाहेबांना कधीच राष्ट्रवादीचा विचारधारा पटलेली नाही. त्यामुळे सामान्य शिवसैनिक राष्ट्रवादीसोबत जाणार नाही. ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रात शिवसेना फुटलेली आहे त्यामध्ये शरद पवारांचाच हात राहिला आहे ते त्यांचं वैशिष्ट्य आहे, असा घणाघात दीपक केसरकर यांनी याआधी केला होता. 

बाळासाहेब जिवंत होते त्यावेळी शिवसेना फोडून शरद पवारांनी त्यांना यातना का दिल्या? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, असं केसरकर म्हणाले. जनतेला कुणीच गृहीत धरू नये हे शरद पवारांना चांगलं माहित आहे. त्यांना जनतेची नस माहित आहे म्हणूनच ते शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र यायला हवी असं म्हणाले. नाहीतर राष्ट्रवादीनं एकट्यानं निवडून यावं, कारण त्यांना गेल्या अडीच वर्षात सत्तेचं टॉनिक मिळालं आहे. मग स्वबळावर निवडून आणा ना, असा टोला दीपक केसरकर यांनी लगावला होता.  

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस