शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
3
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
4
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
5
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
6
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
7
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
8
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
9
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
10
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
11
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
12
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
13
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
14
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
15
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
17
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
18
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
19
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
20
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे, मग तुम्ही स्वतः दुतोंड्या विषारी सापाची अवलाद आहात काय?, शिवसेनेचा अजित पवारांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 07:30 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे.  

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विखारी शब्दात टीका केली आहे. शिवसेनेला गांडुळाची उपमा देणारे अजित पवार हे छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद असल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे. सत्तेच्या खुर्च्या उबवून स्वत:चं हित पाहाणाऱ्या अजित पवारांचे महाराष्ट्रासाठी योगदान काय असा सवाल सामना संपादकीयमधून उपस्थित करण्यात आला आहे. गांडुळास दोन तोंडे आहेत की चार तोंडे याचा शोध नंतर लावू, पण तुम्ही मात्र रावणाप्रमाणे दहा तोंडांनी बोलत असता. प्रश्न इतकाच आहे की, शिवसेनेने सत्तेत राहून काय केले असा प्रश्न तुम्हाला आता पडाला आहे, पण इतकी वर्षे सत्तेच्या खुर्च्या उबवून फक्त स्वतःचे हित साधण्यापलीकडे आपले महाराष्ट्रासाठी नक्की योगदान ते काय? शेतकरी हक्काचे पाणी मागायला तुमच्याकडे आला तेव्हा तुम्ही त्यांना ‘मूत्र’ पाजण्याची भाषा केलीत. हेच तुमचे शेतकरीप्रेम! मग त्या अर्थाने  तुम्हाला दुतोंडी साप म्हणणे हा त्या सापाचाही अपमान ठरेल. तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद आहात असं म्हणावे लागेल, अशा शब्दात सामनातून टीका करण्यात आली आहे.सामना संपादकीयमध्ये म्हटलं आहे की, अजित पवार यांचे राजकारण आता बारामतीपुरतेसुद्धा उरलेले नाही. मागच्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी अजित पवारांना जवळजवळ माती खायला लावलीच होती. अनेक दिवस ते त्या मातीत गाडलेले आपले तोंड बाहेर काढायला तयार नव्हते. महापालिका निवडणुकीत पुणे व पिंपरी-चिंचवडचे संस्थानही धुळीस मिळाले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांच्या पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपदही राहिलेले नाही. त्यांच्या पक्षाचा जीर्ण सांगाडा झाला आहे. तरीही हे सांगाडे ‘हल्लाबोल’ यात्रेच्या नावाखाली उसने अवसान आणत आहेत हा विनोदच म्हणायला हवा. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अजित पवारांची पत ती काय, पण तरीही त्यांच्या जिभेचा गांडूळ अधूनमधून वळवळत असतो. कालच त्यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात बोलताना शिवसेनेची संभावना ‘गांडुळाची अवलाद’ अशी केली. शिवसेनेच्या गांडुळाचे तोंड इकडे की तिकडे कळत नाही असे ते म्हणाले. आता आमच्या गांडुळाचा मुका घेण्याचा प्रयत्न अजित पवारांनी कधी केला हे त्यांनी एकदा सांगून टाकावे. अजित पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणात कुणी गांभीर्याने घेत नाही. त्यांना जो काही मानसन्मान आतापर्यंत मिळाला तो त्यांच्या आदरणीय काकांमुळे. पण काकांनी संपूर्ण संधी व पाठबळ देऊनही अजित पवारांना नेतृत्व उभे करता आले नाही. कारण त्यांचे तोंड व जीभ म्हणजे भ्रष्ट गटार आहे व येणाऱ्या-जाणाऱ्यांवर त्यांच्या गटारी तोंडाने थुंकून ते घाण करीत असतात. काकांनी पन्नास वर्षांत कमावले ते अजित पवारांनी अल्पावधीत गमावल्यामुळेच शरद पवारांना ७५ व्या वर्षीसुद्धा पक्षबांधणीसाठी वणवण करावी लागत आहे. अजित पवार म्हणतात की, शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे. मग काय हो अजितराव, तुम्ही स्वतः दुतोंड्या विषारी सापाची अवलाद आहात काय? गांडूळ हा निदान शेतकऱ्यांचा मित्र तरी आहे. गांडुळास दोन तोंडे आहेत की चार तोंडे याचा शोध नंतर लावू, पण तुम्ही मात्र रावणाप्रमाणे दहा तोंडांनी बोलत असता. प्रश्न इतकाच आहे की, शिवसेनेने सत्तेत राहून काय केले असा प्रश्न तुम्हाला आता पडाला आहे, पण इतकी वर्षे सत्तेच्या खुर्च्या उबवून फक्त स्वतःचे हित साधण्यापलीकडे आपले महाराष्ट्रासाठी नक्की योगदान ते काय? शेतकरी हक्काचे पाणी मागायला तुमच्याकडे आला तेव्हा तुम्ही त्यांना ‘मूत्र’ पाजण्याची भाषा केलीत. हेच तुमचे शेतकरीप्रेम! मग त्या अर्थाने  तुम्हाला दुतोंडी साप म्हणणे हा त्या सापाचाही अपमान ठरेल. तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद आहात असे म्हणावे लागेल. जो गुन्हा छिंदमने केला तोच गुन्हा मंत्रीपदावर असताना तुम्ही तेव्हा केला. सत्तेत असताना काही केले नाही व विरोधी पक्षात असतानाही तोंडास बूच मारूनच बसले. शेतकऱ्यांच्या  कर्जमाफीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेवर असल्यापासूनच शिवसेना रान उठवीत आली व भाजप सत्तेवर आला तरी शिवसेनेने कर्जमुक्तीचा नारा सोडला नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आवाज चढवून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शिवसेनेने करून घेतली आणि सत्तेत असून महाराष्ट्राच्या व जनतेच्या हितासाठी आवाज उठविण्याचे काम शिवसेनाच एका कर्तव्यभावनेने करीत असते. जेव्हा तुम्ही सलग १५ वर्षे

सत्तेत खुर्च्या उबवीत होता तेव्हा तुम्ही महाराष्ट्रहिताचे काय दिवे लावले? जमीन घोटाळे व पाणी घोटाळे याशिवाय तुम्ही काय केलेत? पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना जलसंधारण घोटाळय़ाचे स्फोट केले गेले. तेव्हा ‘तो मी नव्हेच’चा आव आणून तुम्हालाही मंत्रिमंडळातून बाहेर पडता आले असते. पण दुतोंडी सापाच्याच अवलादीप्रमाणे काँग्रेजी चिखलात सत्ता उबवीत वळवळत राहिलात ना? आजही त्याच जलसंधारण भ्रष्टाचाराच्या चौकशीचा फास गळ्याभोवती आवळला जाण्याची भीती असल्यानेच काही कारण नसता शिवसेनेवर चिखलफेक करताय व दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली मंत्रीपद गमावलेल्या खडसेंच्या पायाचे तीर्थ प्राशन करताय. आज महाराष्ट्रात सरकार शिवसेनेचे नाही. ते २०१९ साली नक्कीच येईल. तेव्हा शेतकऱ्यांच्या जीवनात ‘मूत्र’ कालवणाऱ्या भ्रष्ट छिंदम अवलादीच्या अजित पवारांची गय केली जाणार नाही. अजित पवारांसह त्यांच्या भ्रष्ट मित्रमंडळाची जागा भुजबळांबरोबर तुरुंगातच आहे. त्या भयानेच भाजपचे ‘बूट’ चाटीत हे महाशय शिवसेनेवर हल्ला करीत आहेत. अजित पवारांवर लिहिण्यासारखे प्रचंड आहे, पण त्या गटारास ‘सामना’त इतकी जागा देण्याची गरज नाही व तेवढी त्यांची लायकीही नाही. ज्या काँग्रेस पक्षाशी २०१४ साली निवडणूक युती तोडलीत त्याच काँग्रेसबरोबर अजित पवार पुन्हा बोहल्यावर का चढत आहेत? दुतोंडी गांडुळांनाच हे जमू शकेल. अजित पवार, स्वतःला सांभाळा. तुमच्या झोकांड्या जात आहेत. तुमचे नेतृत्वाचे विमान कधीच उडाले नव्हते. या विमानाची चाके जमिनीवरच आहेत, तुमचे डोके वेगळ्यास नशेने उडते आहे. डोके तपासून घ्या. तुमचा छिंदम झाला आहे!

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस