शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

...तर शिक्षण मंत्रालयाचे अवजड उद्योग खाते होईल, नव्या शैक्षणिक धोरणावर शिवसेनेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 09:43 IST

शाळेतून बाहेर पडताना विद्यार्थ्याला किमान एक कौशल्य प्राप्त व्हावे, असे हे शैक्षणिक धोरण आहे,असे हे सरकार म्हणते. पण कौशल्य घेऊन बाहेर पडणाऱ्यांसाठी सरकारने रोजगार हमी केंद्रे उभारली. तरच फायदा होईल. नाहीतर नेहमीप्रमाणे शिक्षणाच्या आयचा घो होईल.

ठळक मुद्दे या शैक्षणिक धोरणामुळे देशातील शिक्षणात आमुलाग्र बदल होतील, तसे बदल झाले तर आनंदच पाचवीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेतून केले हे चांगले केले. पण मातृभाषेचे शिक्षण हे फक्त सरकारी शाळांपुरते मर्यादित राहू नये कौशल्य विकासावर भर देऊ असे या धोरणात सांगण्यात आले आहे. मात्र  कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यांना रोजगाराची हमी मिळेल काय? 

मुंबई - केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाला नुकतीच मान्यता दिली आहे. या शैक्षणिक धोरणामुळे सध्याच्या शिक्षणव्यवस्थेच्या आकृतिबंधामध्ये आमुलाग्र बदल होणार आहेत. तसेच बोर्ड परीक्षांचे महत्त्व कमी होऊन विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासास प्राधान्य देण्यात येईल, असा दावा करण्यात येत आहे. मात्र केंद्र सरकारच्या या नव्या शैक्षणिक धोरणावर शिवसेनेने जोरदार टीका केली आहे.

नव्या शैक्षणिक धोरणात परीक्षेचे महत्त्व कमी केले आहे. या धोरणामुळे देशातील शिक्षणात आमुलाग्र बदल होतील, असे सांगितले गेले. तसे बदल झाले तर आनंदच आहे. शाळेतून बाहेर पडताना विद्यार्थ्याला किमान एक कौशल्य प्राप्त व्हावे, असे हे शैक्षणिक धोरण आहे,असे हे सरकार म्हणते. पण कौशल्य घेऊन बाहेर पडणाऱ्यांसाठी सरकारने रोजगार हमी केंद्रे उभारली. तरच फायदा होईल. नाहीतर नेहमीप्रमाणे शिक्षणाच्या आयचा घो होईल किंवा शिक्षण मंत्रालयाचे अवजड उद्योग खाते होईल, असा टोला शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून लगावण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे शैक्षणिक धोरण बदलून एक चांगले काम केले आहे. फ्रान्सवरून आलेल्या राफेल विमानांपेक्षा हे महत्त्वाचे आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे याआधी अवजड अवघड उद्योग मंत्रालयाप्रमाणे मनुष्यबळ विकास मंत्रालय होते. त्याचे नामकरण आता शिक्षण मंत्रालय असे झाले आहे. या शिक्षण धोरणावर नेमका कुठल्या तज्ज्ञांचा हात फिरला हे सांगता येणार नाही. मात्र पाचवीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेतून केले हे चांगले केले. पण मातृभाषेचे शिक्षण हे फक्त सरकारी शाळांपुरते मर्यादित राहू नये. इंग्रजी माध्यमांच्या शाळा, कॉन्व्हेंट, आंतरराष्ट्रीय शाळा यांना हा नियम कसा लागू करणार हे स्पष्ट झाले पाहिजे, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

नव्या धोरणामधून दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्या. त्यांचे बोर्ड रद्द करून ५+३+३+४ असा नवा बार केंद्राने उडवला आहे. यापुढचे शिक्षण हे नुसते पदवीधर निर्माण करणारे कारखाने नसतील तर व्यवहारी आणि व्यावसायिक स्वरूपाचे असेल. कौशल्य विकासावर भर देऊ असे या धोरणात सांगण्यात आले आहे. मात्र  कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यांना रोजगाराची हमी मिळेल काय? असा सवालही शिवसेनेने विचारला आहे.

तसेच गुणवत्तेची आणि टक्केवारीची स्पर्धाच मोदी सरकारने संपवून टाकली आहे. गुवत्तेच्या निकषावर राज्यही चालत नाही, तिथे शिक्षणाचे काय. नव्या शैक्षणिक धोरणातील अभ्यासक्रम कोणत्या विद्यापीठात तयार करणार व हे तज्ज्ञ कोणत्या शाखेतून येत आहेत, हे समजून घेणे औत्सुक्याचे आहे. महाराष्ट्रात विद्यापीठाच्या परीक्षा घ्याच असा हेल लावणाऱ्यांनी हे शैक्षणिक धोरण वाचायला हवे, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रCentral Governmentकेंद्र सरकारEducationशिक्षणNarendra Modiनरेंद्र मोदीShiv Senaशिवसेना