शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Coronavirus : कोरोनाची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना पहिली पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 12:59 IST

Covid 19 Second Wave : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान उत्तम कार्य करणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना मिळाली पसंती.

ठळक मुद्देकोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान उत्तम कार्य करणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना मिळाली पसंती.ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांनी ट्विटरच्या माध्यमातून घेतला होता पोल.

सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजला आहे. अशा परिस्थितीत अनेक राज्ये आपल्या पातळीवरही कोरोनाची परिस्थिती हाताळण्याचा आणि नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला होता. याशिवाय सर्वाधिक रुग्णसंख्याही महारातूनच समोर येत होती. परंतु आता राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सर्वोत्तम कामगिरी करणारे मुख्यमंत्री कोण असा पोल ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला यांनी ट्विटरच्या माध्यमातून घेतला होता. प्रभू चावला यांनी घेतलेल्या पोलनुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळली आहे असा कल देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांना ६२ टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळाली. शिवसेना समर्थकांकडून या पोलचा स्क्रीनशॉट सध्या व्हायरल करण्यात येत आहे.

कोणत्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं? असा प्रश्न प्रभु चावला यांनी ट्विटरच्या पोलद्वारे विचारला होता. त्यांनी दोन पोलद्वारे आठ मुख्यमंत्र्यांची नावं निवडली होती. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केरचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि कर्नाटकचे बी.ए. येडियुरप्पा यांच्या नावांचा समावेश होता.  पहिल्या पोलमध्ये तब्बल २,६७,२४८ जणांनी आपलं मत नोंदवलं. तर दुसऱ्या पोलमध्ये २,३४,२६१ जणांनी आपलं मत नोंदवलं. पहिल्या पोलमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ६२.५ टक्के, तर योगी आदित्यनाथ यांना ३१.६ टक्के, पिनराई विजयन यांचा १.३ टक्के आणि अरविंद केजरीवाल यांना ४.६ टक्के मतं मिळाली.तर याच प्रश्नावर आधारित असलेल्या दुसऱ्या पोलमध्ये शिवराज सिंह चौहान यांना ४९ टक्के, तर नवीन पटनायक यांना ४८.८ टक्के मतं मिळाली. कॅप्टन अमरिंदर सिंग यांना १.७ आणि बी.एस.येडियुरप्पा यांना ०.५ टक्के मतं मिळाल्याचं दिसून आलं आहे. या पोलच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान चांगली कामगिरी करणारे मुख्यमंत्री ठरल्याचं शिवसेना समर्थक सोशल मीडियाद्वारे म्हणत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेyogi adityanathयोगी आदित्यनाथKeralaकेरळUttar Pradeshउत्तर प्रदेशMadhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानPunjabपंजाबdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल