शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

उद्धवसेना-काँग्रेसमध्ये पडली वादाची ठिणगी, विधान परिषद निवडणुकीचे निमित्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 07:40 IST

Mahavikas Aghadi News: विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारीवरून उद्धवसेना व काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघांची उमेदवारी मागे घ्या, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

 मुंबई - विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारीवरून उद्धवसेना व काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघांची उमेदवारी मागे घ्या, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन केला; मात्र त्यांनी तो उचलला नाही, अशी त्यांची तक्रार आहे. तर या विधान परिषद जागांवर उद्धवसेनेची कामगिरी चांगली असल्यानेच या चारही जागांवर उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची भूमिका विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केली आहे. 

पटोले म्हणाले, उद्धव ठाकरे लंडनला गेले होते. त्यावेळी त्यांना फोन केला होता. तेव्हा आम्ही त्यांना सांगितले होते की  विधान परिषदेच्या दोन जागा आम्ही लढतो. दोन जागा तुम्ही लढा. त्यानंतर त्यांनी आम्हाला विचारले की तुमचे उमेदवार कोण आहेत? त्यानंतर मी त्यांना उमेदवारांची नावे सांगितली. यानंतर त्यांनी आमच्या नाशिकच्या उमेदवाराला बोलावून घेतले आणि त्यांच्याकडून तिकीट जाहीर केले, असे म्हणत पटोले यांनी नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीतील सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला असता तर चारही जागा जिंकणे आम्हाला सोपे झाले असते. मात्र, त्यांनी चारही जागा परस्पर घोषित केल्या, असेही ते म्हणाले.   

दोन्ही पक्ष आमनेसामनेउद्धवसेनेकडून मुंबई पदवीधर मतदारसंघातून माजी मंत्री अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यापाठोपाठ नाशिक शिक्षक मतदारसंघात संदीप गुळवे यांना तर कोकण पदवीधर मतदारसंघातून किशोर जैन यांना उद्धवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसकडून कोकण पदवीधर मतदारसंघात रमेश कीर यांना तर नाशिक शिक्षक मतदारसंघात दिलीप पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उद्या उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे.  

 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक