शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

उद्धवसेना-काँग्रेसमध्ये पडली वादाची ठिणगी, विधान परिषद निवडणुकीचे निमित्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 07:40 IST

Mahavikas Aghadi News: विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारीवरून उद्धवसेना व काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघांची उमेदवारी मागे घ्या, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

 मुंबई - विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारीवरून उद्धवसेना व काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघांची उमेदवारी मागे घ्या, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन केला; मात्र त्यांनी तो उचलला नाही, अशी त्यांची तक्रार आहे. तर या विधान परिषद जागांवर उद्धवसेनेची कामगिरी चांगली असल्यानेच या चारही जागांवर उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची भूमिका विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केली आहे. 

पटोले म्हणाले, उद्धव ठाकरे लंडनला गेले होते. त्यावेळी त्यांना फोन केला होता. तेव्हा आम्ही त्यांना सांगितले होते की  विधान परिषदेच्या दोन जागा आम्ही लढतो. दोन जागा तुम्ही लढा. त्यानंतर त्यांनी आम्हाला विचारले की तुमचे उमेदवार कोण आहेत? त्यानंतर मी त्यांना उमेदवारांची नावे सांगितली. यानंतर त्यांनी आमच्या नाशिकच्या उमेदवाराला बोलावून घेतले आणि त्यांच्याकडून तिकीट जाहीर केले, असे म्हणत पटोले यांनी नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीतील सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला असता तर चारही जागा जिंकणे आम्हाला सोपे झाले असते. मात्र, त्यांनी चारही जागा परस्पर घोषित केल्या, असेही ते म्हणाले.   

दोन्ही पक्ष आमनेसामनेउद्धवसेनेकडून मुंबई पदवीधर मतदारसंघातून माजी मंत्री अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यापाठोपाठ नाशिक शिक्षक मतदारसंघात संदीप गुळवे यांना तर कोकण पदवीधर मतदारसंघातून किशोर जैन यांना उद्धवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसकडून कोकण पदवीधर मतदारसंघात रमेश कीर यांना तर नाशिक शिक्षक मतदारसंघात दिलीप पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उद्या उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे.  

 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेUddhav Thackerayउद्धव ठाकरेVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक