शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Ramdas Kadam vs Uddhav Thackeray: "मी कच्चा खिलाडी नाही अन् घोडं मैदानही लांब नाही..."; रामदास कदमांचा उद्धव ठाकरे गटाकडे रोख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 14:07 IST

रामदास कदमांनी व्यक्त केली खदखद; पक्षनेतृत्वाला विचारले सवाल

Ramdas Kadam vs Uddhav Thackeray: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ( Shiv Sena ) पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. सुरूवातील राज्यसभेच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने ( BJP ) महाविकास आघाडीला धक्का दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली. ५०पेक्षा जास्त आमदारांचे पाठबळ घेऊन त्यांनी भाजपासोबत सत्ता स्थापना केली. शिंदे गटावर सातत्याने टीका होत असताना कोकणातील शिवसेनेचे ज्येष्ठ व अनुभवी नेते रामदाम कदम यांची शिवसेनेच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली. मी कच्चा खिलाडी नाही अन् घोडं मैदान जवळच आहे, असा एका अर्थाने इशाराच त्यांनी उद्धव ठाकरे गटाला दिला. ( Maharashtra Political Crisis )

रामदाम कदम यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला की, अनिल परब, संजय राऊत यांसारखे नेतेमंडळी विठ्ठलाच्या आजूबाजूचे बडवे आहेत असं शिंदे गटातील अनेक लोक बोलत आहेत. तुमच्या मते ते बडवे खरंच कोण आहेत, आणि त्यांच्या वर्तणुकीमुळे खरंच शिवसेनेला फटका बसला आहे का? या प्रश्नाचं एबीपीमाझाला उत्तर देताना रामदास कदम म्हणाले, "मला आज नावं घ्यायला लावू नका. कारण नावं सगळ्यांना माहिती आहेत. नावं तुम्हीच घेतली आहेत पण तुम्हाला माझ्या तोंडून वदवून घ्यायचं आहे. पण मी तेवढा कच्चा खिलाडी नाही. योग्य वेळ आली की नक्कीच ती नावं पण घेईन. घोडं मैदान लांब नाही. मी काही गोष्टी आज पहिल्यांदाच लोकांसमोर बोललो आहे. त्यामुळे रामदास कदमला उगाच बोलवलं असा पश्चात्ताप तुम्हाला होणार नाही."

"पक्षाने नवं नेतृत्वाला संधी द्यायला हवी असं माझंही मत आहे. पण मग सुभाष देसाईंना सातत्याने संधी का? मनिषा कायंदे, प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेनेकडून आमदारकी, खासदारकीची उमेदवारी दिली. त्यांनी शिवसेनेसाठी काय योगदान दिलं होतं? जे लोक ५२ वर्ष काम करत आहेत, त्यांना तुम्ही दूर लोटता. आणि सुभाष देसाईंनी जेव्हा महाविकास आघाडी सरकारमधून शपथ घेतली त्यावेळी संपूर्ण मैदानात शांतता होती. कोणालाही जल्लोष करावासा वाटला नाही. तेच एकनाथ शिंदेंनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा मात्र त्यांचा, बाळासाहेबांच्या नावाचा आणि शिवसेनेचा जयघोष सुरू होता", असाही रोखठोक मुद्दा रामदास कदमांनी मांडला.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळRamdas Kadamरामदास कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत