शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

Ramdas Kadam vs Uddhav Thackeray: "मी कच्चा खिलाडी नाही अन् घोडं मैदानही लांब नाही..."; रामदास कदमांचा उद्धव ठाकरे गटाकडे रोख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 14:07 IST

रामदास कदमांनी व्यक्त केली खदखद; पक्षनेतृत्वाला विचारले सवाल

Ramdas Kadam vs Uddhav Thackeray: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ( Shiv Sena ) पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. सुरूवातील राज्यसभेच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने ( BJP ) महाविकास आघाडीला धक्का दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली. ५०पेक्षा जास्त आमदारांचे पाठबळ घेऊन त्यांनी भाजपासोबत सत्ता स्थापना केली. शिंदे गटावर सातत्याने टीका होत असताना कोकणातील शिवसेनेचे ज्येष्ठ व अनुभवी नेते रामदाम कदम यांची शिवसेनेच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली. मी कच्चा खिलाडी नाही अन् घोडं मैदान जवळच आहे, असा एका अर्थाने इशाराच त्यांनी उद्धव ठाकरे गटाला दिला. ( Maharashtra Political Crisis )

रामदाम कदम यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला की, अनिल परब, संजय राऊत यांसारखे नेतेमंडळी विठ्ठलाच्या आजूबाजूचे बडवे आहेत असं शिंदे गटातील अनेक लोक बोलत आहेत. तुमच्या मते ते बडवे खरंच कोण आहेत, आणि त्यांच्या वर्तणुकीमुळे खरंच शिवसेनेला फटका बसला आहे का? या प्रश्नाचं एबीपीमाझाला उत्तर देताना रामदास कदम म्हणाले, "मला आज नावं घ्यायला लावू नका. कारण नावं सगळ्यांना माहिती आहेत. नावं तुम्हीच घेतली आहेत पण तुम्हाला माझ्या तोंडून वदवून घ्यायचं आहे. पण मी तेवढा कच्चा खिलाडी नाही. योग्य वेळ आली की नक्कीच ती नावं पण घेईन. घोडं मैदान लांब नाही. मी काही गोष्टी आज पहिल्यांदाच लोकांसमोर बोललो आहे. त्यामुळे रामदास कदमला उगाच बोलवलं असा पश्चात्ताप तुम्हाला होणार नाही."

"पक्षाने नवं नेतृत्वाला संधी द्यायला हवी असं माझंही मत आहे. पण मग सुभाष देसाईंना सातत्याने संधी का? मनिषा कायंदे, प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेनेकडून आमदारकी, खासदारकीची उमेदवारी दिली. त्यांनी शिवसेनेसाठी काय योगदान दिलं होतं? जे लोक ५२ वर्ष काम करत आहेत, त्यांना तुम्ही दूर लोटता. आणि सुभाष देसाईंनी जेव्हा महाविकास आघाडी सरकारमधून शपथ घेतली त्यावेळी संपूर्ण मैदानात शांतता होती. कोणालाही जल्लोष करावासा वाटला नाही. तेच एकनाथ शिंदेंनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा मात्र त्यांचा, बाळासाहेबांच्या नावाचा आणि शिवसेनेचा जयघोष सुरू होता", असाही रोखठोक मुद्दा रामदास कदमांनी मांडला.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळRamdas Kadamरामदास कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत