शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

Ramdas Kadam vs Uddhav Thackeray: "मी कच्चा खिलाडी नाही अन् घोडं मैदानही लांब नाही..."; रामदास कदमांचा उद्धव ठाकरे गटाकडे रोख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 14:07 IST

रामदास कदमांनी व्यक्त केली खदखद; पक्षनेतृत्वाला विचारले सवाल

Ramdas Kadam vs Uddhav Thackeray: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ( Shiv Sena ) पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. सुरूवातील राज्यसभेच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने ( BJP ) महाविकास आघाडीला धक्का दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी शिवसेनेशी बंडखोरी केली. ५०पेक्षा जास्त आमदारांचे पाठबळ घेऊन त्यांनी भाजपासोबत सत्ता स्थापना केली. शिंदे गटावर सातत्याने टीका होत असताना कोकणातील शिवसेनेचे ज्येष्ठ व अनुभवी नेते रामदाम कदम यांची शिवसेनेच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली. मी कच्चा खिलाडी नाही अन् घोडं मैदान जवळच आहे, असा एका अर्थाने इशाराच त्यांनी उद्धव ठाकरे गटाला दिला. ( Maharashtra Political Crisis )

रामदाम कदम यांना एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला की, अनिल परब, संजय राऊत यांसारखे नेतेमंडळी विठ्ठलाच्या आजूबाजूचे बडवे आहेत असं शिंदे गटातील अनेक लोक बोलत आहेत. तुमच्या मते ते बडवे खरंच कोण आहेत, आणि त्यांच्या वर्तणुकीमुळे खरंच शिवसेनेला फटका बसला आहे का? या प्रश्नाचं एबीपीमाझाला उत्तर देताना रामदास कदम म्हणाले, "मला आज नावं घ्यायला लावू नका. कारण नावं सगळ्यांना माहिती आहेत. नावं तुम्हीच घेतली आहेत पण तुम्हाला माझ्या तोंडून वदवून घ्यायचं आहे. पण मी तेवढा कच्चा खिलाडी नाही. योग्य वेळ आली की नक्कीच ती नावं पण घेईन. घोडं मैदान लांब नाही. मी काही गोष्टी आज पहिल्यांदाच लोकांसमोर बोललो आहे. त्यामुळे रामदास कदमला उगाच बोलवलं असा पश्चात्ताप तुम्हाला होणार नाही."

"पक्षाने नवं नेतृत्वाला संधी द्यायला हवी असं माझंही मत आहे. पण मग सुभाष देसाईंना सातत्याने संधी का? मनिषा कायंदे, प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेनेकडून आमदारकी, खासदारकीची उमेदवारी दिली. त्यांनी शिवसेनेसाठी काय योगदान दिलं होतं? जे लोक ५२ वर्ष काम करत आहेत, त्यांना तुम्ही दूर लोटता. आणि सुभाष देसाईंनी जेव्हा महाविकास आघाडी सरकारमधून शपथ घेतली त्यावेळी संपूर्ण मैदानात शांतता होती. कोणालाही जल्लोष करावासा वाटला नाही. तेच एकनाथ शिंदेंनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा मात्र त्यांचा, बाळासाहेबांच्या नावाचा आणि शिवसेनेचा जयघोष सुरू होता", असाही रोखठोक मुद्दा रामदास कदमांनी मांडला.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळRamdas Kadamरामदास कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत