शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ST कर्मचाऱ्यांचा पुळका आणणारे खोत, पडळकर, सदावर्ते आता कुठे गेले? शिवसेनेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 16:46 IST

एसटीच्या निधीला कात्री लावल्याचे सांगितले जात असून, ऐन सणासुदीच्या काळात ST कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra Politics: राज्यात एकीकडे विविध स्तरांवरील निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना, दुसरीकडे मात्र एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार की काय, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. नव्या शिंदे-फडणवीस सरकारने एसटी महामंडळाच्या निधीला कात्री लावल्याचे सांगितले जात असून, ऐन दसरा-दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात ST कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रणीत महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने सत्ताधारी शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधताना, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना, त्यांचा पुळका आणणारे सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, गुणरत्न सदावर्ते आता कुठे गेलेत? असा खरमरीत सवाल केला आहे. 

शिवसेनाप्रणीत महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी एसटी महामंडळाला देण्यात येणाऱ्या निधीला कात्री लावल्याच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील ३६० कोटींचे वेतनाचे अनुदान १०० कोटींवर आणून कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्यात आलाय, असा दावाही यावेळी करण्यात आला. या विषयावर कोणीही बोलायला तयार नाही, असा आरोपही करण्यात आला आहे. 

खोत, पडळकर, सदावर्ते आता कुठे गेले?

महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळात त्यांचा पुळका आणणारे सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, गुणरत्न सदावर्ते आता कुठे गेलेत? तेव्हा खोटे खोटे आश्वासन दिले, अशी टीका करताना एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी दरमहा पगारासाठी ३६० कोटी रूपये दिले जातील, असा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. आता शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर एसटी महामंडळाच्या पगारासाठी फक्त १०० कोटी रुपये अनुदान दिले जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे पगाराचे जे हप्ते आहेत, उदा; एलआयसी, पीएफ, घर बांधनी कर्ज दिल्या जाणाऱ्या पगारातून सध्या होत नाही. फक्त निव्वळ वेतन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, अशा वातावरणात एखाद्या कर्मचाऱ्यांचे निधन झाले, एखादी दुर्घटना घडली तर त्याला यामधून कोणतीही अनुदान मिळणार नाही, तो या मोबदल्यापासून वंचित राहणार आहे. कारण, एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचे हप्ते फेडता येत नाहीत. गेल्या दोन महिन्यापासून फक्त कर्मचाऱ्यांना नेट पगार मिळत असल्यामुळे घराचे कर्ज फेडू शकला नाही, अशा परिस्थितीत त्या कर्मचाऱ्यांच घर कधीही जप्त होऊ शकते, अशी भीती मालोकार यांनी यावेळी व्यक्त केली.

 

टॅग्स :state transportएसटीGunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेSadabhau Khotसदाभाउ खोत Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरShiv Senaशिवसेना