शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

ST कर्मचाऱ्यांचा पुळका आणणारे खोत, पडळकर, सदावर्ते आता कुठे गेले? शिवसेनेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 16:46 IST

एसटीच्या निधीला कात्री लावल्याचे सांगितले जात असून, ऐन सणासुदीच्या काळात ST कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra Politics: राज्यात एकीकडे विविध स्तरांवरील निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना, दुसरीकडे मात्र एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार की काय, अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. नव्या शिंदे-फडणवीस सरकारने एसटी महामंडळाच्या निधीला कात्री लावल्याचे सांगितले जात असून, ऐन दसरा-दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात ST कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रणीत महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने सत्ताधारी शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधताना, एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना, त्यांचा पुळका आणणारे सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, गुणरत्न सदावर्ते आता कुठे गेलेत? असा खरमरीत सवाल केला आहे. 

शिवसेनाप्रणीत महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनी एसटी महामंडळाला देण्यात येणाऱ्या निधीला कात्री लावल्याच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील ३६० कोटींचे वेतनाचे अनुदान १०० कोटींवर आणून कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्यात आलाय, असा दावाही यावेळी करण्यात आला. या विषयावर कोणीही बोलायला तयार नाही, असा आरोपही करण्यात आला आहे. 

खोत, पडळकर, सदावर्ते आता कुठे गेले?

महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळात त्यांचा पुळका आणणारे सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, गुणरत्न सदावर्ते आता कुठे गेलेत? तेव्हा खोटे खोटे आश्वासन दिले, अशी टीका करताना एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी दरमहा पगारासाठी ३६० कोटी रूपये दिले जातील, असा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. आता शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर एसटी महामंडळाच्या पगारासाठी फक्त १०० कोटी रुपये अनुदान दिले जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे पगाराचे जे हप्ते आहेत, उदा; एलआयसी, पीएफ, घर बांधनी कर्ज दिल्या जाणाऱ्या पगारातून सध्या होत नाही. फक्त निव्वळ वेतन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, अशा वातावरणात एखाद्या कर्मचाऱ्यांचे निधन झाले, एखादी दुर्घटना घडली तर त्याला यामधून कोणतीही अनुदान मिळणार नाही, तो या मोबदल्यापासून वंचित राहणार आहे. कारण, एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचे हप्ते फेडता येत नाहीत. गेल्या दोन महिन्यापासून फक्त कर्मचाऱ्यांना नेट पगार मिळत असल्यामुळे घराचे कर्ज फेडू शकला नाही, अशा परिस्थितीत त्या कर्मचाऱ्यांच घर कधीही जप्त होऊ शकते, अशी भीती मालोकार यांनी यावेळी व्यक्त केली.

 

टॅग्स :state transportएसटीGunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेSadabhau Khotसदाभाउ खोत Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरShiv Senaशिवसेना