शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

“जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर अभिमान वाटेल”; शिंदे गटातील नेत्यांनी थेट सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 16:18 IST

Maharashtra Vidhan Sabha Assembly Election 2024 Result: जयंत पाटील यांचा योग्य वेळी योग्य निर्णय काय होतो, याकडे आमचे लक्ष लागून आहे, असे शिंदे गटातील नेत्यांनी म्हटले आहे.

Maharashtra Vidhan Sabha Assembly Election 2024 Result:  देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनासाठी मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर अनेक सदस्य बोलले. यावेळी झालेल्या काही सूचक सूतोवाचावरून राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. याबाबत शिवसेना शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली.

ज्या महाविकास आघाडीने ईव्हीएमविरोधात रान उठवले आहे, त्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केलेले भाषण अधोरेखित करण्यासारखे होते. जयंत पाटील म्हणाले की, शासनाविरोधात आम्ही टोकाला जाऊन प्रचार केला, टोकाला जाऊन आम्ही टीका केली; परंतु, महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला. आम्हाला अल्प मतात आणले, हे आम्हाला मान्य केले पाहिजे. अशी भूमिका जयंत पाटील यांची असेल, तर याचा अर्थ ईव्हीएमवरील निकाल योग्य आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार शपथबद्ध झाले, असे उदय सामंत यांनी नमूद केले. 

महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात संभ्रम

तसेच विधानसभेच्या अध्यक्षांबाबत जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सकारात्मक भूमिका घेऊन त्यांनी आम्हाला न्याय दिला, अशी भूमिका मांडली. त्यावेळी महाविकास आघाडीतील एक पक्ष ठाकरे गट सांगतो की, आम्हाला वॉक-आऊट करायचे आहे. महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात संभ्रम असून, नेमके काय चालले आहे, असा प्रश्न पडतो, असे उदय सामंत म्हणाले. 

जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर अभिमान वाटेल

सभागृहात विनोदाने काही चर्चा होत असते. तेव्हा अजित पवार जयंत पाटील यांना उद्देशून म्हणाले की, माझे पूर्ण लक्ष तुमच्यावर आहे. तेव्हा लगेच जयंत पाटील यांनी उत्तर दिले की, दादा राष्ट्रवादी काँग्रेसचे ब्रीदवाक्यच आहे की, योग्य वेळी योग्य निर्णय. त्यामुळे जयंत पाटील यांचा योग्य वेळी योग्य निर्णय कसा आणि काय होतो, याकडे आमचे लक्ष लागून आहे. जयंत पाटील यांनी आता ठरवायचे आहे. जयंत पाटील ज्येष्ठ नेते आहेत. जयंत पाटील यांनी अनेक वर्ष अर्थसंकल्प मांडला आहे. इरिगेशन, ग्रामविकास खाते सांभाळले आहे. जयंत पाटील हे योग्य वेळी योग्य निर्णय या टॅगलाइन खाली महायुतीत येणार असतील, तर नक्कीच आम्हाला अभिमान वाटेल. चांगले वाटेल, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :Uday Samantउदय सामंतJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना