शहरं
Join us  
Trending Stories
1
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
2
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
5
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
6
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
7
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
8
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
9
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
10
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
11
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
12
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
13
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
14
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
15
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
16
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
17
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
18
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
19
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
20
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न

Maharashtra Political Crisis: “शिवसेनेचे हायकमांड मुंबईत मातोश्रीवर, दिल्लीत नाही”; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 12:43 IST

Maharashtra Political Crisis: मंत्रिमंडळ ठरवण्यासाठी शिवसेनेचे मुख्यमंत्री कधी दिल्लीला जात नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्याचा कारभार चालवायला सुरुवात केली आहे. नवे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी टीकास्त्र सोडले. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही पुन्हा एकदा नव्या सरकारवर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावरून टोला लगावत, शिवसेनेचे हायकमांड मुंबईत मातोश्रीवर आहेत, दिल्लीत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

नव्या मुख्यमंत्र्यांकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. तसेच सीमाभागातून पुन्हा बातम्या यायला सुरुवात झाली आहे, तेथील मराठी लोकांवर परत नव्याने अत्याचार सुरू झालेला आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपचे आहेत. केंद्रात आणि कर्नाटकात दोन्हीकडे भाजपचे सरकार आहे. त्यामुळे बेळगावसह सीमाभागातील मराठी लोकांवर अत्याचार होत आहे, प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे, तोपर्यंत तो संपूर्ण भाग केंद्रशासित करावा, अशी भूमिका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे मांडावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. तसेच यासंदर्भात निर्णय घेऊन महाराष्ट्रात यावे, असे आवाहनही राऊत यांनी केले. 

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री दिल्लीत हायकमांडच्या भेटीला

एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत प्रश्न विचारला असता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, दिल्लीत ते हायकमांडच्या भेटीला गेलेले आहेत. शिवसेनेचे हायकमांड मुंबईतच असतात. कुणी म्हणत असेल, शिवसेनेचे सरकार आहे, तर त्यांनी लक्षात घ्यावे की, शिवसेनेचे हायकमांड मातोश्री आहे, दिल्ली नाही. मंत्रिमंडळ ठरवण्यासाठी शिवसेनेचा मुख्यमंत्री कधी दिल्लीला जात नाही. यापूर्वीही कधी गेले नाहीत. त्यामुळे सगळ्यांचे मुखवटे गळून पडतायत, या शब्दांत राऊत यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, बेळगावचे स्थानिक शिष्टमंडळ मला भेटून गेले. तेथील परिस्थिती गंभीर आहे. महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार गेल्यापासून कसा त्रास सुरू झालाय, याबाबत त्यांनी मला सांगितले, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. याशिवाय, राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आदिवासी आहेत, त्यामुळे अनेक आदिवासी खासदारांना वाटते की त्यांना पाठिंबा द्यावा, असे सांगत शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात आहेत, या प्रश्नावर संजय राऊत यांनी अधिक बोलणे टाळले. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळSanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे