शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

... तर ते स्वत:साठीच खड्डा खणतायत; 'भास्कर'वरील आयकर विभागाच्या छाप्यावरून शिवसेनेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 11:35 IST

Daily Baskar Income Tax : भास्कर विभागाच्या कार्यालयांवर आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यांवरून उमटत आहेत निरनिराळ्या प्रतिक्रिया.

ठळक मुद्देभास्कर विभागाच्या कार्यालयांवर आयकर विभागानं टाकलेल्या छाप्यांवरून उमटत आहेत निरनिराळ्या प्रतिक्रिया.

भास्कर समुहाच्या देशभरातील कार्यालयांवर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले. यानंतर याविरोधात देशभरातून निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सरकारपुढे झुकण्याची व याचक म्हणून दारात उभे राहण्याची दै. 'भास्कर'ची परंपरा नाही. थोडक्यात, इतर ‘माध्यमां’प्रमाणे ते सरकारचे मिंधे झाले नाही. त्यांनी कोणत्याही सरकारवर अवाजवी टीका केली नाही व गुडघे टेकले नाहीत. बहुधा ‘भास्कर’ किंवा ‘भारत समाचार’चे हे कृत्य कोणाला राजद्रोही वाटले असेल व त्यामुळे त्यांच्या कार्यालयांवर देशभरात छापे मारून वृत्तपत्र क्षेत्रात दहशत माजविण्याचा प्रयोग सुरू केला गेला आहे. असे झाले असेल तर ते स्वतःच स्वतःसाठी खड्डा खणत आहेत, असं म्हणत शिवसेसेनं केंद्र सरकारवर टीका केली आहे.

कोरोना मृत्यूच्या आकडय़ात गडबड असल्याचे वारंवार सांगणाऱ्या ‘भास्कर’चा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असेल तर ते हिंदुस्थानी स्वातंत्र्य व महान लोकशाहीचा गळा दाबण्याचाच प्रकार आहे. गेल्या पाच वर्षांत देशातल्या 7 प्रमुख क्षेत्रांत 3.64 कोटी लोक बेरोजगार झाल्याचा लेखाजोखा ठळकपणे मांडणाऱ्या ‘भास्कर’ला सरकारी दमनचक्राखाली दडपून मारता येईल असे कुणाला वाटत असेल तर ते भ्रमात आहेत, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून केंद्रावर टीका केली आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात ? दैनिक ‘भास्कर’ वृत्तपत्र समूह आणि ‘भारत समाचार’ या वृत्तवाहिनीवर आयकर विभागाचे जोरदार छापे पडले आहेत. दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू असताना हे छापे पडावेत याचे आश्चर्य वाटते. ‘पेगॅसस’ हेरगिरी प्रकरण गाजत आहे. देशातील 30 पत्रकारांवर पेगॅससच्या माध्यमांतून पाळत ठेवण्यात आली. त्यावरही गदारोळ सुरू झाला आहे. आता वृत्तपत्रांवर छापेही पडले. याआधी असे छापे ‘एनडी टीव्ही’ या वृत्तवाहिनीवर टाकून सरकारने दहशत निर्माण केली होती. ‘भास्कर’ या वृत्तसमूहाचा व्याप मोठा आहे. देशभरात त्यांच्या आवृत्त्या निघतात व त्या लाखोंनी संपतात. हिंदी भाषिक पट्टय़ांत ‘भास्कर’चे जनमानसावर वजन आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक विकले जाणारे वर्तमानपत्र असा दै. ‘भास्कर’चा लौकिक आहे. दै. ‘भास्कर’मधील वार्तांकन हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ, पारदर्शक व तप्त असते. ते संयमी तितकेच सत्यवादी असते. सरकारपुढे झुकण्याची व याचक म्हणून दारात उभे राहण्याची त्यांची परंपरा नाही. थोडक्यात, इतर ‘माध्यमां’प्रमाणे ते सरकारचे मिंधे झाले नाही. 

त्यांनी कोणत्याही सरकारवर अवाजवी टीका केली नाही व गुडघे टेकले नाहीत. बहुधा ‘भास्कर’ किंवा ‘भारत समाचार’चे हे कृत्य कोणाला राजद्रोही वाटले असेल व त्यामुळे त्यांच्या कार्यालयांवर देशभरात छापे मारून वृत्तपत्र क्षेत्रात दहशत माजविण्याचा प्रयोग सुरू केला गेला आहे. असे झाले असेल तर ते स्वतःच स्वतःसाठी खड्डा खणत आहेत. आणीबाणी इंदिरा गांधींनी आणली हे खरे, पण त्या व्यवस्थेचा व परिस्थितीचा गैरफायदा घेऊन पडद्यामागे सूत्रे हलविणारे दुसरेच कोणीतरी चांडाळचौकडीचे लोक होते. त्यांच्यामुळे इंदिरा गांधी पुरत्या बदनाम झाल्या. आणीबाणीपेक्षा आता वेगळे काय घडत आहे? 

दैनिक ‘भास्कर’चे सर्वेसर्वा श्रीमान अग्रवाल यांनीही छापेमारीची पर्वा न करता यापुढेही सत्यासाठी लढत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. अग्रवाल यांनी परखडपणे सांगितले, ‘आमचा गुन्हा काय? आम्ही फक्त सत्य सांगितले. आम्ही आमचे काम केले. गंगेत वाहत येणाऱ्या प्रेतांपासून कोरोनामुळे झालेल्या मयतांचे खरे आकडे देशासमोर मांडले. आम्ही फक्त इतकेच केले.’ हे सत्य सांगितल्यामुळेच ‘भास्कर’चा तळपता सूर्य झाकण्याचा प्रयत्न सुरू आहे काय? ‘भास्कर’शी संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरी छापे मारून त्यांचे मोबाईल फोन, लॅपटॉप जप्त केले. ‘भास्कर’ समूहाने करचोरी केली असा आरोप ठेवला आहे, तो खरा आहे असे एकवेळ मान्य केले तरी वृत्तपत्रांवर असे सरकारी हल्ले करून एकप्रकारे दहशत माजविण्याचाच प्रकार आहे. चौकशी व तपास ‘dignified’ पद्धतीने होऊ शकतो, पण अशा प्रकरणात राजकारण घुसले की हे प्रकार घडतात. राजकीय विरोधकांना ईडी, सीबीआयच्या माध्यमांतून छळले जात आहेच, आता सत्य लिहिणाऱ्या वृत्तपत्रांची ‘नखे’ उपटली जात आहेत. 

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणIndira Gandhiइंदिरा गांधीcongressकाँग्रेस