शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

'शिवसेनेनं मंजुरी दिलेले प्रकल्प आता तेच थांबवताहेत; जनतेला उत्तर द्यावं लागेल!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 17:02 IST

देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेले काही महत्त्वाचे, मोठे निर्णय उद्धव ठाकरे सरकारच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही कामं थांबवण्याचे आदेश दिलेत, तर काही कामांबाबत ते पुनर्विचार करणार आहेत.'प्रकल्पांना स्थगिती देण्याच्या निर्णयाबद्दल शिवसेनेला जनतेला उत्तर द्यावं लागेल!''खातेवाटप कधी करायचं हा सर्वस्वी नव्या सरकारचा अधिकार आहे.'

जळगावः शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही कामं थांबवण्याचे आदेश दिलेत, तर काही कामांबाबत ते पुनर्विचार करणार आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेले काही महत्त्वाचे, मोठे निर्णय त्यांच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. त्यावरून, भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. 

विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हालाच कौल दिला. आम्ही सरकार स्थापन करू शकलो नाही. त्यामुळे आम्हाला जनतेला उत्तर द्यावंच लागेल. त्या संदर्भात योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असं विखे-पाटील यांनी सांगितलं. देवेंद्र सरकारनं काही कामांना दिलेली मंजुरी नवं सरकार रोखतंय किंवा रद्द करतंय, याबद्दल विचारलं असता, शिवसेना सत्तेत असताना त्यांनी ज्या प्रकल्पांना मंजुरी दिली होती, त्याच प्रकल्पांना आता ते थांबवत आहेत. याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल, असं त्यांनी नमूद केलं.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदांना दिलेला निधी स्थगित करण्याचा निर्णय नुकताच घेतला. मेट्रो प्रकल्पाच्या आरेतील कारशेडलाही त्यांनी स्थगिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील सिंचन प्रकल्पांच्या सुधारित मान्यतांचा फेरआढावा उद्धव ठाकरे घेणार आहेत. काही नेत्यांच्या साखर कारख्यानांना फडणवीस यांनी दिलेली ३१० कोटी रुपयांची बँक हमी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने रद्द केली आहे. 

दरम्यान, खातेवाटप कधी करायचं हा सर्वस्वी नव्या सरकारचा अधिकार आहे. आम्हाला खातेवाटपाची आम्हाला घाई नाही. ते ठरवतील कधी करायचं ते, असंही राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.

भाजपाच्या संघटनात्मक निवडणुकीसंदर्भात उत्तर महाराष्ट्रस्तरीय पाच जिल्ह्यांची बैठक आज जळगावात होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. कारण, प्रदेश भाजपामधील अंतर्गत कलह सध्या चर्चेत आला आहे आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर टीकास्त्र सोडलंय. ते या बैठकीला जाणार का, तिथे जाऊन काय भूमिका मांडणार, यावरून तर्कवितर्क लढवले जात होते. सुरुवातीला खडसे कुटुंबातील कुणीच बैठकीला न दिसल्यानं आश्चर्य व्यक्त होत होतं. परंतु, नंतर खासदार रक्षा खडसे, रोहिणी खडसे आणि स्वतः नाथा भाऊ तिथे पोहोचले. अर्थात, त्यांच्या जाण्याने वाद शमतो की वाढतो, हे पाहावं लागेल.  

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलShiv SenaशिवसेनाBJPभाजपाEknath Khadaseएकनाथ खडसे