शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

'शिवसेनेनं मंजुरी दिलेले प्रकल्प आता तेच थांबवताहेत; जनतेला उत्तर द्यावं लागेल!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 17:02 IST

देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेले काही महत्त्वाचे, मोठे निर्णय उद्धव ठाकरे सरकारच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही कामं थांबवण्याचे आदेश दिलेत, तर काही कामांबाबत ते पुनर्विचार करणार आहेत.'प्रकल्पांना स्थगिती देण्याच्या निर्णयाबद्दल शिवसेनेला जनतेला उत्तर द्यावं लागेल!''खातेवाटप कधी करायचं हा सर्वस्वी नव्या सरकारचा अधिकार आहे.'

जळगावः शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही कामं थांबवण्याचे आदेश दिलेत, तर काही कामांबाबत ते पुनर्विचार करणार आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेले काही महत्त्वाचे, मोठे निर्णय त्यांच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. त्यावरून, भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. 

विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हालाच कौल दिला. आम्ही सरकार स्थापन करू शकलो नाही. त्यामुळे आम्हाला जनतेला उत्तर द्यावंच लागेल. त्या संदर्भात योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असं विखे-पाटील यांनी सांगितलं. देवेंद्र सरकारनं काही कामांना दिलेली मंजुरी नवं सरकार रोखतंय किंवा रद्द करतंय, याबद्दल विचारलं असता, शिवसेना सत्तेत असताना त्यांनी ज्या प्रकल्पांना मंजुरी दिली होती, त्याच प्रकल्पांना आता ते थांबवत आहेत. याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल, असं त्यांनी नमूद केलं.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदांना दिलेला निधी स्थगित करण्याचा निर्णय नुकताच घेतला. मेट्रो प्रकल्पाच्या आरेतील कारशेडलाही त्यांनी स्थगिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील सिंचन प्रकल्पांच्या सुधारित मान्यतांचा फेरआढावा उद्धव ठाकरे घेणार आहेत. काही नेत्यांच्या साखर कारख्यानांना फडणवीस यांनी दिलेली ३१० कोटी रुपयांची बँक हमी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने रद्द केली आहे. 

दरम्यान, खातेवाटप कधी करायचं हा सर्वस्वी नव्या सरकारचा अधिकार आहे. आम्हाला खातेवाटपाची आम्हाला घाई नाही. ते ठरवतील कधी करायचं ते, असंही राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.

भाजपाच्या संघटनात्मक निवडणुकीसंदर्भात उत्तर महाराष्ट्रस्तरीय पाच जिल्ह्यांची बैठक आज जळगावात होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. कारण, प्रदेश भाजपामधील अंतर्गत कलह सध्या चर्चेत आला आहे आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर टीकास्त्र सोडलंय. ते या बैठकीला जाणार का, तिथे जाऊन काय भूमिका मांडणार, यावरून तर्कवितर्क लढवले जात होते. सुरुवातीला खडसे कुटुंबातील कुणीच बैठकीला न दिसल्यानं आश्चर्य व्यक्त होत होतं. परंतु, नंतर खासदार रक्षा खडसे, रोहिणी खडसे आणि स्वतः नाथा भाऊ तिथे पोहोचले. अर्थात, त्यांच्या जाण्याने वाद शमतो की वाढतो, हे पाहावं लागेल.  

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलShiv SenaशिवसेनाBJPभाजपाEknath Khadaseएकनाथ खडसे