शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

'शिवसेनेनं मंजुरी दिलेले प्रकल्प आता तेच थांबवताहेत; जनतेला उत्तर द्यावं लागेल!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 17:02 IST

देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेले काही महत्त्वाचे, मोठे निर्णय उद्धव ठाकरे सरकारच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही कामं थांबवण्याचे आदेश दिलेत, तर काही कामांबाबत ते पुनर्विचार करणार आहेत.'प्रकल्पांना स्थगिती देण्याच्या निर्णयाबद्दल शिवसेनेला जनतेला उत्तर द्यावं लागेल!''खातेवाटप कधी करायचं हा सर्वस्वी नव्या सरकारचा अधिकार आहे.'

जळगावः शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही कामं थांबवण्याचे आदेश दिलेत, तर काही कामांबाबत ते पुनर्विचार करणार आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेले काही महत्त्वाचे, मोठे निर्णय त्यांच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. त्यावरून, भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. 

विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हालाच कौल दिला. आम्ही सरकार स्थापन करू शकलो नाही. त्यामुळे आम्हाला जनतेला उत्तर द्यावंच लागेल. त्या संदर्भात योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असं विखे-पाटील यांनी सांगितलं. देवेंद्र सरकारनं काही कामांना दिलेली मंजुरी नवं सरकार रोखतंय किंवा रद्द करतंय, याबद्दल विचारलं असता, शिवसेना सत्तेत असताना त्यांनी ज्या प्रकल्पांना मंजुरी दिली होती, त्याच प्रकल्पांना आता ते थांबवत आहेत. याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल, असं त्यांनी नमूद केलं.  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदांना दिलेला निधी स्थगित करण्याचा निर्णय नुकताच घेतला. मेट्रो प्रकल्पाच्या आरेतील कारशेडलाही त्यांनी स्थगिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील सिंचन प्रकल्पांच्या सुधारित मान्यतांचा फेरआढावा उद्धव ठाकरे घेणार आहेत. काही नेत्यांच्या साखर कारख्यानांना फडणवीस यांनी दिलेली ३१० कोटी रुपयांची बँक हमी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने रद्द केली आहे. 

दरम्यान, खातेवाटप कधी करायचं हा सर्वस्वी नव्या सरकारचा अधिकार आहे. आम्हाला खातेवाटपाची आम्हाला घाई नाही. ते ठरवतील कधी करायचं ते, असंही राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.

भाजपाच्या संघटनात्मक निवडणुकीसंदर्भात उत्तर महाराष्ट्रस्तरीय पाच जिल्ह्यांची बैठक आज जळगावात होत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. कारण, प्रदेश भाजपामधील अंतर्गत कलह सध्या चर्चेत आला आहे आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर टीकास्त्र सोडलंय. ते या बैठकीला जाणार का, तिथे जाऊन काय भूमिका मांडणार, यावरून तर्कवितर्क लढवले जात होते. सुरुवातीला खडसे कुटुंबातील कुणीच बैठकीला न दिसल्यानं आश्चर्य व्यक्त होत होतं. परंतु, नंतर खासदार रक्षा खडसे, रोहिणी खडसे आणि स्वतः नाथा भाऊ तिथे पोहोचले. अर्थात, त्यांच्या जाण्याने वाद शमतो की वाढतो, हे पाहावं लागेल.  

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलShiv SenaशिवसेनाBJPभाजपाEknath Khadaseएकनाथ खडसे