शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

“उद्धव ठाकरे संयमी, सगळा तमाशा पाहिलाय, १४ तारखेला कळेलच”; शिवसेनेची राज ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 18:42 IST

आदित्य ठाकरेंचे स्वागत करू, असे ते म्हणाले. म्हणजेच असली कोण आहे हे त्यांना कळलेय, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

मुंबई: मशिदीवरील भोंग्यांच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) कमालीचे आक्रमक झालेले आहेत. त्यात भोंग्यांविरोधात हनुमान चालिसा वाजवून आंदोलन करण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिल्यापासून हे आंदोलन मोडून काढण्यासाठी राज्य सरकारकडून सक्त कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना एक खरमरीत पत्र लिहिले असून, यामध्ये राज्य सरकारच्या कारवाईवर तिखट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. यातच आता शिवसेनेकडून राज ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे.  

राज ठाकरे दबंग नाही तर उंदीर आहेत. पहिल्यांदा बाहेर येत आहेत. माझे म्हणणे ऐकले नाही, माफी मागितली नाही तर वचन देतो की उत्तर प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड सक्षम आहेत. ते आयुष्यात कधीच येऊ शकणार नाहीत, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी इशारा दिला आहे. बृजभूषण सिंह यांच्यासह स्थानिक संघटनांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला असताना आता राज ठाकरेंचे नाव न घेता शिवसेनेकडून बोचरी टीका करण्यात आली आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून माध्यमांशी बोलताना टीका केली आहे. 

सरडा म्हणेल मी बरा होतो, तुम्ही त्यापेक्षा खराब आहात 

हिंदुत्वाची रस्सीखेच कसली? ज्यांच्याकडे रस्सीच नाही, त्यांनी खेचायचे काय? रस्सी विचारांची असली पाहिजे. सरडाही रंग बदलतो. कदाचित त्यालाही लाज वाटेल, इतके लोकांनी रंग बदललेत. सरडा म्हणेल मी बरा होतो, तुम्ही त्यापेक्षा खराब आहात. असली-नकली लोकांना कळते, अशी घणाघाती टीका अरविंद सावंत यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे. 

असली कोण आहे हे त्यांना कळले आहे

राज ठाकरेंना विरोध करतानाच अयोध्येमध्ये आदित्य ठाकरेंचे स्वागत करण्याची भूमिका बृजभूषण शरण सिंह यांनी घेतली आहे. यावर, आदित्य ठाकरेंचे स्वागत करू, असे ते म्हणाले. म्हणजेच असली कोण आहे हे त्यांना कळलेय, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला आहे. 

दरम्यान, देशाला हिंदुत्वाचा विचार कुणी दिला? शिवसेना प्रमुखांनी. गेले ३ वर्ष तेच तुणतुणे वाजवत आहेत. उद्धव ठाकरे संयमी आहेत. त्यांनी तमाशा पाहून घेतलेला आहे. १४ मेला या. त्या तुणतुण्याची तार कशी तुटते, ती बघा, अशी खोचक टीका अरविंद सावंत यांनी केली आहे.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसेArvind Sawantअरविंद सावंतPoliticsराजकारण