शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
2
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
3
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
4
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
5
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
8
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
9
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
10
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
11
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
12
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
13
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
14
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
15
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
16
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
17
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
18
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
19
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
20
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...

“उद्धव ठाकरे संयमी, सगळा तमाशा पाहिलाय, १४ तारखेला कळेलच”; शिवसेनेची राज ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 18:42 IST

आदित्य ठाकरेंचे स्वागत करू, असे ते म्हणाले. म्हणजेच असली कोण आहे हे त्यांना कळलेय, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

मुंबई: मशिदीवरील भोंग्यांच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) कमालीचे आक्रमक झालेले आहेत. त्यात भोंग्यांविरोधात हनुमान चालिसा वाजवून आंदोलन करण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिल्यापासून हे आंदोलन मोडून काढण्यासाठी राज्य सरकारकडून सक्त कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना एक खरमरीत पत्र लिहिले असून, यामध्ये राज्य सरकारच्या कारवाईवर तिखट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. यातच आता शिवसेनेकडून राज ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे.  

राज ठाकरे दबंग नाही तर उंदीर आहेत. पहिल्यांदा बाहेर येत आहेत. माझे म्हणणे ऐकले नाही, माफी मागितली नाही तर वचन देतो की उत्तर प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड सक्षम आहेत. ते आयुष्यात कधीच येऊ शकणार नाहीत, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी इशारा दिला आहे. बृजभूषण सिंह यांच्यासह स्थानिक संघटनांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला असताना आता राज ठाकरेंचे नाव न घेता शिवसेनेकडून बोचरी टीका करण्यात आली आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून माध्यमांशी बोलताना टीका केली आहे. 

सरडा म्हणेल मी बरा होतो, तुम्ही त्यापेक्षा खराब आहात 

हिंदुत्वाची रस्सीखेच कसली? ज्यांच्याकडे रस्सीच नाही, त्यांनी खेचायचे काय? रस्सी विचारांची असली पाहिजे. सरडाही रंग बदलतो. कदाचित त्यालाही लाज वाटेल, इतके लोकांनी रंग बदललेत. सरडा म्हणेल मी बरा होतो, तुम्ही त्यापेक्षा खराब आहात. असली-नकली लोकांना कळते, अशी घणाघाती टीका अरविंद सावंत यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे. 

असली कोण आहे हे त्यांना कळले आहे

राज ठाकरेंना विरोध करतानाच अयोध्येमध्ये आदित्य ठाकरेंचे स्वागत करण्याची भूमिका बृजभूषण शरण सिंह यांनी घेतली आहे. यावर, आदित्य ठाकरेंचे स्वागत करू, असे ते म्हणाले. म्हणजेच असली कोण आहे हे त्यांना कळलेय, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला आहे. 

दरम्यान, देशाला हिंदुत्वाचा विचार कुणी दिला? शिवसेना प्रमुखांनी. गेले ३ वर्ष तेच तुणतुणे वाजवत आहेत. उद्धव ठाकरे संयमी आहेत. त्यांनी तमाशा पाहून घेतलेला आहे. १४ मेला या. त्या तुणतुण्याची तार कशी तुटते, ती बघा, अशी खोचक टीका अरविंद सावंत यांनी केली आहे.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसेArvind Sawantअरविंद सावंतPoliticsराजकारण