शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
2
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
3
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
4
व्यवहारच अपूर्ण, मुद्रांक शुल्क का भरावे? दंड टाळण्यासाठी ‘अमेडिया’ची पळवाट 
5
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
6
Apple नंतर ही कम्प्युटर बनवणारी 'ही' दिग्गज कंपनी ६००० कर्मचाऱ्यांची कपात करणार, का घेतला हा मोठा निर्णय?
7
१० वर्षांत १ कोटींचा टप्पा गाठायचा आहे? SIP द्वारे कोणत्या फंडात आणि किती गुंतवणूक करणे फायदेशीर!
8
महालक्ष्मी व्रतकथा: महालक्ष्मी व्रत कथेशिवाय पूजा अपूर्ण; पती-पत्नीने मिळून वाचल्यास मिळते अधिक फळ!
9
घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणानंतर सेलिना जेटलीची पहिली पोस्ट; म्हणाली, "माझी मुलं..."
10
मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
11
पगार ५० हजार...तर तुम्हाला किती मिळेल ग्रॅच्युइटी?; जाणून घ्या, नवीन नियम अन् सोपा फॉर्म्युला
12
मार्गशीर्षातला पहिला गुरुवार, महालक्ष्मी व्रताची तयारी झाली का? वाचा साहित्य आणि पूजाविधी
13
गरिबांसाठीच्या योजनांवर १ लाख कोटी रुपयांचा खर्च; लोककल्याणाचा उदात्त हेतू, पण सरकारी तिजोरीवर वाढता ताण
14
Stock Market: ३ दिवसांच्या घसरणीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २४५ अंकांनी वधारला; गुंतवणूकदारांमध्ये उत्साह
15
टीम इंडियाची लाजिरवाणी कामगिरी! स्टार क्रिकेटर म्हणाला, 'ही' आमच्यासाठी विन-विन सिच्युएशन ठरेल!
16
आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२५: 'या' राशींसाठी आहे धनलाभाचा योग; वाचा आपले आजचे राशीभविष्य!
17
पेन्शन, टॅक्स पासून एलपीजी पर्यंत; १ डिसेंबरपासून बदलणार हे महत्त्वाचे नियम, तुमच्यावर थेट होणार परिणाम
18
स्मृती मानधनाच्या वडिलांना रुग्णालयातून डिस्चार्ज; पलाश मुच्छलसोबत लग्न अद्यापही लांबणीवरच!
19
देशाच्या माजी राष्ट्रपतींनाच सुनावली २७ वर्षांची शिक्षा, कुठे घडला प्रकार? काय आहे गुन्हा?
20
धर्मेंद्र यांचा 'हा' सिनेमा आता कधीच चाहत्यांच्या भेटीला येणार नाही; दिग्दर्शकाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

“उद्धव ठाकरे संयमी, सगळा तमाशा पाहिलाय, १४ तारखेला कळेलच”; शिवसेनेची राज ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 18:42 IST

आदित्य ठाकरेंचे स्वागत करू, असे ते म्हणाले. म्हणजेच असली कोण आहे हे त्यांना कळलेय, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

मुंबई: मशिदीवरील भोंग्यांच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) कमालीचे आक्रमक झालेले आहेत. त्यात भोंग्यांविरोधात हनुमान चालिसा वाजवून आंदोलन करण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिल्यापासून हे आंदोलन मोडून काढण्यासाठी राज्य सरकारकडून सक्त कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना एक खरमरीत पत्र लिहिले असून, यामध्ये राज्य सरकारच्या कारवाईवर तिखट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. यातच आता शिवसेनेकडून राज ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे.  

राज ठाकरे दबंग नाही तर उंदीर आहेत. पहिल्यांदा बाहेर येत आहेत. माझे म्हणणे ऐकले नाही, माफी मागितली नाही तर वचन देतो की उत्तर प्रदेश, बिहार आणि छत्तीसगड सक्षम आहेत. ते आयुष्यात कधीच येऊ शकणार नाहीत, अशा शब्दांत उत्तर प्रदेशचे भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी इशारा दिला आहे. बृजभूषण सिंह यांच्यासह स्थानिक संघटनांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला असताना आता राज ठाकरेंचे नाव न घेता शिवसेनेकडून बोचरी टीका करण्यात आली आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून माध्यमांशी बोलताना टीका केली आहे. 

सरडा म्हणेल मी बरा होतो, तुम्ही त्यापेक्षा खराब आहात 

हिंदुत्वाची रस्सीखेच कसली? ज्यांच्याकडे रस्सीच नाही, त्यांनी खेचायचे काय? रस्सी विचारांची असली पाहिजे. सरडाही रंग बदलतो. कदाचित त्यालाही लाज वाटेल, इतके लोकांनी रंग बदललेत. सरडा म्हणेल मी बरा होतो, तुम्ही त्यापेक्षा खराब आहात. असली-नकली लोकांना कळते, अशी घणाघाती टीका अरविंद सावंत यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता केली आहे. 

असली कोण आहे हे त्यांना कळले आहे

राज ठाकरेंना विरोध करतानाच अयोध्येमध्ये आदित्य ठाकरेंचे स्वागत करण्याची भूमिका बृजभूषण शरण सिंह यांनी घेतली आहे. यावर, आदित्य ठाकरेंचे स्वागत करू, असे ते म्हणाले. म्हणजेच असली कोण आहे हे त्यांना कळलेय, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला आहे. 

दरम्यान, देशाला हिंदुत्वाचा विचार कुणी दिला? शिवसेना प्रमुखांनी. गेले ३ वर्ष तेच तुणतुणे वाजवत आहेत. उद्धव ठाकरे संयमी आहेत. त्यांनी तमाशा पाहून घेतलेला आहे. १४ मेला या. त्या तुणतुण्याची तार कशी तुटते, ती बघा, अशी खोचक टीका अरविंद सावंत यांनी केली आहे.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMNSमनसेArvind Sawantअरविंद सावंतPoliticsराजकारण