शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: “आदित्य ठाकरे महाराष्ट्राचं नाही तर उद्याचं देशाचं नेतृत्व, शिंदे गट त्यांना घाबरला म्हणूनच...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 15:29 IST

Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंची प्रतिमा या गल्लीतल्या कुठल्यातरी लोकांनी काहीतरी बोलल्यामुळे बिघडणार नाही, असा पलटवार शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरे हे उद्याचे महाराष्ट्राचे नेतृत्व आहे. त्यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं याचा अर्थ आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाला ते घाबरतात. त्यांना कळून चुकलेय की, उद्याचे देशाचेही नेतृत्व कदाचित ते होतील. मग त्यांना बदनाम करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, असे सडेतोड प्रत्युत्तर शिवसेनेकडून देण्यात आले आहे. आताच्या घडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नव्या शिंदे-भाजप सरकारचे पहिले अधिवेशन सुरू आहे. यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी आदित्य ठाकरेंना टार्गेट करत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. 

शिंदे गट आणि भाजपकडून आदित्य ठाकरेंना लक्ष्य करण्यात आले. यावरून शिवसेनेच्या गोटातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना खासदार आणि उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते अरविंद सावंत यांनी सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या टीकेवरून चांगलेच सुनावले आहे. एक दूरदृष्टी असणारा तरुण मुलगा एका वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्र आणि मुंबईचे नेतृत्व करत होता. दावोसमध्ये ज्याची मुलाखत घेण्यासाठी जगातील सगळे चॅनल धावले, त्या आदित्य ठाकरेंची प्रतिमा या गल्लीतल्या कुठल्यातरी लोकांनी काहीतरी बोलल्यामुळे बिघडणार नाही. जे कुणी हे करत आहेत, त्यांची प्रतिमा मात्र नक्कीच कळेल की कोण कुणावर भुंकतेय, असे सांगत विरोधकांच्या टीकेचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.

ते आणखी पायऱ्यांवरून खाली जात जाणार, वर नाही जाणार

त्यांची अब्रू केव्हाच गेली आहे. लोकांच्या सगळे लक्षात आले आहे. अनेक व्हिडिओ क्लिप आहेत की ज्यात ते म्हणत आहेत की आम्हाला अमुक पैसे मिळाले वगैरे. त्यामुळे अब्रू केव्हाच गेली. जो बूंद से गई, हौद से नही आएगी. कितीही पायऱ्यांवर उभे राहा. ते आणखी पायऱ्यांवरून खाली जात जाणार, वर नाही जाणार, अशी बोचरी टीका करत, हे सरकारच बेकायदेशीर आहे. हे देवेंद्र फडणवीसांना कळतंय की हे सगळे बेकायदेशीर आहे. पण अतिशय घाणेरड्या पद्धतीचे राजकारण भाजप देशात रुजवतेय. ते स्वत:चीच कबर खोदत आहेत. हे प्रकार महाराष्ट्राला भूषणावह नाही, असे अरविंद सावंत यांनी सुनावले.

नितीन गडकरींचे किती खच्चीकरण केले गेले

नितीन गडकरींचे किती खच्चीकरण केले गेले. त्यांचे पाय कापून टाकले. देवेंद्र फडणवीसांनी सांगितले होते की या सरकारमध्ये सामील होणार नाही. दोन मिनिटांत दिल्लीवरून आदेश आला शपथ घ्या. घेतली त्यांनी शपथ. मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री केले. सगळी खाती अंगाशी घेऊन याने कारभार होणार नाही, असे सांगत महाराष्ट्रातून अनेक उद्योग गुजरातला पळवले. जे अलिबाबाचे ४० मित्र तिकडे गेले, त्यांना विचारायला हवं की त्यांना याची जनाची नाही, मनाची तरी लाज आहे का? असा संतप्त सवाल सावंत यांनी केला.

दरम्यान, शिंदे गटाच्या बॅनरवर आदित्य ठाकरेंचा उल्लेख महाराष्ट्राचे परमपूज्य युवराज असा केला. "महाराष्ट्राचे परम पुज्य (प पु) युवराज...२०१४ ला १५१ चा हट्ट धरुन युती बुडवली. २०१९ ला खुर्चीसाठी हिंदुत्ववादी विचारधारा पायदळी तुडवली. पर्यटन खाते घेऊन घरातच बसून केला कहर, सत्ता गेल्यावर पर्यटनाची आली लहर. पुन्हा निवडणूक लढवायची देतात ठसन, स्वत: आमदार व्हायला महापौर व दोन MLC चे लागते कुशन...खुर्चीत बसल्यावर शिवसैनिकाला केले तडीपार, सत्ता गेल्यावर फिरतात दारोदार...जनता हे खोटे अश्रू पूसणार नाही... तुमच्या या खोट्या रडगाण्याला भूलणार नाही. युवराजांची 'दिशा' नेहमीच चुकली", अशा आशयाचा बॅनर शिंदे गटातील आमदारांनी हातात धरला.  

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळArvind Sawantअरविंद सावंतAaditya Thackerayआदित्य ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे