शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

'राष्ट्रवादीने 'तो' चोमडेपणा केला नसता तर राज्याचे चित्र वेगळे असते'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 09:14 IST

सत्ताधारी पक्षात राहून भाजपावर आणि मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडणाऱ्या शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत,

मुंबई - शरद पवारांनी महाराष्ट्रावरील कर्जवाढीवरुन भाजपा सरकारवर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करताना, महाराष्ट्र अधोगतीला चालल्याचे पवारांनी म्हटले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण करताना, पवारांना खडे बोले सुनावले. तसेच, आधीच्या सरकारने जे केले तेच आताचे सरकार करत आहेत. आधीचे सरकार पुढच्या सरकारसाठी डबोले ठेवून गेले नव्हते. कर्जच होते, कर्ज काढून आधीचे सरकार काम करीत होते, असे शिवेसनेनं म्हटलं आहे. 

सत्ताधारी पक्षात राहून भाजपावर आणि मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडणाऱ्या शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत, पवारांवर टीका केली. राज्यावरील कर्ज आणि गुजरातची दिशा, यावर शिवसेनेनं भाष्य केलंय. महाराष्ट्राला गुजरातच्या दिशेने नेण्याचा प्रश्न. त्याची चिंता पवारांनी करू नये. महाराष्ट्र हा शिवरायांचाच आहे व राहील. मात्र हे सर्व घडत आहे, राज्य अधोगतीला चालले आहे आणि त्यास फडणवीसांचे भाजप शासन जबाबदार आहे असे पवारांना वाटत असेल तर 2014 साली फडणवीस सरकारची पहिली वीट रचणारे पवारच होते व जे झाले ते योग्यच होते, अशी कबुली अजित पवारच देत आहेत, असे शिवसेनेनं म्हटले. 

राष्ट्रवादी काँग्रेसने 2014 मध्ये पाठिंब्याचा चोमडेपणा केला नसता तर राज्याचे चित्र आज वेगळे दिसले असते. राष्ट्रवादी काँग्रेसचा हा चोंबडेपणा दिल्लीच्या आदेशानेच झाला. आज, तेच शरद पवार सांगत आहेत की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या आदेशाने राज्य करीत आहेत. महाराष्ट्र अधोगतीला चालला आहे, म्हणजे नक्की काय घडले आहे, याचा किरकोळ खुलासा पवारसाहेबांनी केला आहे. आघाडी सरकारच्या काळातील कर्जाचा डोंगर आता दुप्पट झाला, याचा सरळ अर्थ असा की, आधीचे सरकार पुढच्या सरकारसाठी डबोले ठेवून गेले नव्हते. कर्जच होते, कर्ज काढून आधीचे सरकार काम करीत होते व नवे सरकारही कर्ज काढूनच नव्या योजना राबवत राहिल्याचं, सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019