शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
4
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
5
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
6
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
7
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
9
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
10
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
11
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
12
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
13
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
14
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
15
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
16
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
17
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
18
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
19
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
20
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई

Sunrise Hospital Fire: भाजप मृतांच्या टाळूवरचे लोणी खायलाही विसरत नाहीत; शिवसेनेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 19:15 IST

Sunrise Hospital Fire: शिवसेनेकडून भाजपवर बोचरी टीका करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशिवसेनेची भाजपवर बोचरी टीकाभाजप सत्ता गेल्यामुळे विचलित - शिवसेनातेच प्रशासन आणि तेच पोलीस, तरीही अविश्वास कसा - शिवसेना

मुंबई : भांडुपमधील ड्रीम्स मॉलला लागलेल्या आगीत हॉस्पिटलही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले आहे. या आगीत एकूण १० जणांचा मृत्यू झाला. याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही घटनास्थळाला भेट दिली. यावरून आता शिवसेनेकडून बोचरी टीका करण्यात आली असून, भाजप मृतांच्या टाळूवरचे लोणी खायलाही विसरत नाहीत, असा बल्लाबोल करण्यात आला आहे. (shiv sena leader manisha kayande criticised bjp over bhandup sunrise hospital fire)

या संदर्भात आता काही फार बोलणे योग्य होणार नाही, कारण आता लोकं दुःखात आहेत. आणखी किती जणांचा मृत्यू झाल्यानंतर या सरकारला जाग येणार आहे. मला असे वाटते की, या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर शिवसेनेकडून निशाणा साधण्यात आला आहे. 

आणखी किती जणांच्या मृत्यूनंतर या सरकारला जाग येणार: देवेंद्र फडणवीस  

भाजप सत्ता गेल्यामुळे विचलित

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्या पाठोपाठ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील गेले. तिकडे जाऊन राज्यात सुरू असलेले राजकीय विषय हे बोलायचे विसरले नाहीत. भाजप सत्ता गेल्यामुळे इतके विचलित झाला आहेत की, मृतांच्या टाळूवरचे लोणी खायला ते विसरत नाहीत, अशी टीका शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी केली. 

तेच प्रशासन आणि तेच पोलीस

प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा पूर्वीच्या सरकारमध्ये होती, तीच आताही आहे .सरकार बदलले तरी यंत्रणा तीच राहते, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा हे सगळे चांगले होते. आता याच अधिकारी आणि पोलिसांवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही, ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. सीताराम कुंटे आयएएस अधिकाऱ्यांची प्रतिमा अतिशय स्वच्छ आहे. अशा अधिकार्‍यांवर ते आता अविश्वास दाखवत आहेत. त्यांची बदनामी करत आहेत, ही बाब अतिशय घृणास्पद आहे, असे मनीषा कायंदे यांनी म्हटले आहे. 

‘‘नवनीत राणा यांनी आवाज उठवयला हवा होता, दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता’’

दरम्यान, या आगीप्रकरणी सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर आला असून ही अत्यंत गंभीर घटना असल्याचं सांगत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा