शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

Sunrise Hospital Fire: भाजप मृतांच्या टाळूवरचे लोणी खायलाही विसरत नाहीत; शिवसेनेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 19:15 IST

Sunrise Hospital Fire: शिवसेनेकडून भाजपवर बोचरी टीका करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशिवसेनेची भाजपवर बोचरी टीकाभाजप सत्ता गेल्यामुळे विचलित - शिवसेनातेच प्रशासन आणि तेच पोलीस, तरीही अविश्वास कसा - शिवसेना

मुंबई : भांडुपमधील ड्रीम्स मॉलला लागलेल्या आगीत हॉस्पिटलही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले आहे. या आगीत एकूण १० जणांचा मृत्यू झाला. याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही घटनास्थळाला भेट दिली. यावरून आता शिवसेनेकडून बोचरी टीका करण्यात आली असून, भाजप मृतांच्या टाळूवरचे लोणी खायलाही विसरत नाहीत, असा बल्लाबोल करण्यात आला आहे. (shiv sena leader manisha kayande criticised bjp over bhandup sunrise hospital fire)

या संदर्भात आता काही फार बोलणे योग्य होणार नाही, कारण आता लोकं दुःखात आहेत. आणखी किती जणांचा मृत्यू झाल्यानंतर या सरकारला जाग येणार आहे. मला असे वाटते की, या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर शिवसेनेकडून निशाणा साधण्यात आला आहे. 

आणखी किती जणांच्या मृत्यूनंतर या सरकारला जाग येणार: देवेंद्र फडणवीस  

भाजप सत्ता गेल्यामुळे विचलित

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्या पाठोपाठ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील गेले. तिकडे जाऊन राज्यात सुरू असलेले राजकीय विषय हे बोलायचे विसरले नाहीत. भाजप सत्ता गेल्यामुळे इतके विचलित झाला आहेत की, मृतांच्या टाळूवरचे लोणी खायला ते विसरत नाहीत, अशी टीका शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी केली. 

तेच प्रशासन आणि तेच पोलीस

प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा पूर्वीच्या सरकारमध्ये होती, तीच आताही आहे .सरकार बदलले तरी यंत्रणा तीच राहते, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा हे सगळे चांगले होते. आता याच अधिकारी आणि पोलिसांवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही, ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. सीताराम कुंटे आयएएस अधिकाऱ्यांची प्रतिमा अतिशय स्वच्छ आहे. अशा अधिकार्‍यांवर ते आता अविश्वास दाखवत आहेत. त्यांची बदनामी करत आहेत, ही बाब अतिशय घृणास्पद आहे, असे मनीषा कायंदे यांनी म्हटले आहे. 

‘‘नवनीत राणा यांनी आवाज उठवयला हवा होता, दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता’’

दरम्यान, या आगीप्रकरणी सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर आला असून ही अत्यंत गंभीर घटना असल्याचं सांगत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा