शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Sunrise Hospital Fire: भाजप मृतांच्या टाळूवरचे लोणी खायलाही विसरत नाहीत; शिवसेनेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 19:15 IST

Sunrise Hospital Fire: शिवसेनेकडून भाजपवर बोचरी टीका करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशिवसेनेची भाजपवर बोचरी टीकाभाजप सत्ता गेल्यामुळे विचलित - शिवसेनातेच प्रशासन आणि तेच पोलीस, तरीही अविश्वास कसा - शिवसेना

मुंबई : भांडुपमधील ड्रीम्स मॉलला लागलेल्या आगीत हॉस्पिटलही आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले आहे. या आगीत एकूण १० जणांचा मृत्यू झाला. याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही घटनास्थळाला भेट दिली. यावरून आता शिवसेनेकडून बोचरी टीका करण्यात आली असून, भाजप मृतांच्या टाळूवरचे लोणी खायलाही विसरत नाहीत, असा बल्लाबोल करण्यात आला आहे. (shiv sena leader manisha kayande criticised bjp over bhandup sunrise hospital fire)

या संदर्भात आता काही फार बोलणे योग्य होणार नाही, कारण आता लोकं दुःखात आहेत. आणखी किती जणांचा मृत्यू झाल्यानंतर या सरकारला जाग येणार आहे. मला असे वाटते की, या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. यावर शिवसेनेकडून निशाणा साधण्यात आला आहे. 

आणखी किती जणांच्या मृत्यूनंतर या सरकारला जाग येणार: देवेंद्र फडणवीस  

भाजप सत्ता गेल्यामुळे विचलित

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्या पाठोपाठ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील गेले. तिकडे जाऊन राज्यात सुरू असलेले राजकीय विषय हे बोलायचे विसरले नाहीत. भाजप सत्ता गेल्यामुळे इतके विचलित झाला आहेत की, मृतांच्या टाळूवरचे लोणी खायला ते विसरत नाहीत, अशी टीका शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी केली. 

तेच प्रशासन आणि तेच पोलीस

प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा पूर्वीच्या सरकारमध्ये होती, तीच आताही आहे .सरकार बदलले तरी यंत्रणा तीच राहते, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा हे सगळे चांगले होते. आता याच अधिकारी आणि पोलिसांवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही, ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. सीताराम कुंटे आयएएस अधिकाऱ्यांची प्रतिमा अतिशय स्वच्छ आहे. अशा अधिकार्‍यांवर ते आता अविश्वास दाखवत आहेत. त्यांची बदनामी करत आहेत, ही बाब अतिशय घृणास्पद आहे, असे मनीषा कायंदे यांनी म्हटले आहे. 

‘‘नवनीत राणा यांनी आवाज उठवयला हवा होता, दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता’’

दरम्यान, या आगीप्रकरणी सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर आला असून ही अत्यंत गंभीर घटना असल्याचं सांगत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा