शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महाराष्ट्र निवडणूक 2019 : 'राणे जिथं जातात त्या पक्षाची सत्ता जाते' - दीपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 10:11 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : भाजप सारख्या बलाढ्य पक्षाची सत्ता राणेंच्या प्रवेशाने गेली.

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेच्या तिढ्यावर भाजपाचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याची मंगळवारी भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. सत्ता येण्यासाठी जे जे करावं लागेल ते करेन. तसेच शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते उल्लू बनवत असल्याचे ते म्हणाले होते. त्यांनी केलेल्या टीकेला आता शिवसेनकडून उत्तर देण्यात आले आहे. राणे जिथं जातात त्या पक्षाची सत्ता जाते, असा टोला शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाऊ शकेल असं वाटत नाही. शिवसेनेला आमदारांना डांबून ठेवावे लागेल. तसेच साम दाम दंड भेद हे शिवसेनेचंच आहे, असं जे बोलले ते हॉस्पिटलमध्ये आहेत. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते उल्लू बनवत आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेसच्या बैठका होतात पण निर्णय होत नाही. काँग्रेसचे नेते एकीकडे बोलतात आणि दुसरीकडे कसे वागतात हे शिवसेनेला कळायला हवे. एवढी वर्षे राजकारण करतात, अशा शब्दात राणेंनी शिवसेनेवर निशाणा साधला होता.

तर राणेंना उत्तर देताना केसरकर म्हणाले, राणे जिथं जातात तिथे पराभव होत असतो. त्यांच्या एंट्रीने अनेक पक्ष संपले.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी खूप वेळा सांगितले होते, की राणेंना पक्षात घेऊ नका. भाजप सारख्या बलाढ्य पक्षाची सत्ता राणेंच्या प्रवेशाने गेली. एवढच नाही तर फडणवीस यांचे काळजीवाहू मुख्यमंत्री पद सुद्धा गेले. असा टोला केसरकर यांनी राणेंना लगवाला.

 महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याबाबत भाष्य करू नये, असा सल्ला भाजप नेतृत्वाने राज्यातील सर्व नेत्यांना दिला आहे. तोडफोड करून भाजप राज्यात सरकार स्थापन करू पाहत आहे, असे संकेत जाऊ नयेत म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व नेत्यांना कोणतेही भाष्य न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या नेत्यांमध्ये नारायण राणे यांचाही समावेश आहे.

 

 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Narayan Raneनारायण राणे Dipak Kesarkarदीपक केसरकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार