शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

शिवसेना नेत्याचा भाजपाला धमकीवजा इशारा; "राज्यपालपदासाठी ८ दिवसांची वाट पाहणार, मग..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 19:40 IST

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ राज्यपाल पद न मिळाल्याने नाराज झाले आहेत. भाजपानं दिलेला शब्द पूर्ण केला नाही असा आरोप त्यांनी केला. 

अमरावती - राज्यपाल पदासाठी पुढील ८ दिवस वाट पाहणार अन्यथा नवनीत राणांचं जातवैधता प्रमाणपत्राचं प्रकरण पुन्हा बाहेर काढणार असा धमकीवजा इशारा शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी भाजपाला दिला आहे.   नवनीत राणांच्या जातवैधता खटल्याबाबत पुर्नविचार याचिका करणार असल्याचेही अडसूळांनी सांगितले. अडसूळ यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना-भाजपा यांच्यात नवा वाद होण्याची शक्यता आहे. 

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ म्हणाले की, नवनीत राणांविरोधात घटनेच्या माध्यमातून जी कायदेशीर प्रक्रिया करायची ती आम्ही करत होतो. मात्र अमित शाह यांनी तुम्हाला राज्यपाल बनवणार आहोत, अमरावतीची जागा आम्हाला सोडा असा शब्द मुख्यमंत्री, दोन्ही  उपमुख्यमंत्र्यांसमोर दिला होता. या अपेक्षेने आम्ही थांबलो होतो. आदर म्हणून तिघांच्या उपस्थितीत आम्ही होकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने माझ्या नावाची राज्यपालपदाची शिफारस तात्काळ गृह मंत्रालयाकडे पाठवली. आम्ही विश्वास ठेवला, निवडणुका झाल्या, त्यांची सत्ता आली त्यामुळे दिलेला शब्द पाळणे ही त्यांची जबाबदारी आहे. परंतु आता जी एक यादी निघाली त्यात नाव नाही तरी मी संयम ठेवला. २ दिवसांनी जाऊन भेटलो. त्यांनी थोडं थांबावे लागेल असं त्यांनी सांगितलं असल्याचं अडसूळांनी म्हटलं.

तसेच जेव्हा भाजपासोबत सरकार बनवण्याचं सुरू होतं तेव्हा केंद्रात २ मंत्रिपदे आणि २ राज्यपाल पदे देऊ असा शब्द देण्यात आला होता. निवडणूक झाल्यावर तो शब्दही भाजपाने पाळला नाही. स्वतंत्र्य कारभार असलेले एकच मंत्रिपद शिवसेनेला दिले. राज्यपालांच्या आश्वासनाबद्दल आम्ही थांबलो होतो. मी संयम ठेवला आहे अजूनही ८-१० दिवस वाट पाहणार त्यानंतर सुप्रीम कोर्टात नवनीत राणांबाबत जो निकाल दिला त्यावर फेरविचार याचिका दाखल करणार आहे. २० महिन्यापूर्वी दिलेला शब्द पाळायला हवा होता मात्र अजूनही पूर्ण केला नाही असं आनंदराव अडसूळ यांनी सांगितले.

दरम्यान, अमित शाहांनी शब्द दिला, त्यामुळे अमरावतीतून माघार घेतली. जर मी निवडणूक लढवली असती तर चांगल्या मताधिक्याने निवडून आलो असतो आणि आज कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले असते. माझ्या पक्षात मीच ज्येष्ठ आहे. ५ वेळा खासदार राहिलो, संसदरत्न मिळाला आहे. अटलबिहारी वाजपेयी काळात केंद्रीय अर्थराज्यमंत्री म्हणून कामही केले आहे. त्यामुळे मी लढलो असतो तर जिंकून मंत्रिपद मिळाले असते. मात्र भाजपाला जागा सोडल्यामुळे माझ्या हातून खासदारकी, मंत्रिपद सगळेच गेले आणि हाती अजूनही काही मिळाले नाही अशी खंत आनंदराव अडसूळ यांनी बोलून दाखवली. 

रवी राणांनी अडसूळांना फटकारलं

आनंदराव अडसूळ जी वक्तव्ये करतायेत त्यावरून त्यांचे मानसिक संतुलन ढासळलेले दिसते. वयाप्रमाणे त्यांना आराम करण्याची गरज आहे. आजही ते जसं आम्हाला ब्लॅकमेल करत होते तसं देशाच्या गृहमंत्र्यांचे नाव घेऊन ब्लॅकमेल करतायेत. नवनीत राणांविरोधात अडसूळांनी काम केले. अमरावतीत येऊन नवनीत राणांना पाडण्यासाठी यंत्रणा लावली. नवनीत राणांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा शब्द त्यांनी अमित शाहांना दिला होता. मात्र त्यांनी नवनीत राणांना पाडण्याचं काम केले. राज्यपाल बनवणे अशी विधाने करून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहेत. त्यांना चांगल्या डॉक्टरकडे उपचाराची गरज आहे. त्यासाठी जो काही खर्च लागेल तो करण्यास मी तयार आहे असं खोचक पलटवार करत रवी राणांनी आनंदराव अडसूळांना फटकारलं आहे. 

टॅग्स :Anandrao Adsulआनंदराव अडसूळAmit Shahअमित शाहBJPभाजपाShiv Senaशिवसेनाnavneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणा