शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
4
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
5
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
6
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
7
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
8
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
9
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
11
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
12
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
13
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
14
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
15
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
16
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
17
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
18
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
19
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
20
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?

शिवसेना नेत्याचा भाजपाला धमकीवजा इशारा; "राज्यपालपदासाठी ८ दिवसांची वाट पाहणार, मग..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 19:40 IST

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ राज्यपाल पद न मिळाल्याने नाराज झाले आहेत. भाजपानं दिलेला शब्द पूर्ण केला नाही असा आरोप त्यांनी केला. 

अमरावती - राज्यपाल पदासाठी पुढील ८ दिवस वाट पाहणार अन्यथा नवनीत राणांचं जातवैधता प्रमाणपत्राचं प्रकरण पुन्हा बाहेर काढणार असा धमकीवजा इशारा शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी भाजपाला दिला आहे.   नवनीत राणांच्या जातवैधता खटल्याबाबत पुर्नविचार याचिका करणार असल्याचेही अडसूळांनी सांगितले. अडसूळ यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना-भाजपा यांच्यात नवा वाद होण्याची शक्यता आहे. 

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ म्हणाले की, नवनीत राणांविरोधात घटनेच्या माध्यमातून जी कायदेशीर प्रक्रिया करायची ती आम्ही करत होतो. मात्र अमित शाह यांनी तुम्हाला राज्यपाल बनवणार आहोत, अमरावतीची जागा आम्हाला सोडा असा शब्द मुख्यमंत्री, दोन्ही  उपमुख्यमंत्र्यांसमोर दिला होता. या अपेक्षेने आम्ही थांबलो होतो. आदर म्हणून तिघांच्या उपस्थितीत आम्ही होकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीने माझ्या नावाची राज्यपालपदाची शिफारस तात्काळ गृह मंत्रालयाकडे पाठवली. आम्ही विश्वास ठेवला, निवडणुका झाल्या, त्यांची सत्ता आली त्यामुळे दिलेला शब्द पाळणे ही त्यांची जबाबदारी आहे. परंतु आता जी एक यादी निघाली त्यात नाव नाही तरी मी संयम ठेवला. २ दिवसांनी जाऊन भेटलो. त्यांनी थोडं थांबावे लागेल असं त्यांनी सांगितलं असल्याचं अडसूळांनी म्हटलं.

तसेच जेव्हा भाजपासोबत सरकार बनवण्याचं सुरू होतं तेव्हा केंद्रात २ मंत्रिपदे आणि २ राज्यपाल पदे देऊ असा शब्द देण्यात आला होता. निवडणूक झाल्यावर तो शब्दही भाजपाने पाळला नाही. स्वतंत्र्य कारभार असलेले एकच मंत्रिपद शिवसेनेला दिले. राज्यपालांच्या आश्वासनाबद्दल आम्ही थांबलो होतो. मी संयम ठेवला आहे अजूनही ८-१० दिवस वाट पाहणार त्यानंतर सुप्रीम कोर्टात नवनीत राणांबाबत जो निकाल दिला त्यावर फेरविचार याचिका दाखल करणार आहे. २० महिन्यापूर्वी दिलेला शब्द पाळायला हवा होता मात्र अजूनही पूर्ण केला नाही असं आनंदराव अडसूळ यांनी सांगितले.

दरम्यान, अमित शाहांनी शब्द दिला, त्यामुळे अमरावतीतून माघार घेतली. जर मी निवडणूक लढवली असती तर चांगल्या मताधिक्याने निवडून आलो असतो आणि आज कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले असते. माझ्या पक्षात मीच ज्येष्ठ आहे. ५ वेळा खासदार राहिलो, संसदरत्न मिळाला आहे. अटलबिहारी वाजपेयी काळात केंद्रीय अर्थराज्यमंत्री म्हणून कामही केले आहे. त्यामुळे मी लढलो असतो तर जिंकून मंत्रिपद मिळाले असते. मात्र भाजपाला जागा सोडल्यामुळे माझ्या हातून खासदारकी, मंत्रिपद सगळेच गेले आणि हाती अजूनही काही मिळाले नाही अशी खंत आनंदराव अडसूळ यांनी बोलून दाखवली. 

रवी राणांनी अडसूळांना फटकारलं

आनंदराव अडसूळ जी वक्तव्ये करतायेत त्यावरून त्यांचे मानसिक संतुलन ढासळलेले दिसते. वयाप्रमाणे त्यांना आराम करण्याची गरज आहे. आजही ते जसं आम्हाला ब्लॅकमेल करत होते तसं देशाच्या गृहमंत्र्यांचे नाव घेऊन ब्लॅकमेल करतायेत. नवनीत राणांविरोधात अडसूळांनी काम केले. अमरावतीत येऊन नवनीत राणांना पाडण्यासाठी यंत्रणा लावली. नवनीत राणांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा शब्द त्यांनी अमित शाहांना दिला होता. मात्र त्यांनी नवनीत राणांना पाडण्याचं काम केले. राज्यपाल बनवणे अशी विधाने करून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहेत. त्यांना चांगल्या डॉक्टरकडे उपचाराची गरज आहे. त्यासाठी जो काही खर्च लागेल तो करण्यास मी तयार आहे असं खोचक पलटवार करत रवी राणांनी आनंदराव अडसूळांना फटकारलं आहे. 

टॅग्स :Anandrao Adsulआनंदराव अडसूळAmit Shahअमित शाहBJPभाजपाShiv Senaशिवसेनाnavneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणा