शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

Maharashtra Government: शिवसेना-काँग्रेसची मैत्री आजची नाही...आहे तब्बल चार दशकांचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 14:39 IST

Maharashtra Government News: शिवसेनेची स्थापना 1966 मध्ये झाली होती. मात्र, या 53 वर्षांच्या काळात पाच असे मोठे प्रसंग आले की दोन्ही पक्षांनी एकमेकांना मदत केली होती.

मुंबई : शिवसेनाकाँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार आहे. गेल्या पंधरवड्यापासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व्हिडीओ, वक्तव्यांचे फोटो व्हायरल करून ते कसे काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका करत होते हे दाखविले जात होते. मात्र, इतिहासात डोकावल्यास शिवसेना काँग्रेसची मैत्री ही काही आजची नसल्याचे स्पष्ट होत आहे. या मैत्रीला तब्बल चार दशकांचा म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंच्या सुवर्णकाळाचा  इतिहास आहे. 

शिवसेनेची स्थापना 1966 मध्ये झाली होती. मात्र, या 53 वर्षांच्या काळात पाच असे मोठे प्रसंग आले की दोन्ही पक्षांनी एकमेकांना मदत केली होती. तर शिवसेनेने डाव्या विचारांच्या पक्षांना, उमेदवारांना तब्बल 22 वेळा मदत केली होती. 

वैभव पुरंदरे यांच्या बाळ ठाकरे आणि शिवसेनेचा उदय या पुस्तकात शिवसेनेच्या पहिल्या प्रचारसभेला तेव्हाचे काँग्रेसचे मोठे नेते रामाराव आदिक सहभागी झाले होते. रामाराव आणि बाळासाहेब ठाकरे मित्र होते. ठाकरे यांनी तेव्हा सांगितले होते की कम्युनिस्टांना हरविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. तर एप्रिल 2004 मध्ये सुहास पळशीकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातही याची उल्लेख आहे. राजकीय विश्लेषक उदय तानपाठक सांगतात की, 1966 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचे समर्थन होते. यामुळे नंतर शिवसेनेला वसंत सेना असेही म्हटले जाऊ लागले. 1971 मध्ये शिवसेनेने पहिली निवडणूक कामराज यांच्या काँग्रेससोबत मिळून लढविली होती. नंतर इंदिरा काँग्रेसचा गट पुढे आला. 

बाळासाहेब ठाकरेंवरील पुस्तकात त्यांनी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली त्याचे उघडपणे समर्थन केले होते. ठाकरे तेव्हा मी लोकशाही नाही तर ठोकशाहीवर विश्वास ठेवतो, असे म्हणत होते. तर थॉमस हेनसेन यांनी लिहिलेल्या 'वेजेस ऑफ व्हायलेंस : नेमिंग अँड आयडेंटिटी इन पोस्टकोलोनियल बॉम्बे' नुसार इंदिरा यांनी आणीबाणी अशासाठी लागू केली कारण देशात अस्थिरता पसरली होती. आणि हाच एकमेव उपाय असल्याचे बाळासाहेब म्हणाले होते. 

1977 मध्ये बाळासाहेबांनी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मुरली देवरा यांना समर्थन दिले होते. याच वर्षी झालेल्या लोकसभेची निवडणूक झाली होती. यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा प्रचार केला होता. 1980 मध्ये इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान बनताच महाराष्ट्राचे सरकार बरखास्त केले आणि पुन्हा निवडणूक घेतली. यावेळी अंतुलेंना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्यात आले होते. बाळासाहेबांनी या निवडणुकीत उमेदवारच उभे केले नव्हते आणि काँग्रेसला पाठिंबा दिला होता. बदल्यात काँग्रेसने शिवसेनेच्या प्रमोद नवलकर आणि वामनराव महाडिक यांना विधानपरिषदेवर पाठवलं.

राष्ट्रपती निवडीवेळीही दोनदा शिवसेना काँग्रेसच्या मदतीला धावलेली आहे. 2007 मध्ये एनडीएचे भैरोसिंह शेखावत यांच्याऐवजी काँग्रेसच्या प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. तर 2012 मध्येही शिवसेनेने प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Indira Gandhiइंदिरा गांधी