शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
3
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
4
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
5
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
6
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
7
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
8
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
9
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
10
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
11
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
12
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
13
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
14
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
15
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
16
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
17
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
18
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
19
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
20
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम

Maharashtra Government: शिवसेना-काँग्रेसची मैत्री आजची नाही...आहे तब्बल चार दशकांचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 14:39 IST

Maharashtra Government News: शिवसेनेची स्थापना 1966 मध्ये झाली होती. मात्र, या 53 वर्षांच्या काळात पाच असे मोठे प्रसंग आले की दोन्ही पक्षांनी एकमेकांना मदत केली होती.

मुंबई : शिवसेनाकाँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार आहे. गेल्या पंधरवड्यापासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे व्हिडीओ, वक्तव्यांचे फोटो व्हायरल करून ते कसे काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका करत होते हे दाखविले जात होते. मात्र, इतिहासात डोकावल्यास शिवसेना काँग्रेसची मैत्री ही काही आजची नसल्याचे स्पष्ट होत आहे. या मैत्रीला तब्बल चार दशकांचा म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंच्या सुवर्णकाळाचा  इतिहास आहे. 

शिवसेनेची स्थापना 1966 मध्ये झाली होती. मात्र, या 53 वर्षांच्या काळात पाच असे मोठे प्रसंग आले की दोन्ही पक्षांनी एकमेकांना मदत केली होती. तर शिवसेनेने डाव्या विचारांच्या पक्षांना, उमेदवारांना तब्बल 22 वेळा मदत केली होती. 

वैभव पुरंदरे यांच्या बाळ ठाकरे आणि शिवसेनेचा उदय या पुस्तकात शिवसेनेच्या पहिल्या प्रचारसभेला तेव्हाचे काँग्रेसचे मोठे नेते रामाराव आदिक सहभागी झाले होते. रामाराव आणि बाळासाहेब ठाकरे मित्र होते. ठाकरे यांनी तेव्हा सांगितले होते की कम्युनिस्टांना हरविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. तर एप्रिल 2004 मध्ये सुहास पळशीकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातही याची उल्लेख आहे. राजकीय विश्लेषक उदय तानपाठक सांगतात की, 1966 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचे समर्थन होते. यामुळे नंतर शिवसेनेला वसंत सेना असेही म्हटले जाऊ लागले. 1971 मध्ये शिवसेनेने पहिली निवडणूक कामराज यांच्या काँग्रेससोबत मिळून लढविली होती. नंतर इंदिरा काँग्रेसचा गट पुढे आला. 

बाळासाहेब ठाकरेंवरील पुस्तकात त्यांनी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली त्याचे उघडपणे समर्थन केले होते. ठाकरे तेव्हा मी लोकशाही नाही तर ठोकशाहीवर विश्वास ठेवतो, असे म्हणत होते. तर थॉमस हेनसेन यांनी लिहिलेल्या 'वेजेस ऑफ व्हायलेंस : नेमिंग अँड आयडेंटिटी इन पोस्टकोलोनियल बॉम्बे' नुसार इंदिरा यांनी आणीबाणी अशासाठी लागू केली कारण देशात अस्थिरता पसरली होती. आणि हाच एकमेव उपाय असल्याचे बाळासाहेब म्हणाले होते. 

1977 मध्ये बाळासाहेबांनी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मुरली देवरा यांना समर्थन दिले होते. याच वर्षी झालेल्या लोकसभेची निवडणूक झाली होती. यामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा प्रचार केला होता. 1980 मध्ये इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान बनताच महाराष्ट्राचे सरकार बरखास्त केले आणि पुन्हा निवडणूक घेतली. यावेळी अंतुलेंना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्यात आले होते. बाळासाहेबांनी या निवडणुकीत उमेदवारच उभे केले नव्हते आणि काँग्रेसला पाठिंबा दिला होता. बदल्यात काँग्रेसने शिवसेनेच्या प्रमोद नवलकर आणि वामनराव महाडिक यांना विधानपरिषदेवर पाठवलं.

राष्ट्रपती निवडीवेळीही दोनदा शिवसेना काँग्रेसच्या मदतीला धावलेली आहे. 2007 मध्ये एनडीएचे भैरोसिंह शेखावत यांच्याऐवजी काँग्रेसच्या प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. तर 2012 मध्येही शिवसेनेने प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Indira Gandhiइंदिरा गांधी