शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

खोके सरकार आल्यापासून राज्यात पनवती सुरू, मी मुख्यमंत्री असतो तर...; उद्धव ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 18:43 IST

मी घरात बसूनही कामे केली, त्याचे कौतुक होतंय. कोरोना, शस्त्रक्रिया यामुळे बंधने होती. तुम्ही कुठे फिरता सुरत, गुवाहटी, गोवा असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई - जेव्हापासून खोके सरकार महाराष्ट्राच्या गादीवर बसलं तेव्हापासून पनवती सुरू झालीय. उद्योगधंदे तिकडे गेले तर राज्यात बेरोजगारी वाढेल, तरुणांना बेकार ठेवायचा. छत्रपतींचा अपमान करून आदर्श मोडायचा. सोलापूर कर्नाटकात गेल्यानंतर माझा पंढरपूरचा विठोबाही कर्नाटकात जाणार. लाखो कोट्यवधी भाविक विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी कर्नाटकात जाणार. महाराष्ट्रातलं दैवत पंढरपूर, अक्कलकोट पळवणार असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना गुवाहाटीला जायची गरज भासली, मी तुमचे आशीर्वाद घ्यायला आलोय. माझा आत्मविश्वास तुम्ही आहात. मी जिंकणार म्हणजे जिंकणारच. मुख्यमंत्री असतो तर तुमच्यावर आत्महत्येची वेळ येऊच दिली नसती. शिवसेना जिवंत सळसळत रक्त. कितीही फोडा तुम्हाला शक्य होणार नाही. डोकं आपटावं लागेल पण माझी शिवसेना तुम्हाला फोडल्याशिवाय राहणार नाही. निवडणुका लांबवतायेत. मी तुमच्या भरवशावर उभा आहे. तुमच्या संकटात मी उभा आहे. आत्महत्या अजिबात करायची नाही. आपण शिवरायांचे नाव घेतो मग शिवरायांनी आपल्याला लढायचं शिकवलंय असं त्यांनी म्हटलं. 

तसेच मी घरात बसूनही कामे केली, त्याचे कौतुक होतंय. कोरोना, शस्त्रक्रिया यामुळे बंधने होती. तुम्ही कुठे फिरता सुरत, गुवाहटी, गोवा. पोळ्याला बैलाला सजवलेलं पन्नास खोके. तुम्ही घेतलेले पन्नास खोके शेतकऱ्यांना दिले तर त्यांचे भले होईल. ह्या मिंधे सरकारकडून काही अपेक्षा नाही. नवीन युवक शक्ती येत आहे. आपण हिंदुत्वावरुन कुणाला फसवले नाही. काश्मीरमध्ये भाजपा मेहबूबा सोबत गेले तेव्हा काय होते? मी काँग्रेस राष्ट्रवादीला घेऊन धाराशिव आणि संभाजीनगर करुन दाखवले. आम्ही काही सोडलेले नाही बोक्यांना खोक्यांची भूक म्हणून हे गद्दारी करुन गेले. काय कमी केले होत तुमचं? या गोरगरिबांनी तुम्हाला निवडून गेले. आज तात्पुरता सत्ता पण देशात तुमच्या कपाळावर गद्दाराची ओळख कायमची अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. 

राज्यपालांचा आगाऊपणा सहन केला नाहीछत्रपतींचा वारंवार अपमान करायचा. गुजरात निवडणुकीसाठी उद्योग तिकडे पाठवताहेत. काल कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्या राज्यातला गावांवर हक्क सांगताहेत. मी मुख्यमंत्री असतांना राज्यपालांचा आगाऊपणा सहन केला नाही. काळ्या टोपीने अनेकदा अपमान केला. अब्दुल गटार, त्याने सुप्रिया सुळेचा अपमान केला. मी मुख्यमंत्री असतो तर कुठल्याही महिलेचा अपमान झाला असता तर लाथ मारून हाकलवून दिला असता. जसा एकाला हाकलला. महिलेचा अपमान झाला हे बाळासाहेबांचे विचार नव्हते. तुमच्यात हिंमत असेल तर महाराष्ट्रात जे चाललंय ते पसंत नाही आज आम्ही सरकारमधून बाहेर पडतोय हे जाहीर करा. स्वत:वर विश्वास नाही म्हणून गुवाहाटीला जाता असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा