शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Ramdas Athvale: “शरद पवारांना काँग्रेसनं पक्षातून काढलंय; दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेना-भाजपानं एकत्र यावं”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 19:07 IST

शिवसेना नेत्याने अशाप्रकारे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केलेत त्यामुळे शिवसेनेने आता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहू नये असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहून शिवसेनेला नुकसान सहन करावं लागू शकतं.शिवसेना-भाजपाने एकत्र यावं आणि महाराष्ट्राच्या विकासाला गती द्यावी. शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असं म्हणता येणार नाही

मुंबई - अनंत गीते यांनी केलेलं विधान योग्य नाही. शरद पवार हे महाराष्ट्राचे नेते आहेत. शरद पवारांनी(Sharad Pawar) काँग्रेस पक्ष फोडला असं नाही त्यांना काँग्रेसमधून काढलं आहे अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गीते यांच्या विधानावर भाष्य केले आहे. त्याचसह दसरा मेळाव्यापूर्वी शिवसेना-भाजपानं(Shivsena-BJP) एकत्र यावं अशी मागणी आठवलेंनी केली आहे.

पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, त्याकाळी सोनिया गांधी या परदेशी असल्याच्या मुद्द्यावरुन शरद पवार, तारिक अन्वर, नगमा यांनी पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात सोनिया गांधी(Sonia Gandhi) या परदेशी असल्याने त्या पंतप्रधान बनल्यास त्याचा फटका काँग्रेस पक्षाला बसू शकतो. त्यामुळे याचा विचार करायला हवा असं त्यांनी म्हटलं होतं. या घटनेनंतर शरद पवार यांना काँग्रेस पक्षातून काढलं आहे. त्यामुळे शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असं म्हणता येणार नाही असं त्यांनी सांगितले.

तर शिवसेना नेत्याने अशाप्रकारे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केलेत त्यामुळे शिवसेनेने आता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहू नये. शिवसेनेने पुन्हा भाजपा-आरपीआयसोबत येऊन बाळासाहेब ठाकरे यांचं शिवशक्ती-भीमशक्तीचं स्वप्न साकार केले पाहिजे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहून शिवसेनेला नुकसान सहन करावं लागू शकतं. त्यामुळे भवितव्याच्या दृष्टीने शिवसेनेने भाजपासोबत आलं पाहिजे. अडीच वर्षाचा फॉर्म्युला घेऊन शिवसेना-भाजपाने एकत्र यावं आणि महाराष्ट्राच्या विकासाला गती द्यावी. केंद्राकडून जास्तीत जास्त निधी राज्यासाठी खेचून आणावा. दसरा मेळाव्याआधी शिवसेना- भाजपाने एकत्र आलं पाहिजे अशी मागणी मंत्री रामदास आठवलेंनी(Ramdas Athvale) केली आहे.

दरम्यान, तिन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करत असतात. त्यामुळे तिघांनी एकत्र सत्तेत राहणं बरोबर नाही. काँग्रेसनं पाठिंबा काढावा अथवा शिवसेनेने या दोघांची साथ सोडून पुन्हा माघारी परतावं. भाजपासोबत शिवसेनेने यावं. पुढील निवडणुका एकत्र लढवाव्यात आणि महाराष्ट्राचं भलं करावं असंही रामदास आठवले म्हणाले.

काय म्हणाले होते अनंत गीते?

मुख्यमंत्री आपला आहे म्हणून राज्यात सरकार आपले आहे. बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. महाविकास आघाडीचं सरकार आहे. सत्ता मविआ नेते सांभाळतील. तुमची आणि माझी जबाबदारी आपलं गाव सांभाळायचं आहे. त्यावेळी आम्हाला महाविकास आघाडीचा नव्हे तर शिवसेनेचाच विचार करायचा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी एकमेकांचे तोंड बघत होते का? या दोन्ही पक्षांचा विचार एक आहे का? दोन काँग्रेस एकमेकांच्या विचाराचे होऊ शकत नाही मग शिवसेना काँग्रेसी विचारांची होऊ शकते का? राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असलं तरी आम्ही शिवसैनिक आहोत शिवसैनिकच राहणार. आपली ओळख आपण कधीही विसरता कामा नये. आमचा नेता फक्त बाळासाहेब ठाकरे आहेत. इतर कुणीही होऊ शकत नाही. मग त्या नेत्याने काहीही उपाधी लावू दे. मग जाणता राजा असं स्वत:ला म्हणवलं तरीही ने आमचे नेते नाहीत. गुरु नाहीत. असा अप्रत्यक्ष टोला शिवसेनेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते(Anant Gite) यांनी शरद पवारांना लगावला आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRamdas Athawaleरामदास आठवलेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस