शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

शिवसेना-भाजपाची युती होणारच; रावसाहेब दानवे यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 5:41 AM

येत्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती होणारच असे जाहीर करीत, येत्या २०१९ ची निवडणूक आम्हीच जिंकणार असल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पालघरमध्ये केला आहे.

पालघर : येत्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेची युती होणारच असे जाहीर करीत, येत्या २०१९ ची निवडणूक आम्हीच जिंकणार असल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पालघरमध्ये केला आहे.पालघर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षीय पदाधिकाºयांशी भेटून कामाचे नियोजन आणि जबाबदारी निश्चित करीत, पक्ष बांधणीच्या दृष्टीने पालघरच्या विठ्ठल रखुमाई मंदिर सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजेंद्र गावित, आ.संजय केळकर, आमदार पास्कल धनारे आदी मान्यवर उपस्थित होते.लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मी स्वत: आणि संघटकमंत्री पुराणिक महाराष्ट्राच्या दौºयावर असून, २० जिल्ह्याचा दौरा पूर्ण करीत निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांची तयारी पूर्ण झाल्याचे सांगितले. २८८ लोकसभा मतदार संघात विस्तारकांची नेमणूक करून बूथ गठन करण्याचे काम हाती घेतले असून, राज्यातील एकूण ९२ हजार बुथपैकी ८८ हजार बुथचे गठन पूर्ण झाल्याचे ते म्हणाले.एक लोकसभेंतर्गत ६ विधानसभा येत असून, प्रत्येक विधानसभेतील ३०० बुथवर एका अध्यक्षांच्या हाताखाली १५ पुरुष आणि १० महिला अशा कार्यकर्त्यांची फळी उभारण्यात आली आहे. त्यामुळे ४० ते ५० लाख कार्यकर्ते निवडणुका जाहीर होताच कामाला सुरुवात करणार असल्याची योजना भाजपाने आखल्याचे त्यांनी सांगितले. या संघटनात्मक बांधणीच्या जोरावर आणि प्रधानमंत्री मोदीवर लोकांचा असलेला विश्वास या जोरावर आम्ही २०१९ची निवडणूक जिंकणार असल्याचा दावाही त्यांनी केला. बुलेट ट्रेन उभारणीत शेतकºयांच्या जमिनी गेल्याने त्यांचा विरोध होणारच, पण आमचे सरकार यातूनही मार्ग काढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.भाजपाचीच सत्ता येणारकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांत सध्या ताळमेळ राहिला नसून, पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? यावरून भांडणे सुरू आहेत. पाच राज्यांत झालेल्या निवडणुकीच्या एक्झिट पोलबाबत त्यांना छेडले असता, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकांचा एक्झिट पोल भाजपाच्या विरोधात असताना दोन्ही ठिकाणी भाजपाची सत्ता असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा