शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना, राष्ट्रवादी झाली, आता भाजपात होणार मोठा भूकंप, बड्या नेत्या काँग्रेसच्या वाटेवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 16:39 IST

Pankaja Munde: राजकीय भूकंपांची मालिका एवढ्यात थांबणार नाही अशीच चिन्हं आहेत. लवकरच राज्यामध्ये आणखी एक भूकंप घडणार असून, त्या भूकंपाचं केंद्र भाजपा ठरण्याची शक्यता आहे.

२०१९ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथींमध्ये नवनवे अंक समोर येत आहे. ८० तासांचं सरकार, मविआचा जन्म, एकनाथ शिंदेंचं बंड आणि हल्लीच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडवलेल्या भूकंपामुळे राज्यातील राजकारण ढवळून गेलं आहे. मात्र या राजकीय भूकंपांची मालिका एवढ्यात थांबणार नाही अशीच चिन्हं आहेत. लवकरच राज्यामध्ये आणखी एक भूकंप घडणार असून, त्या भूकंपाचं केंद्र भाजपा ठरण्याची शक्यता आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे ह्या भाजपा सोडण्याच्या मन:स्थितीत असून, त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात आहेत. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही याबाबत सूचक विधान केलं आहे. 

अजित पवार यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यानंतर त्यांच्यासोबत आलेल्या नेत्यांमध्ये धनंजय मुंडे यांचाही समावेश आहे. धनंजय मुंडे भाजपाला पाठिंबा देत थेट मंत्री झाल्याने पंकजा मुंडे यांना थेट परळीमध्येच आव्हान निर्माण झालं आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता भाजपासोबत आल्याने परळीतून पुढील निवडणूक ही धनंजय मुंडे हेच लढवतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना आपल्या पारंपरिक मतदारसंघावर पाणी सोडावे लागू शकते. 

त्यामुळेच पंकजा मुंडे यांनी पुढील वाटचालीबाबत चाचपणी करण्यास सुरुवात केल्याची चर्चा रंगली आहे. त्या काँग्रेसच्या वाटेवर असून, त्यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचाही दावा केला जात आहे. दरम्यान, आज पत्रकार परिषदेत असा प्रश्न विचारण्यात आला असता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सूचक विधान केलं आहे. पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये येणार असतील तर स्वागत आहे. त्यांनी सोनिया गांधींची भेट घेतली असेल तर ती चांगली बाब आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. एवढेच नव्हे तर नव्याने महाराष्ट्रात पाय रोवत असलेला बीआरएसकडून पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार घोषित करण्याची ऑफर आली होती. त्यानंतर आता मला आलेल्या ऑफरकडे मी बघणार नाही असे नाही, असे सूचक विधान पंकजा मुंडे यांनी केले होते. 

महाराष्ट्राच्या राजकारणात बीडमधील बहीण-भावाच्या लढतीकडे जास्त लक्ष असते. २०१४ साली विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंंडे यांचा पराभव करत मंत्रीपद मिळविले होते. त्यानंतर  २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी वचपा काढत बहीण पंकजा यांचा पराभव केला. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपदही मिळविले होते.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBJPभाजपाcongressकाँग्रेस